शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

बायपास मार्गासाठी एक कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 22:12 IST

आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे प्रसिद्ध नागरा शिव मंदिरापर्यंत बायपास मार्गाच्या बांधकामासाठी भूमी अधिग्रहणाकरिता एक कोटींचा निधी सा.बां. विभागाला (रोहयो) मंजूर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : तीर्थक्षेत्र नागरा मंदिरापर्यंत होणार रस्ता

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रयत्नांमुळे प्रसिद्ध नागरा शिव मंदिरापर्यंत बायपास मार्गाच्या बांधकामासाठी भूमी अधिग्रहणाकरिता एक कोटींचा निधी सा.बां. विभागाला (रोहयो) मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून गोंदिया-बालाघाट राज्यमार्ग ते सरळ शिव मंदिर नागरापर्यंत रूंद बायपास मार्गासाठी जमीन मिळवून घेण्यात येईल. या रस्त्याचे बांधकाम झाल्यावर भाविकांना नागरा शिवमंदिरात ये-जा करणे सोयीचे होईल.सध्या मुख्य मार्गाने नागरा शिव मंदिरात पोहोचण्यासाठी गावाच्या मधातून जावे लागते. या रस्त्याची रूंदी कमी आहे. तसेच अनेकांनी घरांच्या ओट्यांचे बांधकाम केल्याने रस्ता आणखी अरूंद झाला आहे. त्यामुळे इतर दिवशी अडचण होत नसली तरी शिवरात्री व इतर सणांप्रसंगी होणाऱ्या गर्दीमुळे भाविकांना शिव मंदिर-भैरव मंदिरात पोहोचण्यासाठी मोठाच त्रास होतो. ही समस्या बायपास रस्त्यामुळे सुटणार आहे.काही दिवसांपूर्वी आ. अग्रवाल यांच्या पुढाकाराने नागरा शिव मंदिर परिसराच्या विकासासाठी महाराष्टÑ राज्य तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत दोन कोटींचा निधी शासनाने मंजूर केला होता. त्यातून भक्त निवास, संरक्षण भिंत, शौचालय, सिमेंट रस्ते, पथदिवे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून निधी मिळवून घेण्याकरिता तीर्थक्षेत्राला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळणे आवश्यक होते. त्यासाठी आ. अग्रवाल यांनी पाठपुरावा करून ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून दिला व परिसर विकासासाठी दोन कोटींच्या निधीलाही मंजुरी मिळवून दिली.नागरा येथील शिवमंदिर प्राचीन असून गोंदिया, भंडारा व बालाघाटसह मध्य भारतातील हजारो भाविकांसाठी आस्था व श्रद्धेचे केंद्र आहे. त्यामुळे येथे येणाºया भाविकांना सुविधा देणे, नागरा ग्राम व मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी आ. अग्रवाल यांनी प्रयत्न केले आहे. त्यामुळे येथे तलावाचे सौंदर्यीकरण, विद्युतीकरण व तलावाच्या पाळीवर पेविंग ब्लॉक पथचे बांधकाम महाराष्टÑ राज्य पर्यटन विकास महामंडळाद्वारे करण्यात आले. नागराच्या शिवमंदिरात पोहोचण्यासाठी सध्याच्या मार्गाचे डांबरीकरण केले जात आहे. तर गोंदिया-बालाघाट मार्ग ते सरळ बायपास मार्गाच्या बांधकामासाठी मार्ग प्रशस्त झाला आहे. त्यामुळे दरवर्षी शिवरात्री पर्वावर प्रवाशांना होणारी ट्रॉफीक जामची समस्या आता होणार नाही.विशेष म्हणजे नागरा शिव मंदिराचा इतिहास ८०० वर्षांपेक्षाही प्राचीन आहे. तसेच परिसरात भारतीय पुरातत्व विभागाद्वारे केलेल्या खोदकामात प्राचीन अनेक मानवनिर्मित अवशेषसुद्धा प्राप्त झाले आहेत. त्यामुळे नागराधामचा विकास व्हावा अशी मागणी आहे.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल