शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

फक्त सहा विहिरींचे काम पूर्ण

By admin | Updated: April 27, 2017 00:58 IST

मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात यंदा मागेल त्याला विहीर योजना राबविली जात आहे.

मागेल त्याला विहीर योजना : २२५ लाभार्थ्यांना कामाचे पत्र सालेकसा : मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात यंदा मागेल त्याला विहीर योजना राबविली जात आहे. याअंतर्गत जिल्ह्यात एकूण दोन हजार विहिरींचा लाभ गरजू शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. त्यातच सालेकसा तालुक्याला २५० विहिरींचा लक्ष्य असून एकूण फक्त सहा विहिरींचे काम पूर्ण झालेले आहे. येत्या ४० दिवसात पावसाळा सुरू होण्याची शक्यता असून यावर्षी एकूण २५० विहिरींचे काम पूर्ण होऊन लक्ष्यपूर्ती होणार की नाही, याबद्दल संशय असून अनेक विहिरींचे काम पुढील वर्षापर्यंत लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. मागेल त्याला विहीर योजनेअंतर्गत इच्छुक लाभार्थ्यांना आॅनलाईन अर्ज करण्याची सोय शासनाने उपलब्ध करून दिली होती. सालेकसा तालुक्यात एकूण ३७० लोकांनी विहिरींसाठी अर्ज केला होता. त्यातील जवळपास १९ अर्ज निरस्त झाले होते. उर्वरित ३५० अर्ज पात्र ठरले असून ‘आधी या-आधी घ्या’ या पध्दतीचा अवलंब करीत ज्यांनी प्रथम अर्ज केला अशा २५० लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. त्या अर्जानुसार लाभार्थ्यांच्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यात आतापर्यंत २२५ लाभार्थी योजनेसाठी पात्र ठरले असून टप्याटप्याने आतापर्यंत एकूण २२५ लाभार्थ्यांना वर्क आर्डर जारी करण्यात आले आहेत. परंतु जवळपास २५ अर्ज वेगवेगळ्या कारणाने रद्द होऊ शकतात, हे प्रथम पाहणीनंतर निष्पन्न झाले आहे. यात काही लोकांनी खोटी माहिती दाखवित पूर्वी लाभ घेऊनही अर्ज केला. काहींनी शेततळ्याचा लाभ घेतला आहे. अशा लोकांनासुध्दा नाकारण्यात येत आहे. असे जवळपास २५ अर्ज रद्द होत असून त्या जागी प्रतीक्षा यादीतून अर्ज स्वीकारून त्यांना विहीर मंजूर करण्यात येईल, असे संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. जानेवारी महिन्यापासूनच विहिरीची प्रक्रिया सुरु झाली असली तरी आतापर्यंत फक्त सहा विहिरी पूर्ण झाल्या असून जवळपास २५-३० विहिरीचा काम प्रगतीपथावर आहे. तर इतर १५० पेक्षा जास्त विहिरींचे काम आतापर्यंत सुरूही झाले नाही. त्यामुळे आता यंदा ती कामे पूर्ण होणार, असे वाटत नाही. विहिरींची कामे लांबणीवर जाण्याची अनेक कारणे समोर आली आहेत. यात बांधकाम विभागात मनुष्यबळाचा अभाव असल्याने प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीवर जाऊन विहीर बांधकामासाठी लेआऊट देण्यासाठी विलंब होत आहे. दुसरे महत्वाचे कारण म्हणजे वेळेवर खोदकाम करणारे कंत्राटदार व मजूर उपलब्ध होत नाही. काही लाभार्थ्यांच्या शेतीलगत इतर शेतकऱ्यांच्या शेतीत रबी पीक असून लाभार्थ्यांच्या शेतीत बांधकाम साहित्य पोहचणे शक्य होत नाही. आणखी इतर कारणांमुळे विहिरीच्या कामांना उशीर होत असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)