शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

डुकरांच्या उपद्रवामुळे भातपिकांची नासाडी

By admin | Updated: November 25, 2014 22:58 IST

डुकरांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. धानाच्या नासाडीसह नागरिकांचा परिवार असुरक्षित झाला आहे. हलक्या धानाच्या नासाडीची आतापर्यंत तिरोडा वनविभागात २५ प्रकरणे नोंद झाली

काचेवानी : डुकरांच्या उपद्रवामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. धानाच्या नासाडीसह नागरिकांचा परिवार असुरक्षित झाला आहे. हलक्या धानाच्या नासाडीची आतापर्यंत तिरोडा वनविभागात २५ प्रकरणे नोंद झाली असून भारी धानाची नासाडी डुकरांनी सर्वाधिक केली आहे. डुकरांच्या नासाडीची प्रकरणे २०० च्या वर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वनविभागाकडून मिळणारी नुकसान भरपाई खूप कमी असून यात वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. काचेवानी परिसरातील बरबसपुरा, मेंदिपूर, इंदोरा, निमगाव, एकोडी, काचेवानी रेल्वे, जमुनिया, बेरडीपार यासह अनेक गावातील शेतकऱ्यांच्या शेतात डुकरांनी धानपिकांची नासाडी केली आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी मिळणे कमी व त्रास अधिक या कारणांमुळे नुकसानभरपाईचे प्रस्तावच सादर केले नाहीत. बरबसपुरा रेल्वे चौकी परिसरात माने परिवाराच्या शेतात डुकरांनी धुमाकूळ केल्याने धानपिकांची नासाडी झाली. बरबसपुरा येथील तुमसरे सहीत १० ते १५ शेतकऱ्यांच्या शेतात डुकरांनी धानपिकाची नासाडी केली आहे. काचेवानी परिसरातील अनेक गावांत डुकरांनी नासाडी केली. डुकरांच्या नासाडी करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकरी त्रासले आहेत. वनविभागाकडून मिळणारे आर्थिक सहाय्य अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. जंगली डुकरांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने येणाऱ्या दिवसात ही समस्या मोठे रूप घेईल. यावर वनविभागाने रोकथाम करण्याचा प्रयत्न केला नाही तर अनेक गावातील नागरिक आणि त्यांचे कुटुंबीय गंभीर संकटात सापडतील. जंगली डुकरे हिंसक असल्याने शेतकऱ्यांचे कुटुंब शेतात जायला घाबरत असल्याने शेती करणे कठीण होणार आहे. बरबसपुरा रेल्वे गेट परिसरापासून गावातील टोकापर्यंत संपूर्ण कुटुंबे असुरक्षित झाली आहेत. काही अंतरावर काचेवानी झुडपी जंगल असून दिवसाला या परिसरात डुकरे झोप घेतात. रात्रीला आपल्या आहाराकरिता धानाची नासाडी करतात. एवढेच नाही तर घरपरिसरात सुरन, अदरक आणि कोचईच्या जमिनीत असणाऱ्या बिया खोदून खाण्याकरिता धाव घेतात. त्यामुळे रात्रीला परिवारातील सदस्य घराबाहेर निघण्यास घाबरत आहेत. डुकरांचे उपद्रव थांबविण्याबाबत वनविभागाला विचारले असता डुकरांनी नासाडी केली, त्याची भरपाई आकारून देण्याचे अधिकार आहेत. मात्र त्यांचा बंदोबस्त कसा करता येईल, हे आपल्याकडे शासनाने अधिकार दिले नाहीत. वन्यजीव कायद्यानुसार त्यांना मारता येत नाही. सुरक्षात्मक उपाय म्हणून काहीही सांगता येणार नाही, असे वन विभागाकडून सांगण्यात आले. डुकरांचे उत्पात थांबविण्यासाठी नागरिक आणि शेतकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निदर्शनात ही बाब आणूण देणे गरजेचे आहे. ते ही समस्या शासन दरबारी ठेवून याबाबत नवीन कायदा निर्माण झाल्यास त्याप्रमाणे कारवाई करता येईल, असे वनविभागाच्या सूत्रांनी लोकमतजवळ सांगितले आहे. (वार्ताहर)