शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे गुन्हाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 05:00 IST

अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे म्हणजे सर्रास त्यांना रस्त्यावर दुसऱ्याला मारून टाकण्याची परवानगी देण्यासारखे आहे. वाहन जलद गतीने चालवितांना अल्पवयीन मुले-मुले स्वत:चा जीव धोक्यात टाकतात सोबतच रस्त्यावरून चालणाºया निरअपराध लोकांचाही बळी घेतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी मुलाने चुकी केल्यास बापाला शिक्षा करण्याचा वाहतूक नियम लागू करावा असे मत शहरातील नागरिकांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देवाहतूक नियंत्रण विभाग सुरू करणार मोहीम : शिक्षा देण्याचा कायदा लागू करा

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे म्हणजे सर्रास त्यांना रस्त्यावर दुसऱ्याला मारून टाकण्याची परवानगी देण्यासारखे आहे. वाहन जलद गतीने चालवितांना अल्पवयीन मुले-मुले स्वत:चा जीव धोक्यात टाकतात सोबतच रस्त्यावरून चालणाºया निरअपराध लोकांचाही बळी घेतात. या प्रकाराला आळा घालण्यासाठी मुलाने चुकी केल्यास बापाला शिक्षा करण्याचा वाहतूक नियम लागू करावा असे मत शहरातील नागरिकांनी व्यक्त केले.३ मार्च रोजी गोंदियाच्या गौशाला वार्डात झालेल्या अपघातात एका ६ वर्षाच्या निरागस मुलीचा अपघातात मृत्यू झाला. ट्रकची स्कुटीला धडक झाली. अल्पवयीन मुलगा स्कुटी चालवित असताना हा अपघात घडला. त्याला कायद्याचे ज्ञान नाही, वाहनाचा परवाना नाही तरीही रस्त्यावर बेधडक भरधाव वेगात वाहन चालवून मुलीचा बळी घेतला. या पार्श्वभूमीवर लोकमतने विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.जिल्ह्यातील हजारो पालक आपल्या पाल्यांची हौस पुरविण्यासाठी त्यांच्या हातात वाहन देतात. १८ वर्षापेक्षा कमी वयाची मुले वाहन चालवित असताना रस्त्यावरील पादचाऱ्यांचा बळी घेतात. हजारो मुले विना परवाना वाहन चालवित असतात. ज्या ठिकाणी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त असते त्या चौकात हे अल्पवयीन मुले जात नाही. त्यांची नजर चोरून इतर गल्लीतून वाहन सुसाट वेगात चालवितात.गोंदिया शहराची परिसथिती पाहता व्यापारी वर्गाने आर्डर केलेला माल हा केव्हाही खाली केला जातो. त्यांच्यासाठी ठरावीक वेळ असावा, माल खाली करताना वाहन व्यवस्थित पार्र्कींग करावे, गोंदिया शहरातील रस्त अरूंद असल्याने व्यापाऱ्यांची माल खाली करण्याची वेळ ठरावीक असावी, माल खाली करण्यासाठी वेळ द्यावा त्या वेळात माल खाली करणे अपेक्षीत आहे.वाहन चालविण्यात स्वत:ला कुशल समजणारे हे अल्पवयीन बालके ओव्हरटेकच्या नादात अपघात करतात.वाहतूक पोलिसांच्या समोरून एखादा अल्पवयीन मुलगा किंवा नियमाचा भंग करणारा वाहन चालक पोलिसांच्या समोरून जोरात वाहन चालवत नेत असले तर त्याचा पाठलागही करणे पोलिसांना बंधनकारक आहे. अपघात होऊ शकतो म्हणून नियम तोडणाºयाचा पाठलाग करू नका असे आदेश आहेत.त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नाही.१९८ अल्पवयीन वाहन चालकांना दंडअल्पवयीन मुले विना परवाना वाहन चालवितांना वाहतूक पोलिसांनी १९८ जणांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून १ लाख ९८ हजार रूपये दंडही वसूल करण्यात आला. केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्याला कडक करताना अल्पवयीन मुलगा वाहन चालवितांना आढळल्यास त्यांच्या वडीलांना ३ वर्षाचा कारावास व १० हजार रूपये दंड ठोठावण्याचा तो कायदा आणला तो महाराष्ट्रत लागू झाला नाही. तो आता लागू करण्याची गरज आहे.पालकांनी आपल्या अल्पवयीन मुला-मुलींच्या हातात वाहन देऊ नये,कुणीही भरधाव वाहने चालवू नका, ओव्हरटॅक करू नका, जड वाहन चालविणाऱ्यांनी वाहन अत्यंत कमी स्पीडने चालवावे, वळणावर वाहन पार्र्कींग करू नये.- दिनेश तायडे,पोलीस निरीक्षकवाहतूक नियंत्रण शाखा

 

टॅग्स :Socialसामाजिक