शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

आता पुन्हा भरू लागली तिथे पक्ष्यांची शाळा; बदलत्या वातावरणाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 15:37 IST

कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाउन आणि संचारबंदी लागू आहे. त्यामुळे प्रदूषणात सुध्दा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे वातावरणात सुध्दा चांगले बदल घडून येत असून रानावनात आणि गावाजवळ पक्ष्यांची किलबिलाट पुन्हा ऐकायला येऊ लागली आहे.

ठळक मुद्देपक्षी प्रेमींसाठी पर्वणीच,कटंगी परिसर फुलतोय

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यात मार्च महिन्यात आलेल्या वादळी वारा व गारिपटीमुळे जवळपास हजारो पोपटांचा कंटगी धरणाजवळ वनविभागाच्या सागवान रोपवनात मृत्यू झाला होता. एकेकाळी पक्ष्यांची शाळा येथे भरायची, पण १३ मार्चला आलेल्या वादळी वारा व गारपिटीमुळे सर्व काही उध्दवस्त झाले होते. कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाउन आणि संचारबंदी लागू आहे. त्यामुळे प्रदूषणात सुध्दा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे वातावरणात सुध्दा चांगले बदल घडून येत असून रानावनात आणि गावाजवळ पक्ष्यांची किलबिलाट पुन्हा ऐकायला येऊ लागली आहे. कटंगी जलाशयाजवळ पक्ष्यांची शाळा भरु लागल्याने पक्षी प्रेमींसाठी ही पर्वणीच ठरत आहे.कटंगी धरणाजवळ वनविभागची पन्नास एकरमध्ये सागवानचे रोपवन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पोपटांसह इतर पक्ष्यांचे वास्तव्य दिसत होते. मात्र १३ मार्चला आलेल्या वादळी वारा व गारपिटीमुळे जवळपास हजारो पक्षी मूत्यूमुखी पडले. जंगलात अक्षरश: मृत पोपटांचा सडा पडलेला दिसत होता. निसर्ग प्रेमींनीही पोपटांची वसाहत नेहमीसाठी इतिहासजमा होणार अशी भीतीही व्यक्त केली होती. पण अलीकडेच या ठिकाणी विविध प्रजातीचे पक्षी, पोपट, चिमणी, कावळे पाहयला मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी कायदा लागू करण्यात आली आहे.लॉकडाउनमुळे माणूस घरातच बंदिस्त झाला.त्यामुळे वातावरणात चांगले बदल पाहायला मिळत आहे. प्रदूषण कमी झाल्याने पक्ष्यांना शुद्ध व आल्हाददायक वातावरणात मुक्त संचार करता येत आहे.वास्तविक लॉकडाउनच्या काळात पशू-पक्ष्यांसाठी सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. कटंगी येथे मोठे धरण आहे. या धरणाजवळ वनविभागाचे मोठे जंगल आहे.या जंगल परिसरात पक्षांची शाळा भरते. मागील आठवडाभरापासून या ठिकाणी पक्ष्यांची पुन्हा किलबिलाट ऐकू येऊ लागली आहे.निसर्ग मंडळ उभारणार पाणपोईयेथील निसर्ग मंडळाने कंटगी धरणाजवळ वनविभागाच्या सागवान रोपवनात पाणपोईची व्यवस्था करण्याचे ठरविले आहे. निसर्ग मंडळाचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे, सचिव रेवेंद्रकुमार बिसेन यांनी दोन दिवसात वनविभागाच्या मदतीने या परिसरात शेकडो पाणपोई तयार करणार असे लोकमत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.लॉकडाउन व संचारबंदीमुळे तालुक्यातील जंगल परिसरात निरव शांतता पसरलेली आहे. प्रदूषण सुध्दा कमी झाले असून आल्हादायक वातावरण आहे. त्यामुळेच कटंगी धरणाजवळ पक्षाच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.- प्रवीण साठवने, वनपरिक्षेत्राधिकारी,गोरेगाव

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य