शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

बंडखोरांमुळे रंगत

By admin | Updated: October 8, 2014 23:28 IST

विधानसभा निवडणुकीचा ज्वर आता कुठे वाढू लागला आहे. या मतदार संघात आपापल्या परीने सर्व १३ उमेदवार प्रचारकार्यात मश्गुल आहेत तर आपल्या गावात कोणती ‘सेलीब्रेटी’ येणार या उत्कंठेत

संतोष बुकावन - अर्जुनी/मोरगावविधानसभा निवडणुकीचा ज्वर आता कुठे वाढू लागला आहे. या मतदार संघात आपापल्या परीने सर्व १३ उमेदवार प्रचारकार्यात मश्गुल आहेत तर आपल्या गावात कोणती ‘सेलीब्रेटी’ येणार या उत्कंठेत मतदार बुडले आहेत. प्रमुख पक्षांतील युती-आघाडी तुटल्याने मतदार नेमका कोणत्या उमेदवाराला कौल देतील हे चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. प्रचारासाठी कमी कालावधी असल्याने उमेदवार पूर्ण मतदारसंघ पिंजून काढण्याच्या कामात व्यस्त आहे. या मतदारसंघात भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना बंडखोरांचा सामना करावा लागत आहे.अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्र अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघातून भाजपचे राजकुमार बडोले यांनी २००९ च्या निवडणुकीत बाजी मारली. यावेळी मात्र सडक/अर्जुनी व अर्जुनी/मोरगाव या दोन्ही तालुक्यातून त्यांच्या उमेदवारीसाठी बराच विरोध झाला. मुलाखतीदरम्यान पक्षनिरीक्षकांना त्यांचा पाच वर्षाच्या कार्यकाळातील लेखाजोखा सादर करण्यात आला. तरीसुद्धा कार्यकर्ते असंतुष्ट असतानाही त्यांना पक्षश्रेष्ठींनी उमेदवारी दिली. त्यांनी मतदारसंघातील ३८ गावे दत्तक घेतली असताना गावांचा विकास केला नाही, असे मतदार उघडपणे बोलत आहेत. दत्तक गावातील ग्रामस्थांची नाराजी व असंतुष्टांची मनधरणी करण्यात आलेले अपयश या दोन्ही बाजू बडोले यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहेत. त्यातच पंतप्र्नधान नरेंद्र मोदी भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले, मात्र त्यांनी शेतमालाच्या भाववाढीला स्पर्शही केला नाही. त्याचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत. काँग्रेसची उमेदवारी राजेश नंदागवळी यांना देण्यात आली. या उमेदवारीसाठी कार्यकर्त्यांच्या ‘कोलांटउड्या’ सुरू होत्या. अखेर कवाडे यांच्या गटातून त्यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र यात दोन कार्यकर्त्यांनी बंडखोरी करुन निवडणूक रिंगणात उडी घेतली. पक्षाने उमेदवारी दिली नाही, आता धडा शिकवायचाच या उद्देशाने पेटलेले रत्नदीप दहिवले व अजय लांजेवार आपले भाग्य अजमावित आहेत. या बंडखोरीचाही फटका काँग्रेसला बसू शकतो.महायुती तुटल्यानंतर भाजप उमेदवारांची घोषणा झाली. भाजप उमेदवारीच्या प्रयत्नात असलेल्या किरण कांबळे यांनी शेवटी शिवसेनेचे धनुष्य हातात घेतले. २००९ च्या निवडणुकीत त्यांंनी काँग्रेस पक्षातून बंडखोरी केली होती. भाजपमधील गटबाजी ही काही प्रमाणात किरण कांबळे यांच्या पाठीशी असल्याचे दिसून येते. त्या पूर्वीपासून भाजपमधून जिल्हा परिषद सदस्य असल्याने त्यांचा कार्यकर्त्यांशी जुनाच संबंध आहे. त्याचा कितपत लाभ होतो हे निकालानंतरच स्पष्ट होईल. आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्षातून उमेदवारी मिळविण्यासाठी मनोहर चंद्रीकापूरे यांनी निवडणुकीच्या पूर्वीपासूनच बाशिंग बांधून ठेवले होते. आघाडी तुटल्याबरोबर त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी पदरात पाडून घेतली. प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेल्या चंद्रीकापुरे यांनी प्रथमच राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. कृषी खात्यात वरिष्ठ अधिकारी असल्याने त्यांची शेतकऱ्यांशी जवळीक आहे. मात्र त्यांना मतात परिवर्तीत करण्याची कसरत ते करू शकतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.बहुजन समाज पार्टीच्या हत्तीवर माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमराव मेश्राम आरुढ झाले आहेत. त्यांना बसपाच्या कॅडर मतांचा लाभ होईल. पण जनसामान्यांची मते ते कितपत जिंकणार याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. एकंदरित अर्जुनी/मोरगाव विधानसभेसाठी तुल्यबळ लढत आहे. ही लढत राष्ट्रवादीचे नेते खा.प्रफुल्ल पटेल व खा.नाना पटोले यांच्यासाठी प्रतिष्ठेची समजली जात आहे. खा.पटोले अद्यापही प्रचारात उतरले नाहीत. मात्र खा.पटेल प्रचारात व्यस्त आहेत. वर्चस्वाच्या या लढतीत नेमकी बाजी कोण मारणार, हे येणारा काळच ठरवेल.