शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
4
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
5
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
6
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
7
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
8
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
9
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
10
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
11
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
12
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
13
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
14
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
15
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
16
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
17
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
19
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
20
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार

आताचे राजकारण केवळ लाभासाठी

By admin | Updated: August 9, 2015 01:48 IST

स्वातंत्र्याच्या लढाईत आणि त्या काळच्या राजकारणातही त्यागाची भावना होती. परंतु आता राजकारणात प्राप्तीची आणि लाभाची भावना आहे.

त्यागभावना संपली : स्वा.सं. सेनानी केवलचंद जैन यांचे परखड मतलोकमत मुलाखतनरेश रहिले  गोंदियास्वातंत्र्याच्या लढाईत आणि त्या काळच्या राजकारणातही त्यागाची भावना होती. परंतु आता राजकारणात प्राप्तीची आणि लाभाची भावना आहे. जो तो मला या राजकारणातून काय मिळेल याचाच विचार करतो. त्यागाची किंवा देण्याची भावना मुळीच दिसत नाही, अशी खंत स्वातंत्र संग्राम सेनानी केवलचंद जैन यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीतून व्यक्त केली.आॅगस्ट क्रांतीदिनाच्या पार्श्वभूमीवर जैन यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्वातंत्र्यकाळातील अनेक आठवणी जागविल्या. ते म्हणाले, देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी प्रत्येकाच्या मनात त्यागाची भावना होती. ती आताही प्रत्येक भारतीयाच्या मनात असणे आवश्यक आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत बेरार प्रांताचे (विदर्भ-मध्यप्रदेश) महत्व होते. एप्रिल ते आॅक्टोबर १९४७ दरम्यान यवतमाळ येथे चर्चा झाली. त्यावेळी पहिल्यांदा लोकांना देश पारतंत्र्यातून मुक्त होत आहे असे वाटले. १५ आॅगस्टची पूर्वसंध्या आणि १५ आॅगस्टचा दिवस लोकांनी जागून काढला होता.१९४२ मध्ये झालेल्या आंदोलनात इंग्रजाच्या विरोधात प्रचंड आक्रोश वाढला होता. आणखी जास्त काळ भारतात राहील्यास आपली हाणी होऊ शकते, असे इंग्रजांच्या लक्षात आले. ९ आॅगस्ट १९४२ चे आंदोलन सर्वात मोठे आंदोलन होते. सेवाग्राम येथे कॉंग्रेसची बैठक व मुंबईच्या गवालिया मैदानावर ‘करो या मरो, अंग्रेज भारत छोड़ो’ चे नारे लावण्यात आले. त्यावेळी रेडिओ आल्याने लोकही आंदोलनासोबत जुळले. आंदोलनाची तीव्रता पाहून सरकार घाबरले व त्यांनी लोकांना जेलमध्ये टाकण्याचा सपाटा सुरू केला. त्यामुळे ९ आॅगस्टला सर्वात जास्त अटक करण्यात आल्याचे जैन यांनी सांगितले.गोंदियातील अनेकांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभागस्वातंत्र्याच्या लढ्यात जिल्ह्यातील अनेकांचा सहभाग होता. त्यांच्यासोबत चतुर्भूज जसानी, केशवराव इंगळे, पन्नालाल दुबे, सोहनलाल मिश्रा, बाबा जोगलेकर, गिरधारीलाल शर्मा, रघुनाथदास शर्मा, सुखदेव वासुदेव अग्रवाल यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत सहभाग घेतला, असे जैन म्हणाले.दोन वेळा आले होते महात्मा गांधीस्व.जवाहरलाल नेहरू १९४१ मध्ये कलकत्यावरून वर्धा जात होते. त्यांनी १० मिनीटे गोंदियाच्या रेल्वेस्थानकावर थांबून लोकांना मार्गदर्शन केले. सन १९२७ व १९३३ मध्ये महात्मा गांधी दोन वेळा भंडारा व दोन वेळा गोंदियात आले. १९३३ च्या गांधीजींच्या सभेत मोठी गर्दी होती.गोंदिया-भंडाऱ्यात फायरिंंग९ आॅगस्टला गोंदियात मोर्चा काढला. या मोर्चात सहभागी झालेल्या लोकांना पोलिसांनी अटक केली. गोंदियात पहिल्यावेळी १२ ते १३ हजार लोकांनी पोलीस ठाण्याचा घेराव केला होता. अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी भंडारा येथे पाठविण्यात आले. ९ ते १६ आॅगस्टदररम्यान जिल्ह्यातील ४५० ते ४७५ लोकांना तुरूंगात टाकले होते. भंडारा व तुमसर येथे तसेच गोंदिया येथे फायरिंग झाली. यावेळी अटक झालेल्या महिलांमध्ये सात ते आठ महिलासुद्धा होत्या. चार वेळा भोगला तुरूंगवास१९४३ मध्ये भंडाराचे मोतीलाल लांजेवार यांनी विचारलेल्या पत्राला आपण पत्र लिहून उत्तर दिल्याने आपल्याला तुरूंगात जावे लागले, असे केवलचंद जैन यांनी यांनी सांगितले. आंदोलन उग्र असावे असे आपण लिहीले होते. त्यामुळे बॉम्ब तयार करण्याची योजना असावी या संशयावरून पोलिसांनी आपल्याला अटक केली. तसेच लांजेवार यांचे घर फोडून शोधमोहीम राबविली. जैन पहिल्यावेळी १९४१ मध्ये, दुसऱ्यावेळी १९४२, तिसऱ्यावेळी १९४३ तर चौथ्यावेळी १९४५ मध्ये तुरूंगात गेले. त्यावेळचे वातावरण उत्साही होते. वयाच्या १३ व्या वर्षातच आपण स्वातंत्र्यलढ्यात उतरल्याचे त्यांनी सांगितले.स्वातंत्र्य संग्राम सेनानी जैन १९८० ते १९८६ पर्यंत विधान परिषदेचे सदस्य होते. १९८२-८३ मध्ये ते राज्याचे नियोजन, विधायक कार्य, ऊर्जा, उत्पादन शुल्क, वन, मद्य निषेध या विभागाचे राज्यमंत्री होते. १९८४-८५ मध्ये उच्चाधिकार समितीचे सचिव होते. वडील कन्हैयालाल जैन हेसुद्धा काँग्रेस कार्यकर्ता होते. माझ्या वडीलांना पुस्तके वाचण्याचा छंद होता. अलाहाबादवरून त्यावेळी चांद नावाचे वृत्तपत्र निघत होते. त्या वृत्तपत्राने २०० पानांची ‘फासी’ नावाची पुरवणी काढली. त्यात शहीदांची संपुर्ण माहिती होती. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात १९४२ पर्यंत कुणाकुणाला फाशी झाली याची माहिती होती. यातून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्याच्या लढाईत उतरल्याचे जैन म्हणाले.