शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

आता पुन्हा भरू लागली तिथे पक्ष्यांची शाळा; बदलत्या वातावरणाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 15:37 IST

कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाउन आणि संचारबंदी लागू आहे. त्यामुळे प्रदूषणात सुध्दा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे वातावरणात सुध्दा चांगले बदल घडून येत असून रानावनात आणि गावाजवळ पक्ष्यांची किलबिलाट पुन्हा ऐकायला येऊ लागली आहे.

ठळक मुद्देपक्षी प्रेमींसाठी पर्वणीच,कटंगी परिसर फुलतोय

दिलीप चव्हाण ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यात मार्च महिन्यात आलेल्या वादळी वारा व गारिपटीमुळे जवळपास हजारो पोपटांचा कंटगी धरणाजवळ वनविभागाच्या सागवान रोपवनात मृत्यू झाला होता. एकेकाळी पक्ष्यांची शाळा येथे भरायची, पण १३ मार्चला आलेल्या वादळी वारा व गारपिटीमुळे सर्व काही उध्दवस्त झाले होते. कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाउन आणि संचारबंदी लागू आहे. त्यामुळे प्रदूषणात सुध्दा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे वातावरणात सुध्दा चांगले बदल घडून येत असून रानावनात आणि गावाजवळ पक्ष्यांची किलबिलाट पुन्हा ऐकायला येऊ लागली आहे. कटंगी जलाशयाजवळ पक्ष्यांची शाळा भरु लागल्याने पक्षी प्रेमींसाठी ही पर्वणीच ठरत आहे.कटंगी धरणाजवळ वनविभागची पन्नास एकरमध्ये सागवानचे रोपवन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पोपटांसह इतर पक्ष्यांचे वास्तव्य दिसत होते. मात्र १३ मार्चला आलेल्या वादळी वारा व गारपिटीमुळे जवळपास हजारो पक्षी मूत्यूमुखी पडले. जंगलात अक्षरश: मृत पोपटांचा सडा पडलेला दिसत होता. निसर्ग प्रेमींनीही पोपटांची वसाहत नेहमीसाठी इतिहासजमा होणार अशी भीतीही व्यक्त केली होती. पण अलीकडेच या ठिकाणी विविध प्रजातीचे पक्षी, पोपट, चिमणी, कावळे पाहयला मिळत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी कायदा लागू करण्यात आली आहे.लॉकडाउनमुळे माणूस घरातच बंदिस्त झाला.त्यामुळे वातावरणात चांगले बदल पाहायला मिळत आहे. प्रदूषण कमी झाल्याने पक्ष्यांना शुद्ध व आल्हाददायक वातावरणात मुक्त संचार करता येत आहे.वास्तविक लॉकडाउनच्या काळात पशू-पक्ष्यांसाठी सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. कटंगी येथे मोठे धरण आहे. या धरणाजवळ वनविभागाचे मोठे जंगल आहे.या जंगल परिसरात पक्षांची शाळा भरते. मागील आठवडाभरापासून या ठिकाणी पक्ष्यांची पुन्हा किलबिलाट ऐकू येऊ लागली आहे.निसर्ग मंडळ उभारणार पाणपोईयेथील निसर्ग मंडळाने कंटगी धरणाजवळ वनविभागाच्या सागवान रोपवनात पाणपोईची व्यवस्था करण्याचे ठरविले आहे. निसर्ग मंडळाचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे, सचिव रेवेंद्रकुमार बिसेन यांनी दोन दिवसात वनविभागाच्या मदतीने या परिसरात शेकडो पाणपोई तयार करणार असे लोकमत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.लॉकडाउन व संचारबंदीमुळे तालुक्यातील जंगल परिसरात निरव शांतता पसरलेली आहे. प्रदूषण सुध्दा कमी झाले असून आल्हादायक वातावरण आहे. त्यामुळेच कटंगी धरणाजवळ पक्षाच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.- प्रवीण साठवने, वनपरिक्षेत्राधिकारी,गोरेगाव

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य