शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

भातपिकाचे क्षेत्र वाढणार

By admin | Updated: November 24, 2014 22:58 IST

खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने धानपिकाच्या उत्पादनात यावर्षी घट येत असली तरी शेतकऱ्यांना रबी हंगामाची आशा आहे. सध्या सर्वांच्या नजरा रबी हंगामातील धानपिकांकडे वळल्या आहेत.

रबी हंगामाचे नियोजन : कडधान्य, गव्हाचीही लागवड वाढणारदेवानंद शहारे - गोंदियाखरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने धानपिकाच्या उत्पादनात यावर्षी घट येत असली तरी शेतकऱ्यांना रबी हंगामाची आशा आहे. सध्या सर्वांच्या नजरा रबी हंगामातील धानपिकांकडे वळल्या आहेत. त्यामुळे यावर्षी रबी हंगामात धानपिकाचे क्षेत्र वाढणार असून त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. जिल्ह्यात रबी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ३४ हजार २०० हेक्टर आहे. मात्र जिल्हा कृषी कार्यालयाने यंदा रबी पिकाच्या सर्वसाधारण क्षेत्रात वाढ करून ५१ हजार ५०० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. त्यामुळे रबीच्या पिकांमधून तरी कर्जमुक्ती होईल, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.सर्वसाधारणपणे रबी पिकांमध्ये गहू, हरभरा, जवस, भाजीपाला, उन्हाळी भातपिकांसह इतर कडधान्य पिकांचा समावेश असतो. कडधान्य पिकांमध्ये लाखोळी, वाल, वटाणा, चवळी, मूग, उडीद व पोपट या पिकांचा समावेश आहे. सन २०१२-१३ मध्ये जिल्ह्यात एकूण ४४ हजार हेक्टरमध्ये रबी पिकांचे उत्पादन घेण्यात आले होते. यात गव्हाची लागवड दोन हजार ३७२ हेक्टर क्षेत्रात तर हरभऱ्याची लागवड सहा हजार ७९४ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली होती. जवस पिकाची लागवड आठ हजार १४५ हेक्टर क्षेत्रात, भाजीपाला दोन हजार ०७४ हेक्टर क्षेत्रात तर उन्हाळी भातपिकाची लागवड ११ हजार ५०७ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली होती. याशिवाय लाखोळी, वाल, वटाणा, चवळी, मूग, उळीद व पोपट या इतर कडधान्य पिकांची लागवड १९ हजार ९०७ हेक्टर क्षेत्रामध्ये करण्यात आली होती.विशेष म्हणजे सन २०१२-१३ मध्ये लागवड झालेल्या रबी पिकांच्या क्षेत्रात सन २०१३-१४ मध्ये नऊ हजार ५७४ हेक्टरने वाढ झाली. यात हंगामात जिल्ह्यात एकूण ५३ हजार ५७८ हेक्टर क्षेत्रात रबीचे पीक घेण्यात आले. यात गहू दोन हजार ६६८ हेक्टरमध्ये, हरभरा सात हजार ८४१ हेक्टरमध्ये, जवस आठ हजार ८१२ हेक्टरमध्ये, भाजीपाला दोन हजार ३६८ हेक्टरमध्ये तर उन्हाळी भातपिकाची लागवड १८ हजार १०९ हेक्टर क्षेत्रामध्ये करण्यात आली होती. तसेच इतर कडधान्य पिकांमध्ये लाखोळी, वाल, वटाणा, चवळी, मूग, उळीद व पोपट यांची लागवड १० हजार ८०० हेक्टरमध्ये करण्यात आली होती.