शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

अधिकार्‍यांचे आऊटगोइंग, इनकमिंग मात्र बंद

By admin | Updated: May 29, 2014 02:31 IST

गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त अतिसंवेदनशिल असला तरी या जिल्ह्याकडे महाराष्ट्र शासनाने पाठ फिरविली आहे.

गोंदिया : गोंदिया जिल्हा नक्षलग्रस्त अतिसंवेदनशिल असला तरी या जिल्ह्याकडे महाराष्ट्र शासनाने पाठ फिरविली आहे. जिल्ह्यातील पोलीस विभागात असलेल्या महत्वाच्या पदावरील अधिकार्‍यांचे पद मागील वर्षभरपासून रिक्त आहेत. तरी देखील गोंदिया जिल्ह्यातील आणखी पाच पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

गोंदिया येथील पोलीस उपअधीक्षक (गृह) वसंत गायकवाड सेवानवृत्त झाले. तेव्हापासून शासनाने या ठिकाणी पोलीस उपअधीक्षक (गृह) यांचे पद कायमस्वरूपी असलेले भरले नाही. पोलीस निरीक्षकांना प्रभारी म्हणून नियुक्त करून कामकाज भागविला जात आहे. या जिल्ह्यातील अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांचेही पद रिक्त आहे. लोकसभेची आचारसंहिता लागण्यापुर्वी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्‍व पानसरे यांची पदली करण्यात आली. परंतु त्यांच्या जागी कोणालाही पाठविण्यात आले नाही. पोलीस अधीक्षक कर्यालयातील कार्यालयीन अधिक्षक हे पद देखील मागील वर्षभरापासून खाली आहे. त्या ठिकणीही कुण्या अधिकार्‍याला पाठविण्यत आले नाही. याच सोबत मुख्य लिपीकाचेही पद या कार्यलयात रिक्त आहे.

ज्या पेलिसांच्या भरवश्यावर जिल्ह्यातील जनता सुखाने झेापते त्याच पेलीस विभागात कर्मचारी, अधिकार्‍यांची वाणवा आहे. गोंदिया जिल्ह्यात मनुष्यबळाची कमतरता असताना पोलीस शिपायांची ३८0 पदे भरण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु ३८0 पैकी फक्त २३ जागा शासनाने देऊन पुन्हा जिल्ह्यावर अन्याय केला आहे. पोलीस यंत्रणा तोकडी असताना नुकतेच पाच पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांची बदली नागपूर ग्रामीण येथे करण्यात आली आहे. वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक संजय साबळे यंची बदली ठाणे शहर, देवरीचे ठाणेदार संजू जॉन यांची बदली ठाणे शहर, नियंत्रण कक्ष गोंदिया येथे तीन महिन्यापुर्वी रूजू झालेले शहाजी नरसुडे यांची बदली अहमदनगर येथे तर नवेगावबांध येथील प्रविण दरेकर यांची बदली बृहन्मुंबई येथे करण्यात आली आहे.

शासन नक्षलग्रस्त जिल्ह्याकडे विशेष लक्ष देण्याच्या फक्त बाता हाकत असते हेच यातून दिसून येते.