शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

शासकीय रक्त केंद्रात आठवडाभर पुरेल एवढाच ‘स्टॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:29 IST

गोंदिया : आपण दिलेल्या रक्तामुळे एखाद्याचा जीव वाचविता येऊ शकतो, यामुळेच रक्तदानाला ‘जीवदान’ म्हटले जाते. मात्र मागील वर्षी कोरोनामुळे ...

गोंदिया : आपण दिलेल्या रक्तामुळे एखाद्याचा जीव वाचविता येऊ शकतो, यामुळेच रक्तदानाला ‘जीवदान’ म्हटले जाते. मात्र मागील वर्षी कोरोनामुळे रक्तदात्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता व त्यामुळे रक्तदानाअभावी रक्त केंद्रातील रक्तसंकलन संकटात आले होते. परिणामी, रक्ताची गरज असलेल्या रुग्णाचा जीव वाचविणे अशक्य झाले होते. मात्र कोरोना व रक्तदानाचा काहीच संबंध नसल्याचे तज्ज्ञांनी समजावून सांगितल्यानंतर परिस्थिती सुरळीत झाली. असे असतानाच आता कोरोनाची लस तयार झाली असून अवघ्या देशात जोमात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यात कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक वाढत असल्याने लसीकरणावर जोर दिला जात आहे. विशेष म्हणजे, शासनाने ४५ वर्षांपेक्षा पुढील वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी दिली असून, त्यांचे लसीकरण सुरू झाले आहे. येथे रक्तदान करणारे तरुण व युवकच मोठ्या संख्येत असल्याने लसीकरणामुळे त्यांची संख्या घटत चालली आहे. लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान करता येणार नाही, असे निर्देश आहेत. परिणामी, रक्तदात्यांची संख्या घटत चालली आहे. याचा परिणाम रक्त केंद्रांवर होत आहे. शनिवारी (दि. ३) येथील शासकीय रक्त केंद्रात आठवडाभर पुरेल एवढाच साठा उपलब्ध होता. अशात रक्तदात्यांनी लसीकरणापूर्वी रक्तदान करण्याची गरज असून तसे आवाहन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे व रक्त केंद्राचे जनसंपर्क अधिकारी अनिल गोंडाणे यांनी केले आहे.

--------------------------

आठवडाभराचाच साठा उपलब्ध

येथील शासकीय रक्तकेंद्रावरच जिल्ह्यासह लगतच्या राज्यांतून येणाऱ्या रुग्णांची दारोमदार आहे. मात्र लसीकरण वेग घेत असल्याने रक्तदात्यांची संख्या घटत चालली आहे. शनिवारी (दि. ३) येथील शासकीय रक्त केंद्रात ए-पॉझिटिव्ह ग्रुपच्या २८, ए-निगेटिव्ह ग्रुपची १, बी-पॉझिटिव्ह ग्रुपच्या ५०, बी-निगेटिव्ह ग्रुपच्या ३, ओ-पॉझिटिव्ह ग्रुपच्या ७५, ओ-निगेटव्ह ग्रुपच्या १, एबी-पॉझिटिव्ह ग्रुपच्या १२ तर एबी-निगेटिव्ह ग्रुपची १ रक्त पिशवी आहे. हा साठा येत्या आठवडाभर पुरेल एवढाच आहे.

-----------------------------

लोकमान्य ब्लड बँक

लसीकरण जोमात सुरू असून यामध्ये रक्तदान करणारा मुख्य गट येत असल्याने रक्तदान करणाऱ्यांची संख्या घटली आहे. आता २३ पिशव्याच शिल्लक असून, हा फक्त २ दिवसांचा साठा आहे. लस घेतल्यानंतर २८ दिवस रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते. अशात रक्तदात्यांनी रक्तदान करूनच लस घेण्याची गरज आहे.

--------------------------

लस घेण्यापूूर्वी करा रक्तदान

लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान करता येणार नाही. यामुळे रक्तदात्यांची संख्या घटत असून रक्त केंद्रांतही रक्ताचा साठा कमी होत चालला आहे. अशात गरजूंना रक्त मिळाले नाही, तर त्यांच्या जीवाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. रक्तदान हे जीवदान असल्याने नागरिकांनी हा विचार करून लस घेण्यापूर्वी रक्तदान करून जीवदानाच्या या पवित्र कामात हातभार लावावा, असा संदेश नियमितपणे रक्तदान करणाऱ्या व गरजूंसाठी धावून जाणाऱ्या तरुण शुभम मधुकर निपाणे याने दिला आहे.

---------------------------