शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Conflict: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
2
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
3
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
4
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
5
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
6
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
7
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
8
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
9
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
10
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
11
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
12
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
13
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
14
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
15
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
16
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
17
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
18
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
19
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
20
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश

धान खरेदी केंद्रावर सावळा गोंधळ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात ...

ठळक मुद्देदलाल सक्रिय : वजन करण्यास विलंब, विभागाला तक्रारींची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र या केंद्रावर सध्या दलालांचा सुळसुळाट असून दलालामार्फत येणाऱ्या धानाचे वजन आधी आणि शेतकऱ्यांच्या धानाचे वजन नंतर केले जात असल्याचे चित्र आहे. याप्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी जिल्ह्यात ५७ धान खरेदी केंद्र सुरू केले आहे.यासाठी काही संस्थाशी खरेदीचा करार केला आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होवू नये यासाठी टोकन पध्दतीने धान खरेदी सुरू केली. टोकन पध्दतीमुळे ज्या दिवशीचे टोकन शेतकऱ्यांना दिले त्या दिवशीच शेतकरी आपले धान विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेवून जातात. यामुळे खरेदी केंद्रावर आधीच धान नेऊन ठेवण्याची गरज भासत नाही. मात्र यानंतरही काही खरेदी केंद्रावर दलालामार्फत येणाºया धानाची आधी मोजणी केली जात असून टोकन नुसार नंबर येणाऱ्या शेतकऱ्यांना वेटींग ठेवले जात आहे. टोकनवाल्या शेतकऱ्यांच्या धानाचा काटा पंधरा पंधरा दिवस होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. असा प्रकार गुरूवारी (दि.६) गोरेगाव तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर पुढे आला.टोकननुसार दिलेल्या तारखेनुसार धानाची विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याचे धान न घेता दलाला मार्फत आलेल्या शेतकऱ्यांच्या धानाची आधी मोजणी करण्यात आली. यामुळे सदर शेतकऱ्यांने संस्थेच्या पदाधिकारी व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे तक्रार केली. मात्र त्यांनी लिखीत तक्रार करा असे सांगत याकडे दुर्लक्ष केले. खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी रब्बीतील धानाची विक्री करुन खते, बियाणे घेण्याच्या लगबगीत आहे. मात्र खरेदी केंद्रावर त्यांची दिशाभूल होत असल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत आहे.यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तक्रार प्राप्त झाल्यानंतर निश्चित कारवाही करु असे सांगितले.रब्बीला बोनस नाहीचशासनाने यंदा खरीप हंगामातील धानाला प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला होता. त्यामुळे रब्बी हंगामातील धानाला सुध्दा तो लागू राहिल अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र रब्बी हंगामातील धानाला बोनस मिळणार नसल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड