शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

परवानगी २०० फुट अन् खोदकाम ४०० फुटाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 22:08 IST

जिल्ह्याची भूजल पातळीत सातत्याने घट होत आहे. तर दुसरीकडे दोनशे फुट बोअरवेल खोदकामाची परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र ४०० फुटापर्यंत खोदकाम केले जात आहे.

ठळक मुद्दे१५१० बोअरवेलचे खोदकाम : कारवाई एकावरही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्याची भूजल पातळीत सातत्याने घट होत आहे. तर दुसरीकडे दोनशे फुट बोअरवेल खोदकामाची परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र ४०० फुटापर्यंत खोदकाम केले जात आहे. मागील पाच ते सहा महिन्याच्या कालावधीत १५१० अनाधिकृत बोअरवेलचे खोदकाम केल्याची धक्कदायक बाब उघडकीस आली आहे.जमिनीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा वाढल्याने त्यात प्लोराईडचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लोकांना दुर्धर आजाराची लागण होत आहे. जमिनीतून निर्धारित मर्यादेपेक्षा अतिरिक्त पाण्याचा उपसा केला जात असल्याने भविष्यातील पाणी साठ्यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.अनाधिकृत बोअरवेल खोदकामाला प्रतिबंध लागावा, भूगर्भातील सुरक्षीत समजला जाणारा पाणीसाठा कायम रहावा, शासनाने भूजल सर्वेक्षण अधिनियमाची अंमलबजावणी केली. यातर्गंत २०० फुटापेक्षा अधिक खोल बोअरवेल खोदण्यास आणि दोन बोअरवेलमधील अंतर पाचशे मीटरपेक्षा अधिक ठेवण्याचे निर्देश दिले. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी भूजल सर्वेक्षण विभाग, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यावर सोपविली. मात्र या सर्वांचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे राष्टÑीय हरित लवादाने याची गांर्भियाने दखल घेत दुर्लक्ष करणाऱ्या जबबादार अधिकाºयांवरच कारवाई करण्याचे निर्देश दिले.जिल्ह्यात मागील सहा महिन्यात तीन ते चार हजारावर बोअरवेलचे खोदकाम करण्यात आले. यापैकी १५१० बोअरवेल या ४०० फुटापेक्षा अधिक खोल खोदण्यात आल्या असल्याची माहिती भूजल सर्वेक्षण विभागाच्या सूत्रांनी दिली. यंदा जिल्ह्यात कमी पाऊस झाल्याने पाणी टंचाईचे चित्र आहे. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणावर बोअरवेलचे खोदकाम केले जात आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. जिल्ह्यात सर्रासपणे २०० फुटापेक्षा अधिक खोल बोअरवेल खोदल्या जात आहे. मात्र प्रशासनाने आत्तापर्यंत एकावरही कारवाई केली नसल्याची माहिती आहे.६८ पाण्याचे स्त्रोत दूषितभूजल सर्वेक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे १५३२ स्त्रोत आहेत. यापैकी ६८ पाण्याचे स्त्रोत फ्लोराईडयुक्त असल्याचे परीक्षणानंतर पुढे आले. त्यामुळे या स्त्रोतांचे पाणी पिण्यास गावकऱ्यांना मनाई केली आहे.दर महिन्याला भूजल पातळीची नोंदजिल्ह्यात यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळी दोन मीटरने खालावली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या तीव्र होण्याची शक्यता आहे. याच धर्तीवर भूजल सर्वेक्षण विभागाकडून दर महिन्याला भूजल पातळी मोजली जात आहे. दर महिन्याला भूजल पातळीची नोंद घेणार गोंदिया महाराष्टÑातील एकमेव जिल्हा आहे.