शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

परवानगी २०० फुट अन् खोदकाम ४०० फुटाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 22:08 IST

जिल्ह्याची भूजल पातळीत सातत्याने घट होत आहे. तर दुसरीकडे दोनशे फुट बोअरवेल खोदकामाची परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र ४०० फुटापर्यंत खोदकाम केले जात आहे.

ठळक मुद्दे१५१० बोअरवेलचे खोदकाम : कारवाई एकावरही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्याची भूजल पातळीत सातत्याने घट होत आहे. तर दुसरीकडे दोनशे फुट बोअरवेल खोदकामाची परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र ४०० फुटापर्यंत खोदकाम केले जात आहे. मागील पाच ते सहा महिन्याच्या कालावधीत १५१० अनाधिकृत बोअरवेलचे खोदकाम केल्याची धक्कदायक बाब उघडकीस आली आहे.जमिनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा वाढल्याने त्यात प्लोराईडचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लोकांना दुर्धर आजाराची लागण होत आहे. जमिनीतून निर्धारित मर्यादेपेक्षा अतिरिक्त पाण्याचा उपसा केला जात असल्याने भविष्यातील पाणी साठ्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.अनाधिकृत बोअरवेल खोदकामाला प्रतिबंध लागावा, भूगर्भातील सुरक्षीत समजला जाणारा पाणीसाठा कायम रहावा, शासनाने भूजल सर्वेक्षण अधिनियमाची अंमलबजावणी केली. यातर्गंत २०० फुटापेक्षा अधिक खोल बोअरवेल खोदण्यास आणि दोन बोअरवेलमधील अंतर पाचशे मीटरपेक्षा अधिक ठेवण्याचे निर्देश दिले. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी भूजल सर्वेक्षण विभाग, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यावर सोपविली. मात्र या सर्वांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे राष्टÑीय हरित लवादाने याची गांर्भियाने दखल घेत दुर्लक्ष करणाऱ्या जबबादार अधिकाºयांवरच कारवाई करण्याचे निर्देश दिले.जिल्ह्यात मागील सहा महिन्यात तीन ते चार हजारावर बोअरवेलचे खोदकाम करण्यात आले. यापैकी १५१० बोअरवेल या ४०० फुटापेक्षा अधिक खोल खोदण्यात आल्या असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली. यंदा जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने पाणी टंचाईचे चित्र आहे. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर बोअरवेलचे खोदकाम केले जात आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. जिल्ह्यात सर्रासपणे २०० फुटापेक्षा अधिक खोल बोअरवेल खोदल्या जात आहे. मात्र प्रशासनाने आत्तापर्यंत एकावरही कारवाई केली नसल्याची माहिती आहे.६८ पाण्याचे स्त्रोत दूषितभूजल सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे १५३२ स्त्रोत आहेत. यापैकी ६८ पाण्याचे स्त्रोत फ्लोराईडयुक्त असल्याचे परीक्षणानंतर पुढे आले. त्यामुळे या स्त्रोतांचे पाणी पिण्यास गावकऱ्यांना मनाई केली आहे.दर महिन्याला भूजल पातळीची नोंदजिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळी दोन मीटरने खालावली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या तीव्र होण्याची शक्यता आहे. याच धर्तीवर भूजल सर्वेक्षण विभागाकडून दर महिन्याला भूजल पातळी मोजली जात आहे. दर महिन्याला भूजल पातळीची नोंद घेणार गोंदिया महाराष्टÑातील एकमेव जिल्हा आहे.