शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पणन विभागाचा अफलातून आदेश : शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँक खात्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 11:59 IST

शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतमालाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकेचे खाते उघडणे अनिवार्य करण्याचे निर्देश पणन विभागाने दिले आहेत.

ठळक मुद्देशासकीय धान खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : निसर्ग कोपल्याने आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांना आता शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका सहन करण्याची वेळ आली आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतमालाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकेचे खाते उघडणे अनिवार्य करण्याचे निर्देश पणन विभागाने दिले आहे.त्यामुळे शेतमाल विक्री करायला नेण्यापूर्वी आता शेतकऱ्यांना राष्ट्रियीकृत बँकेत जावून खाते उघडावे लागणार आहे. यावर्षी शासनाने अ दर्जाच्या धानाला १७७० तर सर्वसाधारण धानाला १७५० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. सध्या खरीपातील हलके धान निघाले असून शेतकरी धानाची मळणी करुन दिवाळी सण साजरा करतात. खासगी व्यापारी सुरूवातीच्या काळात धानाला चांगला भाव देत नाही. त्यामुळे शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करतात. मात्र यंदा खरेदी केंद्रावर धान विक्रीस नेण्यापूर्वी शेतकऱ्यांना राष्ट्रियीकृत बँकेत स्वत:चे खाते उघडावे लागणार आहे. तसे आदेश पणन विभागाने काढले आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक खाते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आहेत. या बँकेत राष्ट्रियीकृत बँकासारखी किचकट प्रक्रिया पार पाडावी लागत नाही. त्यामुळे ही बँक शेतकऱ्यांना आपली वाटते. शिवाय सर्वाधिक पीक कर्जाची उचल सुध्दा शेतकरी याच बँकेतून करतात. त्यामुळे त्यांचे खाते याच बँकेत आहेत. मात्र पणन विभागाने काढलेल्या आदेशात जिल्हा बँकेचे स्वत:चे आयएफसी कोड नसल्याने या बँकेत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास अडचण निर्माण होत असल्याचे कारण पुढे केले आहे.दरम्यान हे आदेश जिल्ह्यातील धान खरेदी करणाऱ्या संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांच्या हाती पडताच त्यांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. राष्ट्रियीकृत बँकेत उघडण्याची सक्ती करणे चुकीचे असून शेतकऱ्यांना आपली कामे बाजुला ठेवून बँकेत खाते उघडण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.त्यामुळे आधीच निसर्ग कोपल्याने संकटात असलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या चुकीच्या धोरणाचा फटका सहन करावा लागत आहे.

जिल्हा बँकेचे महत्त्व कमी करण्याचा डावशासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना राष्ट्रियीकृत बँकेत खाते उघडणे अनिवार्य करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त असून हा शासनाचा जिल्हा बँकेचे खच्चिकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप केला जात आहे.

शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभाव मिळण्याची खात्री असल्याने शेतकरी या केंद्रावर धानाची विक्री करतात. जिल्ह्यातील बहुतेक शेतकऱ्यांचे बँक खाते जिल्हा बँकेत आहेत. मात्र पणन विभागाच्या नवीन आदेशामुळे शेतकऱ्यांना राष्ट्रियीकृत बँकेत खाते उघडावे लागणार आहे. त्यामुळे हा निर्णय अन्यायकारक असून तो त्वरीत मागे घ्यावा.अन्यथा या विरोधात आंदोलन छेडू.- डॉ.अविनाश काशिवार,कृउबा सभापती.

जिल्हा बँकेचे आयएफसी कोड नसल्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याची अडचण जाते. त्यामुळे राष्ट्रियीकृत बँके खाते असल्यास त्वरीत रक्कम जमा करणे शक्य होईल. ज्या शेतकऱ्यांचे राष्ट्रियीकृत बँकेत खाते नसेल त्यांनाही शेतमालाची विक्री करता येईल. खाते उघडण्याची सक्ती नाही.- प्रमोद हुमणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.

टॅग्स :GovernmentसरकारFarmerशेतकरी