शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

अबब...! दोनच अधिकाऱ्यांवर तालुक्याच्या भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 15:26 IST

देवरी तालुक्यात एक तहसील कार्यालय व अप्पर तहसील कार्यालय असून, फक्त दोनच अधिकारी असल्याने नागरिकांची कामे वेळेवर होत नाही. ककोडीसारख्या दुर्गम भागातील नागरिकांना तहसील कार्यालयात येऊन वेळ वाया घालवावा लागत आहे.

ठळक मुद्देदुर्गम भागातील नागरिकांची कामे खोळंबली : आमदार-खासदार अनभिज्ञ

गोंदिया : देवरी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांचेच पद रिक्त असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून, कामे खोळंबली आहेत. नागरिकांना कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. तहसील कार्यालयातील तहसीलदारांचा प्रभार नायब तहसीलदार सांभाळीत आहेत. येथे कुणीही जबाबदार अधिकारी नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

तालुका विविध गौण खनिज संपत्तीने भरलेला आहे. मात्र या खनिजांचे रक्षण करणारे महसूल विभागाचे अधिकारीच नसल्याने अवैधरीत्या गौण खनिजांची तस्करी करणाऱ्यांची मज्जाच मज्जा असल्याने सर्वत्र चर्चेला ऊत आला आहे. या सर्व बाबींकडे जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी लक्ष वेधून देवरी तहसील कार्यालयातील व अप्पर तहसील कार्यालय चिचगड येथील सर्व अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे.

तहसील कार्यालयातील दोन्ही अधिकारी दिवसभर नागरिकांची कामे करीत असून, कार्यालयातील कामाच्या अतिताणामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवत आहे. देवरी तालुक्यात ५५ ग्रामपंचायती असून, विविध गावांतील जनता आपल्या कामासाठी तहसील कार्यालयात येतात. महसुली कामे यासह शालेय विद्यार्थ्यांसाठी लागणारे विविध दाखले या सर्व बाबींसाठी महत्त्वाचे असलेले तहसीलदार पद गेल्या ८४ दिवसांपासून रिक्त असल्याने प्रभारी नायब तहसीलदारांच्या खांद्यावर तहसीलदार पद व कामांचा ताण वाढत असून, दिवसभर ताटकळत उभे रहावे लागत आहे. तालुक्यात एक तहसील कार्यालय व अप्पर तहसील कार्यालय असून, फक्त दोनच अधिकारी असल्याने नागरिकांची कामे वेळेवर होत नाही. ककोडीसारख्या दुर्गम भागातील नागरिकांना तहसील कार्यालयात येऊन वेळ वाया घालवावा लागत आहे.

लोतप्रतिनिधींचे दुर्लक्ष

याअगोदर तहसील कार्यालयातील इतके पद कधीच रिक्त नव्हते. मात्र राज्यात सत्ताबदल झाल्याने नागरिकांच्या भावनांशी खेळून लोकप्रतिनिधींना आता सर्वसामान्यांच्या कामांबाबत लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. लोकप्रतिनिधी किती अकार्यक्षम ठरत आहेत यांचे उदाहरण आहे. २-३ महिने रिक्त असलेले तहसीलदारांचे पद व तालुक्यातील दोन्ही कार्यालयांतील रिक्त पदे आपल्या मतदारसंघातील या प्रश्नांबाबात कोणतीही कल्पना नाही का ? अशा प्रश्न तालुकावासीयांनी उपस्थित केला आहे.

देवरी तहसील कार्यालयातील वाढती कामे प्रभारी अधिकाऱ्यांवर पडत असून, जमिनीचे दावे, शालेय दाखले, गौण खनिज आदी विविध विषयांसह जिल्हा मुख्यालयातील बैठका या सर्वच वाढत्या कामामुळे लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी लक्ष वेधून ही सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी सर्वसामान्य जनता करीत आहे.

टॅग्स :Governmentसरकार