शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

ओबीसी आयोगाच्या विधेयकाला काँग्रेस-राकाँचा विरोध का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:18 IST

ओबीसी समाजाकरीता राज्यात स्वतंत्र मंत्रालय बनविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. केंद्रात ओबीसी आयोगाचे बिल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत मांडले. लोकसभेत ते पास झाले. राज्यसभेत भाजप व मित्रपक्ष खासदारांची संख्या नव्हती.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचा सवाल : अर्जुनी-मोरगाव येथील प्रचारसभा

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : ओबीसी समाजाकरीता राज्यात स्वतंत्र मंत्रालय बनविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. केंद्रात ओबीसी आयोगाचे बिल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत मांडले. लोकसभेत ते पास झाले. राज्यसभेत भाजप व मित्रपक्ष खासदारांची संख्या नव्हती. राज्यसभेत ते बिल मांडल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी विरोधात मतदान करुन ते बिल पराजित केले. शेवटी वेगवेगळ्या पक्षाची मदत घेतली. काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षाला बाजूला टाकत राज्यसभेतून ओबीसी आयोग तयार केला. देशात पहिल्यांदा ओबीसींना संवैधानिक दर्जा देण्याचे काम मोदींने केले. आता ओबीसींचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीेने तेव्हा ओबीसी विधेयकाला विरोध का केला ?असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केला.स्थानिक जि.प. कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री राजकुमार बडोले, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, आ. परिणय फुके, आ. सुधाकर देशमुख व भाजपचे कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले महाराष्ट्र व केंद्रातील सरकार हे शेतकरी, शेतमजूर, गोरगरीबांच्या पाठिशी राहणारे आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील एक लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिली जाणार नाही. तोपर्यंत हे काम थांबणार नाही. काँग्रेसने मुंबईतील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आम्ही ते केलं नाही. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात दुष्काळ पडला. अनेक भागात रोवणी होऊ शकली नाही. मावा, तुडतुडा या कीडीने पीक उध्वस्त केले. त्यांना मदत देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला. शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी २०० रुपये बोनस देत आहेत. शेतकऱ्याच्या मदतीचा पैसा जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. अचानक आचार संहिता लागली. आम्ही निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली आहे. परवानगी मिळाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक तात्काळ मदतीची राशी जमा करु असे म्हणाले. २०११-१२ पासून ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नव्हती. ही सगळी शिष्यवृत्ती आमच्या सरकारने दिली. ओबीसींच्या शिष्यवृत्तीचा बँकलॉग भरुन काढला. आता वेळेवर देत आहोत. झाशीनगर उपसा योजना, इटियाडोह धरणाचा उजवा कालव्याचे काम हाती घेणार आहोत. या जिल्ह्यात पर्यटनाला वाव आहे. यापासून रोजगार निर्मिती होणार आहे. मोदींजीजवळ कोणतीच संपत्ती नाही. देशाची १२५ कोटी जनता हिच त्यांची संपत्ती आहे.स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतर अनेकांना स्वत:ची घरे नाहीत. केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना आणली. २०१२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचा त्यांचा संकल्प आहे. मात्र राज्य शासनाला २०१९ पर्यंत घरे देण्याच्या विचारात आहे. गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील १ लाख घरांचा यात समावेश आहे. याशिवाय त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या अनेक निर्णयाची माहिती दिली.इंदू मिलचा प्रश्न भाजपने मार्गी लावला-आठवलेराज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांसाठी काँग्रेसचे पैसा खर्च केला नाही. लंडन येथील घर, महू व इंदू मिलचे ठिकाणी भव्य स्मारक तयार करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. खऱ्या अर्थाने आंबेडकरांनी संविधानासाठी केलेले कष्ट भाजपानेच ओळखले. भाजपच्या पाठीत खंजीर खुपूसून नाना पटोले यांनी भाजपचा विश्वासघात केला आहे. मात्र भाजप सरकार हे दलित विरोधी आहे. असा खोटा अप्रचार विरोधक करीत आहेत. उलट दलित, आदिवासी, ओबीसी आरक्षणाला संरक्षण देणारे हे सरकार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपा