शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

Corona Virus in Gondia; गोंदिया जिल्ह्यातील शंभर नमुने निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 20:19 IST

जिल्हा आरोग्य विभागाने कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत पाठविलेल्या एकूण १०५ नमुन्यांपैकी गुरूवारपर्यंत १०० स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.

ठळक मुद्देपुन्हा पंधरा जणांचे नमुने पाठविलेजिल्हावासीयांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा आरोग्य विभागाने कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आत्तापर्यंत पाठविलेल्या एकूण १०५ नमुन्यांपैकी गुरूवारपर्यंत १०० स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे.तर गुरूवारी पुन्हा १५ स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले आहे. जिल्ह्यातील आतापर्यत शंभर स्वॅब नमुने निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने स्वॅब नमुने घेऊन ते नागपूर मेयो येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. मात्र मागील पाच सहा दिवस प्रयोगशाळेकडून नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने जिल्हावासीयांची आणि आरोग्य विभागाची सुध्दा चिंता वाढली होती. त्यानंतर बुधवारी जिल्ह्यातील ६४ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. तर गुरूवारी ४४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण १०० स्वॅब नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर आधी पाठविलेले ५ आणि गुरूवारी (दि.९) पाठविलेले १५ अशा एकूण २० स्वॅब नमुन्यांचा अहवाल आता प्राप्त होणे बाकी आहे. तर एक नमुना आधीच पाझिटिव्ह आला आहे.दरम्यान आत्तापर्यंत पाठविलेले शंभर नमुने निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांना सुध्दा मोठा दिलासा मिळाला आहे.

८६ जण शासकीय अलगीकरण केंद्रातदिल्ली निजामुद्दीन येथील एका धार्मिक कार्यक्रमा दरम्यान दिल्ली प्रवासाचा संदर्भ असलेल्या जिल्ह्यातील प्रवाशांचा शोध घेऊन त्यांना शासकीय अलगीकरण कक्षात ठेवून त्यांचे स्वॅब नमुने घेऊन ते कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना शासकीय अलीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील यात दोन शासकीय अलगीकरण कक्षात आत्तापर्यंत ८६ जणांना ठेवण्यात आले आहे. यामध्ये गोंदिया आयुर्वेदिक कॉलेज ७६ आणि लहीटोला १० अशा एकूण ८६ व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ.संगिता पाटील यांनी सांगितले.अलगीकरणाचा कालावधी संपलेल्यांवर नजरजिल्ह्यात २५१ व्यक्ती विदेशातून प्रवास करून जिल्ह्यात आल्यात.त्यांचा व त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींचा १४ दिवसांचा वास्तव्याच्या ठिकाणी अलगिकरणात राहण्याचा कालावधी संपलेला आहे. अलगीकरणाचा कालावधी जरी संपला असला तरी त्यांनी स्वत:हून अलगिकरणातच राहावे.आपल्या कुटूंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घ्यावी.तसेच त्यांच्यावर आरोग्य विभागाची सुध्दा नजर आहे

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस