शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारातील कडधान्य विद्यार्थ्यांच्या घरपोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:29 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून तर इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून ...

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा २३ नोव्हेंबरपासून तर इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू झाल्या आहेत, परंतु शाळेत माध्यान्ह भोजन शिजवून देण्यावर बंदी असल्यामुळे पोषण आहारातील कडधान्य विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचविले जात असल्याचे सांगण्यात येते. त्यामधून तेल, तिखट गायब झाले, अशी पालकांची ओरड आहे. शासनाकडून शालेय पोषण आहारांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दिले जात असून, त्यामध्ये पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी शंभर ग्रॅम तांदूळ प्रति दिवस तर इयत्ता सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी दिडशे ग्रॅम तांदूळ दिले जाते. कोरोना काळात शाळा बंद होत्या, परंतु पोषण आहार नियमित पुरविल्या जात होते. डिसेंबर ते जानेवरी या दोन महिन्यांच्या तांदूळ, चणा, मसूरडाळ शाळांना प्राप्त होऊन विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचवून देण्यात आले. त्यामध्ये तेल, तिखट, मटकी आणि मूग शासनाकडून पुरविण्यात आले नाहीत, असे सांगण्यात आले. अजूनही शाळा पूर्वपदावर आल्या नाहीत. विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहू नयेत, शासनाकडून आलेली कडधान्य त्वरित विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याचे कार्य शाळास्तरावरून केले जात आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.

..........

तेल, तिखट, मूग, मटकीचा पुरवठा करा

काही पालक म्हणतात की, नुसती कडधान्ये देऊन काय उपयोग, त्याला शिजविण्यासाठी आवश्यक असणारी साहित्य तेल, तिखट, मूग असल्याशिवाय विद्यार्थ्यांचे पोषण कसे होईल, ज्या गोष्टीसाठी शाळांच्या माध्यमातून सकस आहार योजना लागू केली, ती गोष्ट म्हणजे कुपोषणावर मात करणे, यासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू मिळाल्याशिवाय उपोषणावर मात करणे शक्य नाही. परिणामी, शासनाचा उद्देश परिपूर्ण होणार नाही. याची दखल घेऊन शासनाने तेल, तिखट, मूग, मटकी यांसारख्या वस्तूंचा नियमित पुरवठा करण्याची मागणी या ग्रामीण व आदिवासी भागातील पालकांनी केली आहे.