शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

जलसंकट दूर करणे आमचे प्रथम लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 22:17 IST

आज संपूर्ण जगात पाणी टंचाई भासत आहे. मानवी जीवनात पाण्याचे खूप महत्व आहे. पाण्याशिवाय मनुष्य जीवनाची कल्पनाच करता येत नाही. त्यामुळेच गोंदिया विधानसभा क्षेत्रात जलसंकटावर मात करणे, आमचे प्रथम लक्ष्य आहे, ....

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : हिवरा येथे पाणी पुरवठा योजनेच्या बांधकामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आज संपूर्ण जगात पाणी टंचाई भासत आहे. मानवी जीवनात पाण्याचे खूप महत्व आहे. पाण्याशिवाय मनुष्य जीवनाची कल्पनाच करता येत नाही. त्यामुळेच गोंदिया विधानसभा क्षेत्रात जलसंकटावर मात करणे, आमचे प्रथम लक्ष्य आहे, असे प्रतिपादन आ. गोपालदास अग्रवाल यांनी केले.आ. अग्रवाल यांच्या प्रयत्नांनी ८० लाख रूपयांच्या खर्चाचे मंजूर ग्राम हिवरा येथे पेयजल पुरवठा योजनेच्या नवीन जलस्त्रोतांर्गत विहीर व पुरवठा पाईप लाईन बांधकाम, तीन लाखांच्या आमदार निधीतून मंजूर राणी अवंतीबाई स्मारकाजवळ सभामंडप बांधकाम व तीन लाखांच्या निधीतून मंजूर जनसुविधा योजनेंतर्गत स्मशान रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आ. गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्ष सीमा मडावी होते. अतिथी म्हणून जि.प. सभापती रमेश अंबुले, जि.प. सभापती लता दोनोडे, पं.स. सभापती माधुरी हरिणखेडे, पं.स. उपसभापती चमन बिसेन, प्रकाश रहमतकर, कृउबासचे उपसभापती धनलाल ठाकरे, सरपंच सजिव लिल्हारे, उपसरपंच विशाल साखरे, ग्रा.पं. सदस्य फुलचंद बन्नोटे, श्वेता वंजारी, माधुरी धारणे, प्रमिला भास्कर, तरूणा साखरे, सरोज लिल्हारे, कनेरलाल पिसोडे, राजेशसिंग परिहार, पोलीस पाटील विनोद नंदेश्वर, फागुलाल माहुले, सूर्यभान टेंभुरकर, सुखदेव ढोमणे, डॉ.एम.बी. ठाकरे, तेजलाल गहगये, जिवनलाल लिल्हारे, अरविंद धमगाये, रंजित नंदेश्वर, श्यामकुवर अंबादे, आनंद बनोटे, राजेंद्र दरवडे, खिमनलाल माहुले, साहेबलाल पिसोडे, मनोहरलाल पिसोडे, शिवचरण पिसोडे, मनोज शहारे, खुमेश ठाकरे उपस्थित होते.आ. अग्रवाल पुढे म्हणाले, गोंदिया विधानसभा क्षेत्रात विकास कार्यांसहच पाणी पुरवठ्यासाठी शासनाच्या योजनांच्या माध्यमातून सर्व नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील आहोत.तसेच परिसरातील शेतकऱ्यांना अधिकाधिक सिंचन सुविधा मिळाव्या यासाठी बाघ प्रकल्पाच्या सर्वच कालव्यांचे दुरूस्ती कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भविष्यात या सर्व कालव्यांतून प्रत्येक शेतकºयाला सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी प्रयत्नशील आहोत.रस्त्यांच्या विकासावर बोलताना ते म्हणाले, रस्त्यांच्या विकासाकडे आमचे सर्वाधिक लक्ष असते. जेथे रस्ते नाही, तेथे नाते नाही व रस्त्यांच्या माध्यमातूनच परिसरात समृद्धी येते, असे त्यांनी सांगितले.या वेळी जि.प. अध्यक्ष सीमा मडावी म्हणाल्या, सतत विकास कामे आणून या क्षेत्राला सुजलाम सुफलाम करण्याचे आ. अग्रवाल यांचे धोरण आहे. मतदारांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी केली आहे.राज्यात कोणत्याही पक्षाची सरकार असो, गोंदिया विधानसभा क्षेत्रातील विकासाची गती थांबली नाही. राज्य व केंद्र शासनाच्या विकासाच्या योजनांना शासनाशी संघर्ष करून आपल्या क्षेत्रातील नागरिकांपर्यंत पोहोचविल्या, असे त्या म्हणाल्या.या वेळी सरपंच संजिव लिल्हारे, धनलाल ठाकरे यांनीसुद्धा आपल्या मार्गदर्शनात आ. अग्रवाल यांनी केलेल्या विकास कार्यांवर प्रकाश टाकला.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल