शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

ओबीसींसह की ओबीसीला वगळून? निर्णय सोमवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 05:00 IST

किती उमेदवार माघार घेतात यानंतरच निवडणुकीतील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने या निवडणुकीत व्टिस्ट आला आहे. ओबीसी आरक्षणाच्या निर्णयावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यानंतर या निवडणुका ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून होतात की या निवडणुकांना स्थगित मिळून ओबीसी आरक्षणावर निर्णय झाल्यानंतरच या सर्व निवडणुका होतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात २१ डिसेंबरला होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे भवितव्य सोमवारी (दि. १३) सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतरच स्पष्ट होणार आहे. ओबीसींसह की ओबीसीला वगळून या निवडणुका होतात, याकडे सर्वच राजकीय पक्षांसह जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. त्यामुळेच सर्वांनाच आता १३ तारखेच्या सुनावणीची प्रतीक्षा आहे. यामुळे निवडणूक प्रचार कार्यसुद्धा संथगतीने सुरू असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायतीसाठी २१ डिसेंबरला निवडणूक हाेणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. किती उमेदवार माघार घेतात यानंतरच निवडणुकीतील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्याने या निवडणुकीत व्टिस्ट आला आहे. ओबीसी आरक्षणाच्या निर्णयावर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यानंतर या निवडणुका ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून होतात की या निवडणुकांना स्थगित मिळून ओबीसी आरक्षणावर निर्णय झाल्यानंतरच या सर्व निवडणुका होतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी जागा वगळून निवडणुका न घेता एकत्रितच निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. ओबीसी जागा वगळून या निवडणुका घेणे म्हणजे ओबीसी समाजावर हा अन्याय आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. खा. प्रफुल्ल पटेल यांनीसुद्धा यावर ज्येष्ठ विधी तज्ज्ञांशी चर्चा करून ओबीसी आरक्षण रद्द होऊ नये यासाठी याचिका दाखल केली आहे. तर राज्य सरकार आणि इतरही पक्षांनीसुद्धा याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय सोमवारी काय निर्णय देते यावरच या निवडणुकांचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे सुनावणीकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

उमेदवार म्हणतात १३ पर्यंत विश्रांती - जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे उमेदवारांनी गाठीभेटी वाढविल्या होत्या. पण सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली असून यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांचा उत्साह मावळला असून सोमवारपर्यंत विश्रांती घेत असून सुनावणीनंतरच प्रचाराला सुरुवात करू, असे सांगत आहे. त्यामुळे प्रचाराची धामधूम कमी झाली आहे. 

निवडणूक यंत्रणेची तारांबळ - स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने या जागा वगळून संपूर्ण प्रक्रिया ऐनवेळी करण्याची वेळ जिल्हा निवडणूक यंत्रणेवर आली होती. त्यामुळे अर्जांची छाननी करण्यापासून इतर सर्वच कामावर परिणाम झाला आहे. त्यामुळेच अद्याप किती मतदार आणि किती मतदारसंघ याची आकडेवारी घोषित करण्यात आली नाही. 

काहींचा गाठीभेटीवर भर - काही उमेदवारांनी सकाळी १० वाजतापासून निवडणूक लढविणाऱ्या क्षेत्रात सक्रिय असून मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचा कार्यक्रम सुरूच ठेवला आहे. तर सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या. 

निवडणुकीचा उडणार गुलाल की उत्साह मावळणार? - जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकांना फार महत्त्व आहे. त्यामुळे या निवडणुका जाहीर होताच गुलाबी थंडीत ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापले होते. मात्र ओबीसी आरक्षणावरील निर्णयामुळे यातील उत्साह मावळला आहे. यावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देतो यावरच निवडणुकीचा गुलाल उडणार की उत्साह मावळणार, हे स्पष्ट होणार आहे. 

 

टॅग्स :Electionनिवडणूक