शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

पणन विभागाचा अफलातून आदेश : शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँक खात्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 11:59 IST

शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतमालाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकेचे खाते उघडणे अनिवार्य करण्याचे निर्देश पणन विभागाने दिले आहेत.

ठळक मुद्देशासकीय धान खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : निसर्ग कोपल्याने आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आता शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका सहन करण्याची वेळ आली आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतमालाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकेचे खाते उघडणे अनिवार्य करण्याचे निर्देश पणन विभागाने दिले आहे.त्यामुळे शेतमाल विक्री करायला नेण्यापूर्वी आता शेतकऱ्यांना राष्ट्रियीकृत बँकेत जावून खाते उघडावे लागणार आहे. यावर्षी शासनाने अ दर्जाच्या धानाला १७७० तर सर्वसाधारण धानाला १७५० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. सध्या खरीपातील हलके धान निघाले असून शेतकरी धानाची मळणी करुन दिवाळी सण साजरा करतात. खासगी व्यापारी सुरूवातीच्या काळात धानाला चांगला भाव देत नाही. त्यामुळे शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करतात. मात्र यंदा खरेदी केंद्रावर धान विक्रीस नेण्यापूर्वी शेतकऱ्यांना राष्ट्रियीकृत बँकेत स्वत:चे खाते उघडावे लागणार आहे. तसे आदेश पणन विभागाने काढले आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक खाते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आहेत. या बँकेत राष्ट्रियीकृत बँकासारखी किचकट प्रक्रिया पार पाडावी लागत नाही. त्यामुळे ही बँक शेतकऱ्यांना आपली वाटते. शिवाय सर्वाधिक पीक कर्जाची उचल सुध्दा शेतकरी याच बँकेतून करतात. त्यामुळे त्यांचे खाते याच बँकेत आहेत. मात्र पणन विभागाने काढलेल्या आदेशात जिल्हा बँकेचे स्वत:चे आयएफसी कोड नसल्याने या बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास अडचण निर्माण होत असल्याचे कारण पुढे केले आहे.दरम्यान हे आदेश जिल्ह्यातील धान खरेदी करणाऱ्या संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या हाती पडताच त्यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. राष्ट्रियीकृत बँकेत उघडण्याची सक्ती करणे चुकीचे असून शेतकऱ्यांना आपली कामे बाजुला ठेवून बँकेत खाते उघडण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.त्यामुळे आधीच निसर्ग कोपल्याने संकटात असलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका सहन करावा लागत आहे.

जिल्हा बँकेचे महत्त्व कमी करण्याचा डावशासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना राष्ट्रियीकृत बँकेत खाते उघडणे अनिवार्य करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त असून हा शासनाचा जिल्हा बँकेचे खच्चिकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप केला जात आहे.

शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभाव मिळण्याची खात्री असल्याने शेतकरी या केंद्रावर धानाची विक्री करतात. जिल्ह्यातील बहुतेक शेतकऱ्यांचे बँक खाते जिल्हा बँकेत आहेत. मात्र पणन विभागाच्या नवीन आदेशामुळे शेतकऱ्यांना राष्ट्रियीकृत बँकेत खाते उघडावे लागणार आहे. त्यामुळे हा निर्णय अन्यायकारक असून तो त्वरीत मागे घ्यावा.अन्यथा या विरोधात आंदोलन छेडू.- डॉ.अविनाश काशिवार,कृउबा सभापती.

जिल्हा बँकेचे आयएफसी कोड नसल्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याची अडचण जाते. त्यामुळे राष्ट्रियीकृत बँके खाते असल्यास त्वरीत रक्कम जमा करणे शक्य होईल. ज्या शेतकऱ्यांचे राष्ट्रियीकृत बँकेत खाते नसेल त्यांनाही शेतमालाची विक्री करता येईल. खाते उघडण्याची सक्ती नाही.- प्रमोद हुमणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी