शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यासाठी फक्त १० दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:40 IST

पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पीक विमा काढण्याची शेवटची मुदत ३१ जुलै आहे. मात्र शेतकरी सध्या रोवणीच्या कामात व्यस्त

एकूण शेतकरी २ लाख ३७ हजार : कमी वेळेत विमा काढणार कसा?लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पीक विमा काढण्याची शेवटची मुदत ३१ जुलै आहे. मात्र शेतकरी सध्या रोवणीच्या कामात व्यस्त असल्याने केवळ दहा दिवसात पीक विमा काढायचा कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.यंदा सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. ही घोषणा एैन खरीपाच्या तोंडावर केली. त्यातच कर्जमाफीच्या निकषांवरुन बराच घोळ निर्माण झाला होता. जुलै महिन्याला सुरुवात होऊन याबाबतचा संभ्रम दूर झाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना बँकामधून पीक कर्जाची उचल करण्यास विलंब झाला. पीक कर्जाची उचल, पीक विमा काढण्याची मुदत व रोवणीची कामे एकाच वेळी आल्याने शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्याचाच परिणाम पीक कर्जाची उचल आणि पीक विमा काढण्यावर झाल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.गोंदिया जिल्ह्यात एकूण २ लाख ३७ हजार शेतकरी असून आत्तापर्यंत राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकेतून २७ हजार शेतकऱ्यांनी ११८ कोटी रुपयांच्या पीक कर्जाची उचल केली. तर तेवढ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांच्या तुलनेत हा आकडा फारच कमी आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने शेतकरी रोवणीच्या कामात व्यस्त आहेत. त्यातच पीक विमा काढण्याची शेवटची तारीख ३१ जुलै असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दमछाकविमा कंपनीकडून पीक विमा काढण्यासाठी पीेक पेरा प्रमाणपत्र, सातबारा, गाव नमुना आठ, आधारकार्ड ही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. त्याशिवाय विमा काढता येत नाही. पीक पेरा प्रमाणपत्र हे तलाठी कार्यालयातून मिळते. पण, तिथे दोन तीन चकरा मारल्याशिवाय ते हाती पडत नसल्याने शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. कंपन्याकडून दिशाभूलपंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत गेल्यावर्षी जिल्ह्यातील ३७ हजार ७६७ शेतकऱ्यांनी पिक विमा काढला होता. विमा हप्त्यापोटी १० कोटी रुपये विमा कंपनीकडे भरले. मात्र, गेल्यावर्षी नुकसान होऊनही केवळ ९८ शेतकरी नुकसान भरपाईस पात्र ठरले. मुदतवाढ देण्याची मागणीजिल्ह्यात सध्या सर्वत्र रोणवीची कामे सुरू आहेत. याच कामात शेतकरी व्यस्त असून पीक विमा काढण्याची ३१ जुलैची मुदत वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यासंदर्भात काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाला निवेदन दिले.सरासरी उत्पादन ठरविण्याची पध्दत बदलाविमा कंपन्या महसूल मंडळातील सरासरी उत्पादनावरुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देतात. यामुळे बरेच शेतकरी मदतीस अपात्र ठरतात. त्यामुळे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सरासरी उत्पादन ठरविण्यासाठी गाव हा घटक विचारात घेण्याची गरज आहे. विमा कंपन्याप्रती रोषपीक विम्याच्या हप्त्यापोटी पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी विमा काढतात. मात्र गेल्या दोन तीन वर्षांपासून नुकसान झाल्यानंतरही विमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळत नसल्याचे चित्र आहे.