शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

भातपिकाचे क्षेत्र वाढणार

By admin | Updated: November 24, 2014 22:58 IST

खरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने धानपिकाच्या उत्पादनात यावर्षी घट येत असली तरी शेतकऱ्यांना रबी हंगामाची आशा आहे. सध्या सर्वांच्या नजरा रबी हंगामातील धानपिकांकडे वळल्या आहेत.

रबी हंगामाचे नियोजन : कडधान्य, गव्हाचीही लागवड वाढणारदेवानंद शहारे - गोंदियाखरीप हंगामात पावसाने दगा दिल्याने धानपिकाच्या उत्पादनात यावर्षी घट येत असली तरी शेतकऱ्यांना रबी हंगामाची आशा आहे. सध्या सर्वांच्या नजरा रबी हंगामातील धानपिकांकडे वळल्या आहेत. त्यामुळे यावर्षी रबी हंगामात धानपिकाचे क्षेत्र वाढणार असून त्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केले आहे. जिल्ह्यात रबी हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ३४ हजार २०० हेक्टर आहे. मात्र जिल्हा कृषी कार्यालयाने यंदा रबी पिकाच्या सर्वसाधारण क्षेत्रात वाढ करून ५१ हजार ५०० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. त्यामुळे रबीच्या पिकांमधून तरी कर्जमुक्ती होईल, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.सर्वसाधारणपणे रबी पिकांमध्ये गहू, हरभरा, जवस, भाजीपाला, उन्हाळी भातपिकांसह इतर कडधान्य पिकांचा समावेश असतो. कडधान्य पिकांमध्ये लाखोळी, वाल, वटाणा, चवळी, मूग, उडीद व पोपट या पिकांचा समावेश आहे. सन २०१२-१३ मध्ये जिल्ह्यात एकूण ४४ हजार हेक्टरमध्ये रबी पिकांचे उत्पादन घेण्यात आले होते. यात गव्हाची लागवड दोन हजार ३७२ हेक्टर क्षेत्रात तर हरभऱ्याची लागवड सहा हजार ७९४ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली होती. जवस पिकाची लागवड आठ हजार १४५ हेक्टर क्षेत्रात, भाजीपाला दोन हजार ०७४ हेक्टर क्षेत्रात तर उन्हाळी भातपिकाची लागवड ११ हजार ५०७ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली होती. याशिवाय लाखोळी, वाल, वटाणा, चवळी, मूग, उळीद व पोपट या इतर कडधान्य पिकांची लागवड १९ हजार ९०७ हेक्टर क्षेत्रामध्ये करण्यात आली होती.विशेष म्हणजे सन २०१२-१३ मध्ये लागवड झालेल्या रबी पिकांच्या क्षेत्रात सन २०१३-१४ मध्ये नऊ हजार ५७४ हेक्टरने वाढ झाली. यात हंगामात जिल्ह्यात एकूण ५३ हजार ५७८ हेक्टर क्षेत्रात रबीचे पीक घेण्यात आले. यात गहू दोन हजार ६६८ हेक्टरमध्ये, हरभरा सात हजार ८४१ हेक्टरमध्ये, जवस आठ हजार ८१२ हेक्टरमध्ये, भाजीपाला दोन हजार ३६८ हेक्टरमध्ये तर उन्हाळी भातपिकाची लागवड १८ हजार १०९ हेक्टर क्षेत्रामध्ये करण्यात आली होती. तसेच इतर कडधान्य पिकांमध्ये लाखोळी, वाल, वटाणा, चवळी, मूग, उळीद व पोपट यांची लागवड १० हजार ८०० हेक्टरमध्ये करण्यात आली होती.