शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

तेलही गेले अन् तूपही गेले...

By admin | Updated: March 9, 2016 02:55 IST

आमगावला नगर परिषदेचा दर्जा मिळावा याकरिता अनेकांनी सुखद स्वप्न पाहिली. या स्वप्नात अनेकांचे अनेक प्रकारे हित गुंतले आहे,

ओ.बी. डोंगरवार आमगावला नगर परिषदेचा दर्जा मिळावा याकरिता अनेकांनी सुखद स्वप्न पाहिली. या स्वप्नात अनेकांचे अनेक प्रकारे हित गुंतले आहे, पण त्या स्वप्नाची पूर्तता कशी होणार हा मोठा तिढा आहे. शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणी नगर पंचायत करण्यात आली. पण आमगावला नगर पंचायत न देता नगर परिषद मिळावी यासाठी काही लोकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने हा शासनाच्या अखत्यारितील प्रश्न असल्याचे सांगून चेंडू राज्य शासनाच्या कोर्टात टाकला. आता या लढाईत तेलही गेले अन् तुपही गेले व हाती धुपाटने आले, अशी स्थिती सध्यातरी आहे.आमगावला नगर परिषदेचा दर्जा मिळावा याकरिता अनेक राजकीय पक्षांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा दिला. काहींनी छूपा पाठिंबा दिला. लोकसंख्येचा विचार करुन आमगावला नगर परिषद मिळणे रास्त आहे. आमगाव, बनगाव, रिसामा, कुंभारटोली, माल्ही, पदमपूर, किंडगीपार या ग्रामपंचायतची लोकसंख्या ग्राह्य धरुन जर गणित मांडले तर नगर परिषद होण्याकरिता वेळ लागणार नाही. मात्र नगर परिषद नको होती असे ज्यांनी बोलून दाखवले नाही तरी काहींच्या पोटात दुखणे सुरू झाले होते. याला कारणही होते. राजकारणाच्या सारीपाटात सर्वकाही चालते. मतभेद असले तरी मनभेद नकोत, तेच येथे घडले. काहींना वाटले जर नगर परिषद झाली तर आज आपली दुकानदारी बंद झाल्याशिवाय राहणार नाही. काहींची मलाई खाणे बंद झाले असते. दुसरे म्हणजे पंचायत व जिल्हा परिषदेवर निवडून आलेल्या विजयी उमेदवारांनी जे काही पैसे खर्च केले ते गंगेत वाहल्या गेले असते. म्हणजे तेथेही तेल व तूपही गेले अशी स्थिती निर्माण झाली असती. काही ग्रामपंचायतींनी नगर परिषदेत समाविष्ठ होण्यासाठी हरकत ठराव दिला होता. तेच विरोधात उतरले. जनमत तयार करुन आपली ग्रामपंचायत बरी असा विचार त्यांनी केला. ज्या ग्रामपंचायतींना नगर परिषदेमध्ये समाविष्ट होणार अशी चाहूल लागली त्यांनी राजकारणाच्या सारीपाटात खेळी खेळणे सुरू केले. नगर परिषद झाली तर आपल्या हाती सत्ता येणार असे गृहीत धरुन अनेक जण मैदानात उतरले. एकमेकांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन अनेकांनी नेम लावला. मात्र न्यायालयाच्या निर्णयाने सगळ्यांचा बार फूसका ठरला.नगर परिषद होणे हे अत्यंत गरजेचे आहे. जो निधी लोकसंख्येच्या आधारे मिळतो त्यात अनेक विकासात्मक कामांना आणखी गती मिळाली असती. यात सध्या कार्यरत ग्रामपंचायत कर्मचारी मोठे खुष झाले होते, कारण त्याच्या पोटपाण्याच्या शिदोरीत भर पडणर होती. मात्र तेथेही तेल व तूपही गेले अशी अवस्था निर्माण झाली. नगर परिषद होण्याकरिता केंद्रस्थानी असलेल्या ग्रामपंचायतपासून एक ते दिड कि.मी. अंतरावरील ग्रामपंचायतींचा समावेश करुन नगर परिषद जाहीर करणे गरजेचे होते. काही ग्रामपंचायती हरकत घेतात व नंतर सत्ता बदलली म्हणून कार्यरत पदाधिकारी मतही बदलतात. यासाठी ठराव असो वा नसो, विरोध करणारे विरोध करतील. मात्र विकासात्मक कार्याचा विचार करता शासनाने ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे. न्यायालयाने शासनाला योग्य निर्णय घेण्याकरिता सांगितले आहे. त्यामुळे चेंडू शासन दरबारी आहे. याकरिता स्वप्न पाहणाऱ्यांनी किंवा ज्याचे स्वप्न भंग झाले त्यांनी आमगाव नगर परिषदमय व्हावे याकरिता शासन दरबारी दंड ठोकून मैदानात उतरणे गरजेचे आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे प्रशासकांची बोलती बंद झाली. आता न्यायालयाच्या निर्णयानंतर काय करावे याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचे प्रशासकांनी सांगितले. त्यांचीही स्थिती दोलायमान झाली आहे.