शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

पीक विम्याचा लाभ घेण्यासाठी उरले केवळ १२ दिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 18:15 IST

Gondia : १५ जुलैपर्यंत नोंदणी करून या योजनेचा शेतकऱ्यांना लाभ घेण्याची संधी

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ केवळ एक रुपयात मिळणार असून, १५ जुलैपर्यंत नोंदणी करून या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. यासाठी आता केवळ १२ दिवसांचा कालावधी शिल्लक असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी महेंद्र दिहारे यांनी केले आहे. तालुक्यात बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर केली जाते. त्यातही पावसाचे प्रमाण, कीडरोग इतर आपत्तीमुळे शेतकऱ्याचे नुकसान होते. प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण दिल्यास त्यांना नुकसान भरपाई देता यावी, यासाठी योजना सुरू केली आहे.

असे आहे योजनेचे स्वरुप■ खरीप व रब्बी हंगामात जोखमीमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ घेता येतो. प्रतिकूल हवामानामुळे पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकाच्या हवामानामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान, पीक पेरणी ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, क्षेत्र जलमय होणे, दुष्काळ पावसातील खंड, कीड व रोग इत्यादीमुळे उत्पादनात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणामुळे पिकाचे होणारे काढणीपश्चात नुकसान.

...या आहेत अटी शर्ती■ शेतकऱ्याचा सातबारा त्याच्या नावावर असावा, आपत्तीमध्ये नुकसान झाल्यावर सर्वेक्षण केले जाईल. सक्षम अधिकाऱ्याचे तसे प्रमाणपत्र सादर केल्यावर नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. शेतकऱ्याने विविध पद्धतीने पीक विमा काढलेला असावा. नुकसान पश्चात क्राप इन्शुरन्स या अॅपवर नुकसानीबाबत तक्रार करावी. त्यानंतर विमा प्रतिनिधी पाहणी करून पुढील कार्यवाही करतील. बैंक, सामूहिक सेवा केंद्र, विमा कंपनी प्रतिनिधी यांच्या मार्फत नोंदणी करता येईल. 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र