शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

भातपिकाचे क्षेत्र वाढणार

By admin | Updated: November 24, 2014 22:58 IST

खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने धानपिकाच्या उत्पादनात यावर्षी घट येत असली तरी शेतकऱ्यांना रबी हंगामाची आशा आहे. सध्या सर्वांच्या नजरा रबी हंगामातील धानपिकांकडे वळल्या आहेत.

रबी हंगामाचे नियोजन : कडधान्य, गव्हाचीही लागवड वाढणारदेवानंद शहारे - गोंदियाखरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने धानपिकाच्या उत्पादनात यावर्षी घट येत असली तरी शेतकऱ्यांना रबी हंगामाची आशा आहे. सध्या सर्वांच्या नजरा रबी हंगामातील धानपिकांकडे वळल्या आहेत. त्यामुळे यावर्षी रबी हंगामात धानपिकाचे क्षेत्र वाढणार असून त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. जिल्ह्यात रबी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ३४ हजार २०० हेक्टर आहे. मात्र जिल्हा कृषी कार्यालयाने यंदा रबी पिकाच्या सर्वसाधारण क्षेत्रात वाढ करून ५१ हजार ५०० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. त्यामुळे रबीच्या पिकांमधून तरी कर्जमुक्ती होईल, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.सर्वसाधारणपणे रबी पिकांमध्ये गहू, हरभरा, जवस, भाजीपाला, उन्हाळी भातपिकांसह इतर कडधान्य पिकांचा समावेश असतो. कडधान्य पिकांमध्ये लाखोळी, वाल, वटाणा, चवळी, मूग, उडीद व पोपट या पिकांचा समावेश आहे. सन २०१२-१३ मध्ये जिल्ह्यात एकूण ४४ हजार हेक्टरमध्ये रबी पिकांचे उत्पादन घेण्यात आले होते. यात गव्हाची लागवड दोन हजार ३७२ हेक्टर क्षेत्रात तर हरभऱ्याची लागवड सहा हजार ७९४ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली होती. जवस पिकाची लागवड आठ हजार १४५ हेक्टर क्षेत्रात, भाजीपाला दोन हजार ०७४ हेक्टर क्षेत्रात तर उन्हाळी भातपिकाची लागवड ११ हजार ५०७ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली होती. याशिवाय लाखोळी, वाल, वटाणा, चवळी, मूग, उळीद व पोपट या इतर कडधान्य पिकांची लागवड १९ हजार ९०७ हेक्टर क्षेत्रामध्ये करण्यात आली होती.विशेष म्हणजे सन २०१२-१३ मध्ये लागवड झालेल्या रबी पिकांच्या क्षेत्रात सन २०१३-१४ मध्ये नऊ हजार ५७४ हेक्टरने वाढ झाली. यात हंगामात जिल्ह्यात एकूण ५३ हजार ५७८ हेक्टर क्षेत्रात रबीचे पीक घेण्यात आले. यात गहू दोन हजार ६६८ हेक्टरमध्ये, हरभरा सात हजार ८४१ हेक्टरमध्ये, जवस आठ हजार ८१२ हेक्टरमध्ये, भाजीपाला दोन हजार ३६८ हेक्टरमध्ये तर उन्हाळी भातपिकाची लागवड १८ हजार १०९ हेक्टर क्षेत्रामध्ये करण्यात आली होती. तसेच इतर कडधान्य पिकांमध्ये लाखोळी, वाल, वटाणा, चवळी, मूग, उळीद व पोपट यांची लागवड १० हजार ८०० हेक्टरमध्ये करण्यात आली होती.