शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आताचे राजकारण केवळ लाभासाठी

By admin | Updated: August 9, 2015 01:48 IST

स्वातंत्र्याच्या लढाईत आणि त्या काळच्या राजकारणातही त्यागाची भावना होती. परंतु आता राजकारणात प्राप्तीची आणि लाभाची भावना आहे.

त्यागभावना संपली : स्वा.सं. सेनानी केवलचंद जैन यांचे परखड मतलोकमत मुलाखतनरेश रहिले  गोंदियास्वातंत्र्याच्या लढाईत आणि त्या काळच्या राजकारणातही त्यागाची भावना होती. परंतु आता राजकारणात प्राप्तीची आणि लाभाची भावना आहे. जो तो मला या राजकारणातून काय मिळेल याचाच विचार करतो. त्यागाची किंवा देण्याची भावना मुळीच दिसत नाही, अशी खंत स्वातंत्र संग्राम सेनानी केवलचंद जैन यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीतून व्यक्त केली.आॅगस्ट क्रांतीदिनाच्या पार्श्वभूमीवर जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्वातंत्र्यकाळातील अनेक आठवणी जागविल्या. ते म्हणाले, देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी प्रत्येकाच्या मनात त्यागाची भावना होती. ती आताही प्रत्येक भारतीयाच्या मनात असणे आवश्यक आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत बेरार प्रांताचे (विदर्भ-मध्यप्रदेश) महत्व होते. एप्रिल ते आॅक्टोबर १९४७ दरम्यान यवतमाळ येथे चर्चा झाली. त्यावेळी पहिल्यांदा लोकांना देश पारतंत्र्यातून मुक्त होत आहे असे वाटले. १५ आॅगस्टची पूर्वसंध्या आणि १५ आॅगस्टचा दिवस लोकांनी जागून काढला होता.१९४२ मध्ये झालेल्या आंदोलनात इंग्रजाच्या विरोधात प्रचंड आक्रोश वाढला होता. आणखी जास्त काळ भारतात राहील्यास आपली हाणी होऊ शकते, असे इंग्रजांच्या लक्षात आले. ९ आॅगस्ट १९४२ चे आंदोलन सर्वात मोठे आंदोलन होते. सेवाग्राम येथे कॉंग्रेसची बैठक व मुंबईच्या गवालिया मैदानावर ‘करो या मरो, अंग्रेज भारत छोड़ो’ चे नारे लावण्यात आले. त्यावेळी रेडिओ आल्याने लोकही आंदोलनासोबत जुळले. आंदोलनाची तीव्रता पाहून सरकार घाबरले व त्यांनी लोकांना जेलमध्ये टाकण्याचा सपाटा सुरू केला. त्यामुळे ९ आॅगस्टला सर्वात जास्त अटक करण्यात आल्याचे जैन यांनी सांगितले.गोंदियातील अनेकांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभागस्वातंत्र्याच्या लढ्यात जिल्ह्यातील अनेकांचा सहभाग होता. त्यांच्यासोबत चतुर्भूज जसानी, केशवराव इंगळे, पन्नालाल दुबे, सोहनलाल मिश्रा, बाबा जोगलेकर, गिरधारीलाल शर्मा, रघुनाथदास शर्मा, सुखदेव वासुदेव अग्रवाल यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत सहभाग घेतला, असे जैन म्हणाले.दोन वेळा आले होते महात्मा गांधीस्व.जवाहरलाल नेहरू १९४१ मध्ये कलकत्यावरून वर्धा जात होते. त्यांनी १० मिनीटे गोंदियाच्या रेल्वेस्थानकावर थांबून लोकांना मार्गदर्शन केले. सन १९२७ व १९३३ मध्ये महात्मा गांधी दोन वेळा भंडारा व दोन वेळा गोंदियात आले. १९३३ च्या गांधीजींच्या सभेत मोठी गर्दी होती.गोंदिया-भंडाऱ्यात फायरिंंग९ आॅगस्टला गोंदियात मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी झालेल्या लोकांना पोलिसांनी अटक केली. गोंदियात पहिल्यावेळी १२ ते १३ हजार लोकांनी पोलीस ठाण्याचा घेराव केला होता. अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी भंडारा येथे पाठविण्यात आले. ९ ते १६ आॅगस्टदररम्यान जिल्ह्यातील ४५० ते ४७५ लोकांना तुरूंगात टाकले होते. भंडारा व तुमसर येथे तसेच गोंदिया येथे फायरिंग झाली. यावेळी अटक झालेल्या महिलांमध्ये सात ते आठ महिलासुद्धा होत्या. चार वेळा भोगला तुरूंगवास१९४३ मध्ये भंडाराचे मोतीलाल लांजेवार यांनी विचारलेल्या पत्राला आपण पत्र लिहून उत्तर दिल्याने आपल्याला तुरूंगात जावे लागले, असे केवलचंद जैन यांनी यांनी सांगितले. आंदोलन उग्र असावे असे आपण लिहीले होते. त्यामुळे बॉम्ब तयार करण्याची योजना असावी या संशयावरून पोलिसांनी आपल्याला अटक केली. तसेच लांजेवार यांचे घर फोडून शोधमोहीम राबविली. जैन पहिल्यावेळी १९४१ मध्ये, दुसऱ्यावेळी १९४२, तिसऱ्यावेळी १९४३ तर चौथ्यावेळी १९४५ मध्ये तुरूंगात गेले. त्यावेळचे वातावरण उत्साही होते. वयाच्या १३ व्या वर्षातच आपण स्वातंत्र्यलढ्यात उतरल्याचे त्यांनी सांगितले.स्वातंत्र्य संग्राम सेनानी जैन १९८० ते १९८६ पर्यंत विधान परिषदेचे सदस्य होते. १९८२-८३ मध्ये ते राज्याचे नियोजन, विधायक कार्य, ऊर्जा, उत्पादन शुल्क, वन, मद्य निषेध या विभागाचे राज्यमंत्री होते. १९८४-८५ मध्ये उच्चाधिकार समितीचे सचिव होते. वडील कन्हैयालाल जैन हेसुद्धा काँग्रेस कार्यकर्ता होते. माझ्या वडीलांना पुस्तके वाचण्याचा छंद होता. अलाहाबादवरून त्यावेळी चांद नावाचे वृत्तपत्र निघत होते. त्या वृत्तपत्राने २०० पानांची ‘फासी’ नावाची पुरवणी काढली. त्यात शहीदांची संपुर्ण माहिती होती. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात १९४२ पर्यंत कुणाकुणाला फाशी झाली याची माहिती होती. यातून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्याच्या लढाईत उतरल्याचे जैन म्हणाले.