शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सेंद्रिय शेती शेतकऱ्यांसाठी वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 01:04 IST

शेतजमिनीतून मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन होण्यासाठी शेतकरी रासायनिक खते, विविध किटकनाशक औषधांचा वापर करीत आहे. आवश्यकतेपेक्षा अधिक रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीची पोत कमी खालावत चालली आहे.

ठळक मुद्देविलास कोहाडे : प्रशिक्षण कार्यक्रमात माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : शेतजमिनीतून मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन होण्यासाठी शेतकरी रासायनिक खते, विविध किटकनाशक औषधांचा वापर करीत आहे. आवश्यकतेपेक्षा अधिक रासायनिक खतांचा वापर केल्याने जमिनीची पोत कमी खालावत चालली आहे. त्याचाच परिणाम जमिनीच्या आरोग्यावर होत आहे. या बाबीवर मात करण्यासाठी तसेच आरोग्य सुदृढ राहण्यासाठी सेंद्रिय शेती शेतकºयांसाठी वरदान असल्याचे प्रतिपादन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे यांनी केले.बुधेवाडा येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालय अर्जुनी-मोरगाव व आत्मा यांच्या विद्यमाने आयोजित सेंद्रिय शेती प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती) सन २०१८-१९ अंतर्गत बुधेवाडा येथे ५० शेतकºयांचा गट स्थापन करुन त्या शेतकºयांना आत्मा व कृषी विभागामार्फत सेंद्रीय शेती संबंधी प्रशिक्षण देण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विलास कोहाडे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक घनशाम चचाणे, कृषी सहायक भारती येवले उपस्थित होते. सेंद्रीय शेती प्रशिक्षणात सहभागी झालेल्या शेतकºयांना मार्गदर्शन करताना कोहाडे म्हणाले, दिवसेंदिवस शेतीस लागणाऱ्या खतावरील खर्च वाढत आहे.रासायनिक खते व औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने जमिनीचे आरोग्य खालावले, पाणी दूषीत झाले तर वातावरणावर त्याचे विपरीत परिणाम होत आहे. उत्पादीत शेतमाल विषयुक्त निर्माण झाल्याने त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. यावर रामबाण उपाय सेंद्रीय शेती हे असल्याचे सांगून त्यांनी सेंद्रीय शेतीचे महत्व, फायदे सेंद्रीय अन्नधान्याची मागणी, रासायनिक खते, औषधी यापासून होणारे दुष्परिणाम सांगीतले. तसेच यासाठी शासनातर्फे दिल्या जाणाºया अनुदानाची माहिती दिली. घनशाम चचाणे यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे दर्शनी अर्क, जीवामृत, बिजामृत कसे तयार करायचे ते प्रशिक्षणार्थ्यांना करुन दाखविले. कृषी सहायक भारती येरणे यानी सेंद्रीय शेती शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी असल्याचे सांगितले.

टॅग्स :agricultureशेती