शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी २५,००० च्या लेव्हलवर; Bharti Airtel, IndusInd, Infosys टॉप लूझर्स
4
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
5
बिहार दौऱ्यादरम्यान आयनॉक्स मॉलमध्ये पोहचले राहुल गांधी, पाहिला 'हा' चित्रपट, म्हणाले...
6
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
8
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
9
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
10
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
11
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
12
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
13
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
14
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
15
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
16
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
17
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
18
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
19
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
20
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!

पोषण आहारातील कडधान्य विद्यार्थ्यांच्या घरपोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून तर इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून ...

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून तर इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत, परंतु शाळेत माध्यान्ह भोजन शिजवून देण्यावर बंदी असल्यामुळे पोषण आहारातील कडधान्य विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचविले जात असल्याचे सांगण्यात येते. त्यामधून तेल, तिखट गायब झाले, अशी पालकांची ओरड आहे. शासनाकडून शालेय पोषण आहारांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिले जात असून, त्यामध्ये पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी शंभर ग्रॅम तांदूळ प्रति दिवस तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दिडशे ग्रॅम तांदूळ दिले जाते. कोरोना काळात शाळा बंद होत्या, परंतु पोषण आहार नियमित पुरविल्या जात होते. डिसेंबर ते जानेवरी या दोन महिन्यांच्या तांदूळ, चणा, मसूरडाळ शाळांना प्राप्त होऊन विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचवून देण्यात आले. त्यामध्ये तेल, तिखट, मटकी आणि मूग शासनाकडून पुरविण्यात आले नाहीत, असे सांगण्यात आले. अजूनही शाळा पूर्वपदावर आल्या नाहीत. विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहू नयेत, शासनाकडून आलेली कडधान्य त्वरित विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे कार्य शाळास्तरावरून केले जात आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.

..........

तेल, तिखट, मूग, मटकीचा पुरवठा करा

काही पालक म्हणतात की, नुसती कडधान्ये देऊन काय उपयोग, त्याला शिजविण्यासाठी आवश्यक असणारी साहित्य तेल, तिखट, मूग असल्याशिवाय विद्यार्थ्यांचे पोषण कसे होईल, ज्या गोष्टीसाठी शाळांच्या माध्यमातून सकस आहार योजना लागू केली, ती गोष्ट म्हणजे कुपोषणावर मात करणे, यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू मिळाल्याशिवाय उपोषणावर मात करणे शक्य नाही. परिणामी, शासनाचा उद्देश परिपूर्ण होणार नाही. याची दखल घेऊन शासनाने तेल, तिखट, मूग, मटकी यांसारख्या वस्तूंचा नियमित पुरवठा करण्याची मागणी या ग्रामीण व आदिवासी भागातील पालकांनी केली आहे.