शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

केवळ ३९ हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 22:51 IST

शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस सुरुवातीला जिल्ह्यातील ७३ हजार शेतकरी पात्र ठरण्याचा प्राथमिक अंदाज सहकार निबंधक कार्यालय आणि बँकाकडून वर्तविला जात होता.

ठळक मुद्देएक लाखापेक्षा अधिक कर्जदार : शेतकऱ्यांना बसणार फटका

आॅनलाईन लोकमतगोंदिया : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस सुरुवातीला जिल्ह्यातील ७३ हजार शेतकरी पात्र ठरण्याचा प्राथमिक अंदाज सहकार निबंधक कार्यालय आणि बँकाकडून वर्तविला जात होता. मात्र आता केवळ ३९ हजार ४१८ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरण्याची शक्यता बँकेनेच वर्तविली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी कर्जमाफीस वंचित राहणार असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूण १ लाख ७ हजार ६३० कर्जदार शेतकरी खातेदार आहेत. मात्र शासनाकडून आत्तापर्यंत ग्रीन यादीतील शेतकऱ्यांच्या तीन याद्या बँकेला प्राप्त झाल्या आहेत. त्यात केवळ ३९ हजार ४१८ शेतकºयांना कर्जमाफीस पात्र ठरविण्यात आले आहे.त्यामुळे ऐवढ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता बँकेच्या सूत्रांनी वर्तविली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेतून कर्जाची उचल करणाºया शेतकºयांची संख्या सर्वाधिक आहे. तर राष्टÑीयकृत बँकेच्या थकीत कर्जदार शेतकºयांची संख्या फार कमी आहे. जिल्हा बँकेने ३९ हजारपेक्षा अधिक शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्जदार शेतकऱ्यांची संख्या १ लाख ७ हजार ६३० एवढी आहे. यातील ७३ हजारांपेक्षा जास्त शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होणे अपेक्षीत होते. कर्जमाफीच्या आशेने या शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेला शासनाकडून ३ याद्या पाठविण्यात आल्या आहेत. त्यात ३९ हजार ४१८ शेतकऱ्यांच्या नावांचा समावेश असून त्यांचे ११४ कोटी ६३ लाख ७६ हजार ६२ रूपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. शासनाने पाठविलेल्या पहिल्या यादीत २ हजार ६२० शेतकऱ्यांसाठी १० कोटी ४२ लाख २९ हजार ३५७ रूपये, दुसऱ्या यादीत १४ हजार २५० शेतकऱ्यांचा समावेश असून यात ४९ कोटी २६ लाख १५ हजार ५१२ रूपये, तिसऱ्या यादीत २२ हजार ५४८ शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांना ५४ कोटी ९३ लाख ८८ हजार ५९३ रूपयांचा निधी मंजूर केला आहे.जिल्हा बँकेला आतापर्यंत प्राप्त झालेल्या याद्यानुसार शेतकऱ्यांचे खाते शून्य करण्यासाठी ३२ कोटी २० लाख रुपयांची गरज होती. मात्र शासनाने केवळ २६ कोटी ५५ लाख ९९ हजार ३२१ रूपये बँकेला उपलब्ध करून दिल्याची माहिती आहे.६३९ ओटीएस खातेदारजिल्हा बँकेनुसार ६३९ ओटीएस खातेदार आहेत. ज्यांच्यावर दीड लाखांपेक्षा जास्तीचे कर्ज आहे. त्यांचे केवळ १ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करण्यात आले आहे. तर उर्वरीत रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात जमा करावी लागणार आहे. यानंतरच अशा शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देता येणार आहे. बँकेने २ हजार ११८ खातेदारांची कर्जमाफीची रक्कम अडविली आहे. यात काही दीड लाखांपेक्षा कमी रकमेचे कर्जदार आहेत.७ हजार ४० शेतकऱ्यांची रक्कम परत पाठविलीकर्जमाफीच्या यादीतून ७ हजार ४० शेतकऱ्यांचे खाते जुळत नसल्याने कुणाला कमी तर कुणाला जास्त रक्कम पाठविण्यात आली असून कुणाच्या खाते क्रमांकात बदल झाला आहे. यामुळे कर्जमाफीसाठी पाठविण्यात आलेल्या रकमेतून ५ कोटी ६ लाख १ हजार ४३८ रूपये शासनाला परत करण्यात आले आहेत.