शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

७९ वर्षांनंतर प्रथमच होणार बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवेचे 'टेकऑफ'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 14:37 IST

शासनाच्या उड्डाण योजनेतंर्गत तब्बल ७९ वर्षांनंतर येत्या १३ मार्चपासून प्रवासी वाहतूक सेवेचे टेकऑफ हाेणार आहे.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात गोंदिया-इंदूर-हैदराबाद सेवादुसऱ्या टप्प्यात मुंबई, पुणे

अंकुश गुंडावार

गोंदिया : दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ब्रिटिश सरकारने १९४२-४३ मध्ये तालुक्यातील बिरसी येथे विमानतळाची उभारणी केली. सन २००५ मध्ये तत्कालीन केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ तयार केले. मात्र या विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवेला प्रारंभ झाला नव्हता. यानंतर शासनाच्या उड्डाण योजनेतंर्गत तब्बल ७९ वर्षांनंतर येत्या १३ मार्चपासून प्रवासी वाहतूक सेवेचे टेकऑफ हाेणार आहे.

बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असून १२६ हेक्टरवर याचे क्षेत्र व्यापले आहे. तर गोंदिया जिल्हा मुंबई-हावडा रेल्वेमार्गावर असून मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याला लागून आहे. तर गोंदिया जिल्ह्यातून देश-विदेशात तांदूळ सुद्धा पाठविला जातो. या सर्व गोष्टी लक्षात घेता या विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्याच्या हालचाली मागील चार-पाच वर्षांपासून सुरू होत्या. आता त्याचा मुहूर्त साधला असून १३ मार्चपासून त्याला प्रारंभ होणार आहे. फ्लाय बिग कंपनीने याचे कंत्राट घेतले आहे. या कंपनीकडे चार एअरक्राफ्ट असून ७२ किंवा ८० आसन क्षमता असणारे विमान नियमित बिरसी विमानतळावरून सुटणार आहेत. येत्या काही दिवसांत दुसऱ्या टप्प्यात बिरसी विमानतळावरून विमान सेवांचा विस्तार करण्यात येणार आहे. सध्या इंदौर-गोंदिया-हैद्राबाद विमानसेवा सुरू होणार आहे. गोंदिया ते पुणे, गोवा, रायपूर-गोंदिया-पुणे-गोवा आदी मार्गांवर देखील प्रवासी विमान वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे.

या मार्गावरही सेवेचा विचार

इंदौर-गोंदिया-हैदराबादनंतर रायपूर-गोंदिया पुणे-गोवा, गोंदिया ते पुणे, गोवा, रायपूर-गोंदिया-पुणे-गोवा विमान सेवेचाही विचार बिरसी विमानतळावरून सुरू करण्याचे फ्लाग बिग कंपनीच्या विचाराधीन असल्याचे कंपनीचे अधिकारी संजय मांडविय यांनी सांगितले. त्यामुळे बिरसी विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवेचे टेकऑफ लवकरच होण्याची शक्यता आहे.

दोन हजार रुपये असेल तिकीट

ज्या विमानतळावरून प्रवाशांची संख्या कमी आहे, त्यात प्रवाशांना तिकीट कमी दरात (२०००-२२०० रुपये) उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने उड्डाण नावाची योजना सुरू केली. त्याचा लाभदेखील या विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे गोंदिया-इंदौर-हैदराबाद ते चेन्नई करिता केवळ दोन हजार रुपये तिकीट असणार आहे.

टॅग्स :Airportविमानतळgondiya-acगोंदिया