शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

जिल्ह्यातील विकास योजनांवर केवळ ७ टक्के खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:27 IST

गोंदिया : जिल्ह्यात सन २०२०-२१ या वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेचा अर्थसंकल्प १६०.४५ कोटी इतका होता. माहे डिसेंबर २०२० पर्यंत ...

गोंदिया : जिल्ह्यात सन २०२०-२१ या वर्षातील जिल्हा वार्षिक योजनेचा अर्थसंकल्प १६०.४५ कोटी इतका होता. माहे डिसेंबर २०२० पर्यंत जिल्ह्यातील कृषी क्षेत्र, ग्रामीण विकास, सामाजिक सेवा, पाटबंधारे, ऊर्जा विकास, आदिवासी विकास, नावीन्यपूर्ण योजना इत्यादी योजनांवर केवळ ११.३६ कोटी रुपये खर्च करण्यात आला.तो एकूण अर्थसंकल्पित नियोजनाच्या केवळ ७ टक्के आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील विकासकामांना खीळ बसली असून, यास पालकमंत्र्याची निष्क्रियता कारणीभूत असल्याचा आरोप माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केला आहे.

जिल्ह्यातील विकासकामांचा आराखडा तयार करून जिल्हा वार्षिक नियोजन समितीत त्यासाठी निधीची तरतूद केली जाते. यात प्रामुख्याने पायाभूत सुविधांवर भर दिला जातो. कृषी क्षेत्र, ग्रामीण विकास,सामाजिक सेवा, पाटबंधारे, ऊर्जा विकास, आदिवासी विकास, नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश होता. मात्र मागील वर्षी ही कामे फार कमी प्रमाणात करण्यात आली. त्यामुळे विकासकामांना खीळ बसली आहे. २०२०-२१ या वर्षातील महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यात आली नाहीत. संजय गांधी व श्रावण बाळ योजनांचे सहा महिन्यांपासून अनुदान लाभार्थींना मिळाले नाही. आर्थिक वर्ष २०२०-२१ संपायला फक्त दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना सामाजिक न्याय, आदिवासी विभाग, कृषी विभाग अशा वेगवेगळ्या विभागातील योजनांच्या कामांना राज्य सरकारकडून तांत्रिक मंजुरी मिळाली नाही. एकूणच जिल्ह्याची प्रगती पूर्णपणे थांबली असून, सरकारने निष्क्रियतेचा कळस गाठला असल्याचा आरोपही बडोले यांनी केला आहे.