शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

अबब...! दोनच अधिकाऱ्यांवर तालुक्याच्या भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2021 15:26 IST

देवरी तालुक्यात एक तहसील कार्यालय व अप्पर तहसील कार्यालय असून, फक्त दोनच अधिकारी असल्याने नागरिकांची कामे वेळेवर होत नाही. ककोडीसारख्या दुर्गम भागातील नागरिकांना तहसील कार्यालयात येऊन वेळ वाया घालवावा लागत आहे.

ठळक मुद्देदुर्गम भागातील नागरिकांची कामे खोळंबली : आमदार-खासदार अनभिज्ञ

गोंदिया : देवरी तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांचेच पद रिक्त असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून, कामे खोळंबली आहेत. नागरिकांना कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. तहसील कार्यालयातील तहसीलदारांचा प्रभार नायब तहसीलदार सांभाळीत आहेत. येथे कुणीही जबाबदार अधिकारी नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

तालुका विविध गौण खनिज संपत्तीने भरलेला आहे. मात्र या खनिजांचे रक्षण करणारे महसूल विभागाचे अधिकारीच नसल्याने अवैधरीत्या गौण खनिजांची तस्करी करणाऱ्यांची मज्जाच मज्जा असल्याने सर्वत्र चर्चेला ऊत आला आहे. या सर्व बाबींकडे जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी लक्ष वेधून देवरी तहसील कार्यालयातील व अप्पर तहसील कार्यालय चिचगड येथील सर्व अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे.

तहसील कार्यालयातील दोन्ही अधिकारी दिवसभर नागरिकांची कामे करीत असून, कार्यालयातील कामाच्या अतिताणामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम जाणवत आहे. देवरी तालुक्यात ५५ ग्रामपंचायती असून, विविध गावांतील जनता आपल्या कामासाठी तहसील कार्यालयात येतात. महसुली कामे यासह शालेय विद्यार्थ्यांसाठी लागणारे विविध दाखले या सर्व बाबींसाठी महत्त्वाचे असलेले तहसीलदार पद गेल्या ८४ दिवसांपासून रिक्त असल्याने प्रभारी नायब तहसीलदारांच्या खांद्यावर तहसीलदार पद व कामांचा ताण वाढत असून, दिवसभर ताटकळत उभे रहावे लागत आहे. तालुक्यात एक तहसील कार्यालय व अप्पर तहसील कार्यालय असून, फक्त दोनच अधिकारी असल्याने नागरिकांची कामे वेळेवर होत नाही. ककोडीसारख्या दुर्गम भागातील नागरिकांना तहसील कार्यालयात येऊन वेळ वाया घालवावा लागत आहे.

लोतप्रतिनिधींचे दुर्लक्ष

याअगोदर तहसील कार्यालयातील इतके पद कधीच रिक्त नव्हते. मात्र राज्यात सत्ताबदल झाल्याने नागरिकांच्या भावनांशी खेळून लोकप्रतिनिधींना आता सर्वसामान्यांच्या कामांबाबत लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. लोकप्रतिनिधी किती अकार्यक्षम ठरत आहेत यांचे उदाहरण आहे. २-३ महिने रिक्त असलेले तहसीलदारांचे पद व तालुक्यातील दोन्ही कार्यालयांतील रिक्त पदे आपल्या मतदारसंघातील या प्रश्नांबाबात कोणतीही कल्पना नाही का ? अशा प्रश्न तालुकावासीयांनी उपस्थित केला आहे.

देवरी तहसील कार्यालयातील वाढती कामे प्रभारी अधिकाऱ्यांवर पडत असून, जमिनीचे दावे, शालेय दाखले, गौण खनिज आदी विविध विषयांसह जिल्हा मुख्यालयातील बैठका या सर्वच वाढत्या कामामुळे लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी लक्ष वेधून ही सर्व रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी सर्वसामान्य जनता करीत आहे.

टॅग्स :Governmentसरकार