शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

तीन तालुक्यातील दीडशे गावे महामार्गाच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 23:58 IST

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेप्रमाणे महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत सालेकसा, आमगाव आणि देवरी तालुक्यातील दिडशे गावांना थेट राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गाशी जोडण्याचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री ग्राम सडक योजना : ग्रामीण भागासाठी ठरणार वरदान

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेप्रमाणे महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत सालेकसा, आमगाव आणि देवरी तालुक्यातील दिडशे गावांना थेट राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गाशी जोडण्याचे काम सुरू आहे. यापैकी ८० टक्के कामे पूर्ण झालेली आहे. त्यामुळे आता गावागावात पक्के डांबरीकरणाचे रस्ते पाहयला मिळत आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ग्रामीण भागासाठी वरदान ठरत असल्याचे चित्र आहे.राज्यात भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर २०१५ मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. या योजनेतंर्गत गावा-गावात पक्के डांबरी आणि सिमेंटचे रस्ते तयार करुन त्या गावांना थेट महामार्गाशी जोडण्याचे काम सुरू आहे. या योजनेची सुरुवात आ.संजय पुराम यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातून केली. मागील दीड वर्षात ७८ कोटी ७६ लाख ८१ हजार रुपयांचा निधी खेचून आणला. यातून ३४ रस्त्यात १४४ कि.मी.चे बांधकाम करण्यात आले. यामध्ये २०१५-१६ ते २०१६-१७ या वित्त वर्षात १६ रस्ते बांधण्यात आले. ८६.६१ कि.मी.साठी ४४ कोटी ५४ लाख रुपयाचा निधी खर्च करण्यात आला. यामध्ये आमगाव तालुक्यात जवळपास २४ किमीचे चार रस्ते तयार करण्यात आले. यासाठी ११ कोटी ७० लाख ४२ हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. देवरी तालुक्यात १७ कोटी ५२ लाख ८० हजार रुपयाच्या रक्केमतून जवळपास ४० किमी पर्यंत आठ रस्ते तयार करण्यात आले. सालेकसा तालुक्यात ३१ किमीचे पाच रस्ते बांधण्यात आले. यासाठी १५ कोटी ४० लाख ८१ हजार रुपयाचा निधी खर्च करण्यात आला. २०१७-१८ या वित्त वर्षात ३४ कोटी २२ लाख ७८ हजार रुपये निधी खर्च करुन जवळपास ५८ किमीचे १८ रस्ते तयार करण्यात आले. यामध्ये आमगाव तालुक्यात तीन रस्त्यासाठी १४ किमी बांधकामावर ८ कोटी ९७ लाख ३४ हजार रुपयाचा निधी खर्च करण्यात आला. देवरी तालुक्यात ३० किमीचे १० रस्ते बांधण्यात आले. यासाठी १७ कोटी ७९ लाख ८७ हजार रुपये खर्च करण्यात आले. सालेकसा तालुक्यात ७ कोटी ५७ हजार एवढ्या निधीतून १३ किमीचे पाच रस्ते बांधण्यात आले. असे एकूण ३४ रस्त्यांचे बांधकाम मागील दोन वित्त वर्षात करण्यात आले.२०१९ पर्यंत ३०० गावांना जोडणारसालेकसा, देवरी या तिन्ही तालुक्यातील दिडशे गावांना राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गाना थेट जोडण्याचे काम मागील दोन वर्षांपासून सुरु असून ते २०१९ पूर्ण करण्यात येणार आहे. येत्या दिड वर्षात आणखी दिडशे गावांना जोडण्याच्या दिशेने काम सुरु आहे. येत्या दोन वर्षात प्रत्येक गाव पक्क्या रस्त्यांनी जोडण्यात येईल. यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून आवश्यक निधी मिळणार असल्याचे आमदार पुराम यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.चालू वित्त वर्षात २५ रस्त्यांना मंजुरी२०१८-१९ या वित्त वर्षात आतापर्यंत २५ रस्त्यांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत मंजुरी मिळाली आहे. यात आमगाव तालुक्यात जवळपास १४ किमीचे आठ रस्ते, देवरी तालुक्यात ३२ किमीचे १२ रस्ते आणि सालेकसा तालुुक्यात १६ किमी पर्यंत पाच रस्ते तयार करण्यात येणार आहे. तिन्ही तालुक्यात एकूण ६१ किमी रस्ते तयार करण्याचे काम येत्या काही दिवसात पूर्ण झाल्यास मागील दोन वर्षात जवळपास २१२ किमी रस्ते बांधणीचे काम पूर्ण होणार आहे. आमगाव तालुक्यातील ३३ गावे, देवरी तालुक्यातील ६८ गावे आणि सालेकसा तालुक्यातील ४७ गावे असे एकूण १४८ गावे महमार्गाला थेट जोडली जाणार आहे.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानgovernment schemeसरकारी योजना