शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

आता कौशल्य विकसित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 22:13 IST

आधुनिक व तंत्रज्ञानाच्या काळात जीवन जगत असताना स्वत:मध्ये असलेल्या कौशल्याचा सर्वांगीण विकास करणे गरजेचे आहे. तसेच स्वत:साठी स्वत:च्या मेहनतीने रोजगार निर्माण करुन आपले आर्थिक उत्पन्न वाढवून जीवनमानात बदल घडवून आणावे.

ठळक मुद्देसविता पुराम : रोजगार व उद्योजकता मेळावा

आॅनलाईन लोकमतसालेकसा : आधुनिक व तंत्रज्ञानाच्या काळात जीवन जगत असताना स्वत:मध्ये असलेल्या कौशल्याचा सर्वांगीण विकास करणे गरजेचे आहे. तसेच स्वत:साठी स्वत:च्या मेहनतीने रोजगार निर्माण करुन आपले आर्थिक उत्पन्न वाढवून जीवनमानात बदल घडवून आणावे. अशा रोजगार मेळाव्यातून रोजगाराची संधीसुद्धा मिळते, असे प्रतिपादन माजी जि.प. सभापती सविता पुराम यांनी केले.जिल्हा कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्र गोंदिया तसेच दिनबंधू ग्रामीण विकास संस्था देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल सालेकसा तालुक्यातील आदिवासी सांस्कृतिक भवनात प्रथमच कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मेळाव्यात त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या.न.पं. अध्यक्ष विरेंद्र उईके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी न.पं. सभापती उमेदलाल जैतवार, भाजपचे तालुका महामंत्री राजेंद्र बडोले, अर्जुनसिंह बैस, गणेश फरकुंडे, अशोक शेंडे, सहायक संचालक प्रविण खंडारे, रोजगार मार्गदर्शन अधिकारी आर.एन. माटे आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान उपस्थित सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना रोजगारासोबत पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध योजना व त्यासोबत पशुधन व्यवसायावर तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राहुल वºहारपांडे यांनी मार्गदर्शन केले.या वेळी न.पं. सभापती जैतवार यांनी, सुशिक्षित बेरोजगारांनी त्यांच्यासाठी पहिल्यांदा चालून आलेल्या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या भावी जीवनात यश मिळवावे, असे सांगितले.प्रास्ताविकातून खंडारे म्हणाले, सध्याचा काळ स्पर्धात्मक असून प्रत्येकाला शासकीय नोकरी मिळणे कठीण झाले आहे. विभागामार्फत अशा रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी प्राप्त करुन देण्यासाठी मेळावे घेतले जातात, असे सांगितले.संचालन व आभार दिनबंधू ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष कुलदीप लांजेवार यांनी केले. कार्यक्रमासाठी अण्णासाहेब पाटील, मागास आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक विकास मेश्राम, धुर्वे, लिल्हारे, गोपाल चनाप यांनी सहकार्य केले.२१५ उमेदवारांची निवडसदर मेळाव्यात एकूण दहा उद्योजक सहभागी झाले होते. सालेकसा तालुक्यातील विविध ठिकाणांवरुन ५७८ सुशिक्षित बेरोजगार उमेदवार सहभागी झाले. त्या २१५ उमेदवारांची प्राथमिक तत्वावर निवडसुद्धा करण्यात आली.