शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

पीक विम्यासाठी फक्त १० दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:40 IST

पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पीक विमा काढण्याची शेवटची मुदत ३१ जुलै आहे. मात्र शेतकरी सध्या रोवणीच्या कामात व्यस्त

एकूण शेतकरी २ लाख ३७ हजार : कमी वेळेत विमा काढणार कसा?लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत पीक विमा काढण्याची शेवटची मुदत ३१ जुलै आहे. मात्र शेतकरी सध्या रोवणीच्या कामात व्यस्त असल्याने केवळ दहा दिवसात पीक विमा काढायचा कसा असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे.यंदा सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. ही घोषणा एैन खरीपाच्या तोंडावर केली. त्यातच कर्जमाफीच्या निकषांवरुन बराच घोळ निर्माण झाला होता. जुलै महिन्याला सुरुवात होऊन याबाबतचा संभ्रम दूर झाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांना बँकामधून पीक कर्जाची उचल करण्यास विलंब झाला. पीक कर्जाची उचल, पीक विमा काढण्याची मुदत व रोवणीची कामे एकाच वेळी आल्याने शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे. त्याचाच परिणाम पीक कर्जाची उचल आणि पीक विमा काढण्यावर झाल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.गोंदिया जिल्ह्यात एकूण २ लाख ३७ हजार शेतकरी असून आत्तापर्यंत राष्ट्रीयकृत आणि जिल्हा बँकेतून २७ हजार शेतकऱ्यांनी ११८ कोटी रुपयांच्या पीक कर्जाची उचल केली. तर तेवढ्याच शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. जिल्ह्यातील एकूण शेतकऱ्यांच्या तुलनेत हा आकडा फारच कमी आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने शेतकरी रोवणीच्या कामात व्यस्त आहेत. त्यातच पीक विमा काढण्याची शेवटची तारीख ३१ जुलै असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.कागदपत्रांची जुळवाजुळव करताना दमछाकविमा कंपनीकडून पीक विमा काढण्यासाठी पीेक पेरा प्रमाणपत्र, सातबारा, गाव नमुना आठ, आधारकार्ड ही कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. त्याशिवाय विमा काढता येत नाही. पीक पेरा प्रमाणपत्र हे तलाठी कार्यालयातून मिळते. पण, तिथे दोन तीन चकरा मारल्याशिवाय ते हाती पडत नसल्याने शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे. कंपन्याकडून दिशाभूलपंतप्रधान पीक विमा योजनेतंर्गत गेल्यावर्षी जिल्ह्यातील ३७ हजार ७६७ शेतकऱ्यांनी पिक विमा काढला होता. विमा हप्त्यापोटी १० कोटी रुपये विमा कंपनीकडे भरले. मात्र, गेल्यावर्षी नुकसान होऊनही केवळ ९८ शेतकरी नुकसान भरपाईस पात्र ठरले. मुदतवाढ देण्याची मागणीजिल्ह्यात सध्या सर्वत्र रोणवीची कामे सुरू आहेत. याच कामात शेतकरी व्यस्त असून पीक विमा काढण्याची ३१ जुलैची मुदत वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. यासंदर्भात काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाला निवेदन दिले.सरासरी उत्पादन ठरविण्याची पध्दत बदलाविमा कंपन्या महसूल मंडळातील सरासरी उत्पादनावरुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देतात. यामुळे बरेच शेतकरी मदतीस अपात्र ठरतात. त्यामुळे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सरासरी उत्पादन ठरविण्यासाठी गाव हा घटक विचारात घेण्याची गरज आहे. विमा कंपन्याप्रती रोषपीक विम्याच्या हप्त्यापोटी पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी विमा काढतात. मात्र गेल्या दोन तीन वर्षांपासून नुकसान झाल्यानंतरही विमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळत नसल्याचे चित्र आहे.