शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा १७००० पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:26 IST

गोंदिया : मागील चार दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने कोरोना बाधितांची संख्या १७ हजार पार झाली ...

गोंदिया : मागील चार दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने कोरोना बाधितांची संख्या १७ हजार पार झाली आहे. बाधितांचा ग्राफ झपाट्याने वाढत असताना नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. हाच दुर्लक्षितपणा जिल्हावासीयांना महागात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता तरी नागरिकांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे.

जिल्ह्यात रविवारी (दि.४) ३१२ उच्चांकी कोरोना बाधितांची नोंद झाली. मागील पाच महिन्याच्या कालावधीतील रुग्ण संख्येचा हा सर्वाधिक आकडा होय आहे. तर ८८ कोराेना बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी आढळलेल्या ३१२ कोरोना बाधितांमध्ये सर्वाधिक १७३ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. तिरोडा २४, गोरेगाव ६, आमगाव २६, सालेकसा ५, देवरी १४, सडक अर्जुनी २९, अर्जुनी मोरगाव ३२ आणि बाहेरील राज्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. गोंदिया तालुक्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने हा तालुका कोरोनाचे हॉटस्पॉट झाला आहे. तर ग्रामीण भागात सुध्दा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे सर्वांनीच कोरोना नियमांचे पालन करुन काळजी घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत १०६९६० जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ९३१६५ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. या अंतर्गत ९२३०३ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ८५०६४ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १७००४ कोरोना बाधित आढळले असून यापैकी १५३२९ बाधितांनी मात केली आहे. सद्यस्थितीत १४८३ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ४९९ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडूृन प्राप्त व्हायचा आहे.

..................

चार दिवसात ९४४ बाधितांची नोंद

एप्रिल महिन्यात सातत्याने कोरोना बाधितांचा आलेख उंचावत आहे. १ ते ४ एप्रिल दरम्यान तब्बल ९४४ कोरोना बाधितांची नोंद झाली असून २४३ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने मागील वर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील उद्रेकाची पुनरावृत्ती होत असल्याचे चित्र आहे.

..............

कोरोनाचा मृत्यू दर १.१ टक्क्यावर

जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असली तरी मृत्यूचे प्रमाण कमी असल्याने ही थोडी दिलासादायक बाब आहे. जिल्ह्याचा कोरोना मृत्यू दर १.१ टक्के असून कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९१ टक्के आहे.

............