शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

फक्त ६३९ जणांचीच बीएसएनएलला पसंती

By admin | Updated: July 14, 2015 02:19 IST

दूरसंचार क्षेत्रात शासनाने ‘पोर्टेबिलिटी’ ही सेवा सादर करून नागरिकांना आपली मनपसंत कंपनी निवडून त्यांची सेवा घेण्याची

कपिल केकत ल्ल गोंदियादूरसंचार क्षेत्रात शासनाने ‘पोर्टेबिलिटी’ ही सेवा सादर करून नागरिकांना आपली मनपसंत कंपनी निवडून त्यांची सेवा घेण्याची मुभा उपलब्ध करवून दिली. असे असतानाही नागरिकांचा कल शासकीय व सर्वात स्वस्त अशा बीएसएनएलकडे दिसत नाही. सेवा थोडी महाग असली तरी चालेल पण चांगली सेवा मिळावी या अपेक्षेने मोबाईल ग्राहकांचा कल खाजगी कंपन्यांकडे जास्त बघावयास मिळत आहे. ‘पोर्टेबिलीटी’ची ही सेवा सुरू झाल्याच्या साडेपाच वर्षांच्या काळात फक्त ६३९ जणांनीच बीएसएनएलची सेवा निवडल्याची माहिती आहे. खाजगी क्षेत्रातील एखाद्या सेवेपेक्षा शासकीय सेवेला स्वीकारण्याकडे तसा नागरिकांचा जास्त कल दिसून येतो. हेच कारण आहे की, शासकीय सेवा स्वस्त व त्यासाठी दगदग करावी लागली तरी ती परवडते अशी प्रतिक्रीया नागरिकांकडून व्यक्त केली जाते. तशी ही वास्तवीकताही आहे. मात्र दूरसंचार क्षेत्रात बीएसएनएल बाबतीत ही परिस्थिती काही औरच आहे. कारण शासकीय यंत्रणेतील ही सेवा असून अन्य खाजगी कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त ही आहे. मात्र नागरिकांचा कल बिएसएनएलकडे नसून खाजगी कंपन्यांची सेवा स्वीकारण्याकडे जास्त दिसून येतो. बीएसएनएल दूरसंचार क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असून शासकीय क्षेत्रात असल्याने ति एक भरवश्याची कंपनी आहे. अन्य खाजगी कंपन्यांप्रमाणे आपल्या ग्राहकांच्या खिशाला चुना लागू नये म्हणून अत्यंत स्वस्त दरात कंपनीकडून सुविधा पुरविली जाते. मात्र पुरविण्यात येणाऱ्या सुविधांच्या दुबळेपणामुळे नागरिकांना आता बीएसएनएल नकोशी वाटू लागली आहे. यात विशेष म्हणजे बीएसएनएल मोबाईल सेवेला घेऊन तर बीएसएनएलला आता ‘भूल से ना लेना’ असा नि:शुल्क सल्ला एकमेकांना दिला जातो. परिणामी बीएसएनएलचा ग्राहक वर्ग दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. यामागचे कारण खुद्द बीएसएनएलद्वारे पुरविण्यात येणारी बोगस सेवाच ठरत आहे. पोर्टेबिलिटीतून ६३९ जणांनी निवडले बीएसएनएल वापरात असलेला मोबाईल क्रमांक तोच ठेवून आपल्या पसंतीची दूरसंचार सेवा निवडता यावी यासाठी शासनाने मार्च २०१० मध्ये ‘पोर्टेबिलीटी’ ही सेवा सुरू केली. त्यानुसार, आतापर्यंतच्या सुमारे साडे पाच वर्षांच्या काळात फक्त ६३९ जणांनीच बीएसएनएल ची निवड केल्याची माहिती विभागाकडून मिळाली आहे. यात सन २०१५ मध्ये तर फक्त ६४ जणांनीच सेवा घेतली असल्याचे दिसून आले. एकंदर यातून बीएसएनएल आता लोकांना नापसंत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ९५ टॉवर्स बीएसएनएलचे जिल्ह्यात सर्वाधिक ९५ टॉवर्स आहेत. शहरी भागापासून ते अतिदुर्गम भागांत बीएसएनएलचे हे टॉवर्स असल्याने सर्वत्र बीएसएनएलची सेवा मिळते. खाजगी कंपनांच्या या तुलनेत कमी टॉवर्स आहेत. त्यामुळे दुर्गम भागात फक्त बीएसएनएलच काम करते. मात्र असे असतानाही बीएसएनएलकडून पुरविण्यात येणारी सेवा उत्तम नसल्याने बीएसएनएलचे कॉलच लागत नाहीत. परिणामी टॉवर असल्यावरही बीएसएनएलचा मोबाईलधारक आउट आॅफ कव्हरेज एरिया दाखवितो. ग्रामीण भागात तर सर्रास ही समस्या उद्भवत आहे.