शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

ओबीसींचे जिल्हा अधिवेशन

By admin | Updated: March 12, 2017 00:22 IST

आपल्या ओबींसी समाजाला एकत्रित करून होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याकरीता ओबीसी सेवा संघ

सिरपूरबांध : आपल्या ओबींसी समाजाला एकत्रित करून होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याकरीता ओबीसी सेवा संघ व संघर्ष कृती समितीच्या वतीने संयुक्त जिल्हा अधिवेशनाचे आयोजन देवरी येथे करण्यात आले होते. यामध्ये ओबीसी समाजातील लोक अधिक संख्येत उपस्थित होते. या जिल्हा अधिवेशनाअंतर्गत ओबीसी वर्गातर्फे काही प्रमुख मागण्या ठेवण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ओबीसीची जातीनिहाय जनगणना करून शेतकरी व शेतमजुरांच्या विकासाकरीता अर्थसंकल्पात लोकसंख्येनुसार आर्थिक तरतूद करण्यात यावी, पदोन्नतीतील प्रतिनिधीत्व मिळालेच पाहिजे, लोकसंख्या निहाय प्रतिनिधीत्व देण्यात यावे, तामिलनाडू राज्याप्रमाणे असंवैधानिक क्रिमीलेअर अट रद्द करणे, बिहार राज्याप्रमाणे शैक्षणिक भत्ता लागू करणे, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी तालुका व जिल्हास्तरावर वस्तीगृह व आश्रमशाळा सुरू करणे, ओबीसी स्वतंत्र मतदारसंघ व मंत्रालय निर्माण करण्यात यावे, रेल्वे बजेटप्रमाणे शेतकऱ्यांना स्वतंत्र बजेट देण्यात यावे, मंडल आयोग वनाची अप्पन समितीच्या शिफारशी लागू करणे अशा प्रकारे विविध मागण्या ठेवण्यात आल्या होत्या. या अधिवेशनाप्रसंगी प्रथम सत्रात जातीनिहाय जनगणनेशिवाय ओबीसी मंत्रालय अर्थपूर्ण की अर्थहीन या विषयानुसार उद्घाटक इंजि. संजय मगर यांनी माहिती दिली. चेतन उईके म्हणाले की, जोपर्यंत एसटी,एससी, ओबीसी हे एकत्र येवून लढा देत नाही तो पर्यंत शासनावर दबाव निर्माण होणार नाही. सत्राध्यक्ष म्हणून संस्थापक अध्यक्ष इंजि. प्रदीप ढोबळे यांनी ओबीसी कार्यकर्ता व जनतेला मार्गदर्शन केले. ओबीसीं शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात? या प्रबोधन सत्राचे मार्गदर्शक म्हणून बाळासाहेब गावंडे, प्रमुख अतिथी म्हणून सुमन बिसेन, सविता बेदरकर, अमर वऱ्हाडे, राजेश चांदेवार, सावन कटरे,संजय दरवडे व बबलू कटरे यांनी चर्चा घडवून आणली. (वार्ताहर)