शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

धान खरेदी केंद्रावर सावळा गोंधळ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात ...

ठळक मुद्देदलाल सक्रिय : वजन करण्यास विलंब, विभागाला तक्रारींची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत जिल्ह्यात धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. मात्र या केंद्रावर सध्या दलालांचा सुळसुळाट असून दलालामार्फत येणाऱ्या धानाचे वजन आधी आणि शेतकऱ्यांच्या धानाचे वजन नंतर केले जात असल्याचे चित्र आहे. याप्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी जिल्ह्यात ५७ धान खरेदी केंद्र सुरू केले आहे.यासाठी काही संस्थाशी खरेदीचा करार केला आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होवू नये यासाठी टोकन पध्दतीने धान खरेदी सुरू केली. टोकन पध्दतीमुळे ज्या दिवशीचे टोकन शेतकऱ्यांना दिले त्या दिवशीच शेतकरी आपले धान विक्रीसाठी खरेदी केंद्रावर घेवून जातात. यामुळे खरेदी केंद्रावर आधीच धान नेऊन ठेवण्याची गरज भासत नाही. मात्र यानंतरही काही खरेदी केंद्रावर दलालामार्फत येणाºया धानाची आधी मोजणी केली जात असून टोकन नुसार नंबर येणाऱ्या शेतकऱ्यांना वेटींग ठेवले जात आहे. टोकनवाल्या शेतकऱ्यांच्या धानाचा काटा पंधरा पंधरा दिवस होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. असा प्रकार गुरूवारी (दि.६) गोरेगाव तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर पुढे आला.टोकननुसार दिलेल्या तारखेनुसार धानाची विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याचे धान न घेता दलाला मार्फत आलेल्या शेतकऱ्यांच्या धानाची आधी मोजणी करण्यात आली. यामुळे सदर शेतकऱ्यांने संस्थेच्या पदाधिकारी व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे तक्रार केली. मात्र त्यांनी लिखीत तक्रार करा असे सांगत याकडे दुर्लक्ष केले. खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकरी रब्बीतील धानाची विक्री करुन खते, बियाणे घेण्याच्या लगबगीत आहे. मात्र खरेदी केंद्रावर त्यांची दिशाभूल होत असल्याने त्यांची आर्थिक कोंडी होत आहे.यासंदर्भात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तक्रार प्राप्त झाल्यानंतर निश्चित कारवाही करु असे सांगितले.रब्बीला बोनस नाहीचशासनाने यंदा खरीप हंगामातील धानाला प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला होता. त्यामुळे रब्बी हंगामातील धानाला सुध्दा तो लागू राहिल अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र रब्बी हंगामातील धानाला बोनस मिळणार नसल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाºयांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड