शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ३९ हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 22:51 IST

शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस सुरुवातीला जिल्ह्यातील ७३ हजार शेतकरी पात्र ठरण्याचा प्राथमिक अंदाज सहकार निबंधक कार्यालय आणि बँकाकडून वर्तविला जात होता.

ठळक मुद्देएक लाखापेक्षा अधिक कर्जदार : शेतकऱ्यांना बसणार फटका

आॅनलाईन लोकमतगोंदिया : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीस सुरुवातीला जिल्ह्यातील ७३ हजार शेतकरी पात्र ठरण्याचा प्राथमिक अंदाज सहकार निबंधक कार्यालय आणि बँकाकडून वर्तविला जात होता. मात्र आता केवळ ३९ हजार ४१८ शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरण्याची शक्यता बँकेनेच वर्तविली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी कर्जमाफीस वंचित राहणार असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एकूण १ लाख ७ हजार ६३० कर्जदार शेतकरी खातेदार आहेत. मात्र शासनाकडून आत्तापर्यंत ग्रीन यादीतील शेतकऱ्यांच्या तीन याद्या बँकेला प्राप्त झाल्या आहेत. त्यात केवळ ३९ हजार ४१८ शेतकºयांना कर्जमाफीस पात्र ठरविण्यात आले आहे.त्यामुळे ऐवढ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता बँकेच्या सूत्रांनी वर्तविली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेतून कर्जाची उचल करणाºया शेतकºयांची संख्या सर्वाधिक आहे. तर राष्टÑीयकृत बँकेच्या थकीत कर्जदार शेतकºयांची संख्या फार कमी आहे. जिल्हा बँकेने ३९ हजारपेक्षा अधिक शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्जदार शेतकऱ्यांची संख्या १ लाख ७ हजार ६३० एवढी आहे. यातील ७३ हजारांपेक्षा जास्त शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होणे अपेक्षीत होते. कर्जमाफीच्या आशेने या शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केले. मात्र जिल्हा मध्यवर्ती बँकेला शासनाकडून ३ याद्या पाठविण्यात आल्या आहेत. त्यात ३९ हजार ४१८ शेतकऱ्यांच्या नावांचा समावेश असून त्यांचे ११४ कोटी ६३ लाख ७६ हजार ६२ रूपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. शासनाने पाठविलेल्या पहिल्या यादीत २ हजार ६२० शेतकऱ्यांसाठी १० कोटी ४२ लाख २९ हजार ३५७ रूपये, दुसऱ्या यादीत १४ हजार २५० शेतकऱ्यांचा समावेश असून यात ४९ कोटी २६ लाख १५ हजार ५१२ रूपये, तिसऱ्या यादीत २२ हजार ५४८ शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांना ५४ कोटी ९३ लाख ८८ हजार ५९३ रूपयांचा निधी मंजूर केला आहे.जिल्हा बँकेला आतापर्यंत प्राप्त झालेल्या याद्यानुसार शेतकऱ्यांचे खाते शून्य करण्यासाठी ३२ कोटी २० लाख रुपयांची गरज होती. मात्र शासनाने केवळ २६ कोटी ५५ लाख ९९ हजार ३२१ रूपये बँकेला उपलब्ध करून दिल्याची माहिती आहे.६३९ ओटीएस खातेदारजिल्हा बँकेनुसार ६३९ ओटीएस खातेदार आहेत. ज्यांच्यावर दीड लाखांपेक्षा जास्तीचे कर्ज आहे. त्यांचे केवळ १ लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ करण्यात आले आहे. तर उर्वरीत रक्कम शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात जमा करावी लागणार आहे. यानंतरच अशा शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ देता येणार आहे. बँकेने २ हजार ११८ खातेदारांची कर्जमाफीची रक्कम अडविली आहे. यात काही दीड लाखांपेक्षा कमी रकमेचे कर्जदार आहेत.७ हजार ४० शेतकऱ्यांची रक्कम परत पाठविलीकर्जमाफीच्या यादीतून ७ हजार ४० शेतकऱ्यांचे खाते जुळत नसल्याने कुणाला कमी तर कुणाला जास्त रक्कम पाठविण्यात आली असून कुणाच्या खाते क्रमांकात बदल झाला आहे. यामुळे कर्जमाफीसाठी पाठविण्यात आलेल्या रकमेतून ५ कोटी ६ लाख १ हजार ४३८ रूपये शासनाला परत करण्यात आले आहेत.