शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

Corona Virus in Gondia; गोंदिया जिल्ह्यातील शंभर नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 20:19 IST

जिल्हा आरोग्य विभागाने कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत पाठविलेल्या एकूण १०५ नमुन्यांपैकी गुरूवारपर्यंत १०० स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.

ठळक मुद्देपुन्हा पंधरा जणांचे नमुने पाठविलेजिल्हावासीयांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा आरोग्य विभागाने कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत पाठविलेल्या एकूण १०५ नमुन्यांपैकी गुरूवारपर्यंत १०० स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.तर गुरूवारी पुन्हा १५ स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले आहे. जिल्ह्यातील आतापर्यत शंभर स्वॅब नमुने निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने घेऊन ते नागपूर मेयो येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. मात्र मागील पाच सहा दिवस प्रयोगशाळेकडून नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने जिल्हावासीयांची आणि आरोग्य विभागाची सुध्दा चिंता वाढली होती. त्यानंतर बुधवारी जिल्ह्यातील ६४ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. तर गुरूवारी ४४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण १०० स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर आधी पाठविलेले ५ आणि गुरूवारी (दि.९) पाठविलेले १५ अशा एकूण २० स्वॅब नमुन्यांचा अहवाल आता प्राप्त होणे बाकी आहे. तर एक नमुना आधीच पाझिटिव्ह आला आहे.दरम्यान आत्तापर्यंत पाठविलेले शंभर नमुने निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांना सुध्दा मोठा दिलासा मिळाला आहे.

८६ जण शासकीय अलगीकरण केंद्रातदिल्ली निजामुद्दीन येथील एका धार्मिक कार्यक्रमा दरम्यान दिल्ली प्रवासाचा संदर्भ असलेल्या जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेऊन त्यांना शासकीय अलगीकरण कक्षात ठेवून त्यांचे स्वॅब नमुने घेऊन ते कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना शासकीय अलीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील यात दोन शासकीय अलगीकरण कक्षात आत्तापर्यंत ८६ जणांना ठेवण्यात आले आहे. यामध्ये गोंदिया आयुर्वेदिक कॉलेज ७६ आणि लहीटोला १० अशा एकूण ८६ व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ.संगिता पाटील यांनी सांगितले.अलगीकरणाचा कालावधी संपलेल्यांवर नजरजिल्ह्यात २५१ व्यक्ती विदेशातून प्रवास करून जिल्ह्यात आल्यात.त्यांचा व त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींचा १४ दिवसांचा वास्तव्याच्या ठिकाणी अलगिकरणात राहण्याचा कालावधी संपलेला आहे. अलगीकरणाचा कालावधी जरी संपला असला तरी त्यांनी स्वत:हून अलगिकरणातच राहावे.आपल्या कुटूंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी.तसेच त्यांच्यावर आरोग्य विभागाची सुध्दा नजर आहे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस