शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
4
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
5
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
6
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
7
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
8
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
9
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
10
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
11
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
12
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
13
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
14
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
15
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
16
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
17
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
18
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
19
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
20
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावरील पदार्थ देत आहेत आजाराला आमत्रंण

By admin | Updated: June 22, 2014 00:04 IST

पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. पावसाच्या दिवसात रस्त्याच्या कडेला असलेल्या टपऱ्या व हॉटेलमध्ये गरमागरम पदार्थ खान्याची आवड सर्वांनाच असते. मात्र या पदार्थांचे सेवन करीत असताना

गोंदिया : पावसाळ्याला सुरूवात झाली आहे. पावसाच्या दिवसात रस्त्याच्या कडेला असलेल्या टपऱ्या व हॉटेलमध्ये गरमागरम पदार्थ खान्याची आवड सर्वांनाच असते. मात्र या पदार्थांचे सेवन करीत असताना आपण कदाचीत आजाराला आमत्रंण देत आहोत, ही बाब विसरतो. यामुळेच पावसाळ्यात उघड्यावरील पदार्थांच्या सेवनामुळे आजारांच्या प्रमाणात वाढ होत आहे. पावसाळ्याच्या दिवसात कावीळ, अतीसार, कॅलरा व पोटाच्या आजारांची लागण होते. यालाही काही प्रमाणात अस्वच्छता व उघड्यावरील पदार्थांचे सेवन कारणीभूत आहे. नागरिक देखील आपल्या धावपळीत व हौस भागवायची म्हणून रस्त्यावर विकल्या जाणाऱ्या पदार्थांचे सर्रासपणे सेवन करतात. मात्र या पदार्थांचे सेवन करताना आरोग्याच्या दृष्टीकोनातून व स्वच्छतेबाबत नियमांचे पालन केले जाते आहे की नाही याची खबरदारी घेत नाही. रस्त्याच्या बाजुला असलेल्या दुकानातून केवळ १० रुपयात घेतलेला नास्ता आजाराला आमत्रंण देऊ शकतो या बाबीकडे नागरीक दुर्लक्ष करीत असतात यातूनच आपण या विविध आजारांना आमत्रंण देत असतो.जिल्ह्यात शेकडो हॉटेल व रेस्टॉरेंट आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने हॉटेल व उपहारगृहांना परवाने देताना काही नियम लागू केले आहेत. त्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असून याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करुन हॉटेल व उपहारगृहाचा परवाना रद्द करण्यात येतो. नगर परिषद अधिनियम १९६५ च्या कलम २७४, २७५ नुसार खानावळ, उपहारगृह, हॉटेल चालविणाऱ्या संचालकाकडून केर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने व अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास त्यांच्यावर या कलमान्वये कारवाई करण्याची तरतुद आहे. इंडियन पिनल कोड च्या कलम ७२ व ७३ नुसार खराब मिठाई व मानवी शरिरास अपायकारक असणाऱ्या पदार्थांची विक्री करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. हे नियम जरी असले तरी नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासनाचे या बाबींकडे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील भाजीबाजार असो की मुख्य रस्त्यांच्या बाजुला काही लोकांनी थाटलेले छोटेसे उपहागृह असो. उपहारगृह चालकांना परवाना घेताना ज्या नियम व अटींचे पालन करण्यास सांगण्यात आले होते त्या नियमांचे देखील पालन करणे आवश्यक आहे मात्र या व्यावसायीकांकडून या नियमांचे सर्रासपणे उल्लघंन केले जात असल्याचे चित्र दिसून येते.शहरात बहुतेक ठिकाणी घाणीच्या साम्राज्यात काही उपहार गृह व टपऱ्यावरील दुकानादार पदार्थ विकत असल्याचे दिसून येते. या व्यावसायीकांनी स्वच्छतेच्या बाबींकडे पूर्णत; दुर्लक्ष केले असल्याने या पदार्थांचे सेवन करणारे नागरिक मात्र विविध आजाराला बळी पडत आहे. सर्व उपहारगृह व हॉटेलात नियमांचे उल्लघंन केले जात असताना संबंधीत विभागाने मात्र अद्यापही कुठल्याही उपहारगृह चालकावर कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. पावसळ््यात तर डास व माश्यांचा प्रकोप वाढतो. डास व माश्या आजारांचे वाहक असून पावसाळ्यात खानपानाच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याचा सल्ला डॉक्टर देतात. स्वच्छता न पाळल्यास खानपानातून विविध आजार बळावतात. मात्र हॉटेल वाल्यांना त्याच्याशी काही घेणे देणे नसते. त्यांना फक्त तयार केलेले खाद्य पदार्थ विकायचे असल्याने ते या भानगडीत पडत नाही. मात्र नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात. याकडे अन्न व औषध विभाग तसेच नगर परिषदेच्या अधिकाऱ्याचे मात्र पूर्णत: दुर्लक्ष झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे चित्र आहे. (शहर प्रतिनिधी)