शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

डुकरांच्या उपद्रवामुळे भातपिकांची नासाडी

By admin | Updated: November 25, 2014 22:58 IST

डुकरांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. धानाच्या नासाडीसह नागरिकांचा परिवार असुरक्षित झाला आहे. हलक्या धानाच्या नासाडीची आतापर्यंत तिरोडा वनविभागात २५ प्रकरणे नोंद झाली

काचेवानी : डुकरांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. धानाच्या नासाडीसह नागरिकांचा परिवार असुरक्षित झाला आहे. हलक्या धानाच्या नासाडीची आतापर्यंत तिरोडा वनविभागात २५ प्रकरणे नोंद झाली असून भारी धानाची नासाडी डुकरांनी सर्वाधिक केली आहे. डुकरांच्या नासाडीची प्रकरणे २०० च्या वर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वनविभागाकडून मिळणारी नुकसान भरपाई खूप कमी असून यात वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. काचेवानी परिसरातील बरबसपुरा, मेंदिपूर, इंदोरा, निमगाव, एकोडी, काचेवानी रेल्वे, जमुनिया, बेरडीपार यासह अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतात डुकरांनी धानपिकांची नासाडी केली आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी मिळणे कमी व त्रास अधिक या कारणांमुळे नुकसानभरपाईचे प्रस्तावच सादर केले नाहीत. बरबसपुरा रेल्वे चौकी परिसरात माने परिवाराच्या शेतात डुकरांनी धुमाकूळ केल्याने धानपिकांची नासाडी झाली. बरबसपुरा येथील तुमसरे सहीत १० ते १५ शेतकऱ्यांच्या शेतात डुकरांनी धानपिकाची नासाडी केली आहे. काचेवानी परिसरातील अनेक गावांत डुकरांनी नासाडी केली. डुकरांच्या नासाडी करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी त्रासले आहेत. वनविभागाकडून मिळणारे आर्थिक सहाय्य अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. जंगली डुकरांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने येणाऱ्या दिवसात ही समस्या मोठे रूप घेईल. यावर वनविभागाने रोकथाम करण्याचा प्रयत्न केला नाही तर अनेक गावातील नागरिक आणि त्यांचे कुटुंबीय गंभीर संकटात सापडतील. जंगली डुकरे हिंसक असल्याने शेतकऱ्यांचे कुटुंब शेतात जायला घाबरत असल्याने शेती करणे कठीण होणार आहे. बरबसपुरा रेल्वे गेट परिसरापासून गावातील टोकापर्यंत संपूर्ण कुटुंबे असुरक्षित झाली आहेत. काही अंतरावर काचेवानी झुडपी जंगल असून दिवसाला या परिसरात डुकरे झोप घेतात. रात्रीला आपल्या आहाराकरिता धानाची नासाडी करतात. एवढेच नाही तर घरपरिसरात सुरन, अदरक आणि कोचईच्या जमिनीत असणाऱ्या बिया खोदून खाण्याकरिता धाव घेतात. त्यामुळे रात्रीला परिवारातील सदस्य घराबाहेर निघण्यास घाबरत आहेत. डुकरांचे उपद्रव थांबविण्याबाबत वनविभागाला विचारले असता डुकरांनी नासाडी केली, त्याची भरपाई आकारून देण्याचे अधिकार आहेत. मात्र त्यांचा बंदोबस्त कसा करता येईल, हे आपल्याकडे शासनाने अधिकार दिले नाहीत. वन्यजीव कायद्यानुसार त्यांना मारता येत नाही. सुरक्षात्मक उपाय म्हणून काहीही सांगता येणार नाही, असे वन विभागाकडून सांगण्यात आले. डुकरांचे उत्पात थांबविण्यासाठी नागरिक आणि शेतकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निदर्शनात ही बाब आणूण देणे गरजेचे आहे. ते ही समस्या शासन दरबारी ठेवून याबाबत नवीन कायदा निर्माण झाल्यास त्याप्रमाणे कारवाई करता येईल, असे वनविभागाच्या सूत्रांनी लोकमतजवळ सांगितले आहे. (वार्ताहर)