शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
3
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
5
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
6
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
7
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
8
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
9
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
11
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
12
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
13
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
14
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
15
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
16
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
17
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
18
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
19
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
20
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी

चार विधानसभेतील १६ उमेदवारांंना नोटीस

By admin | Updated: October 11, 2014 01:46 IST

अर्जुनी/मोरगाव, तिरोडा, गोंदिया व आमगाव या चारही विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी निवडणूक अधिकारी (खर्च व सनियंत्रण) यांना खर्चाची ...

गोंदिया : अर्जुनी/मोरगाव, तिरोडा, गोंदिया व आमगाव या चारही विधानसभा मतदार संघातील उमेदवारांनी निवडणूक अधिकारी (खर्च व सनियंत्रण) यांना खर्चाची योग्य माहिती न दिल्यामुळे निवडणूक आयोगाने १६ उमेदवारांना नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे त्यात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचाही समावेश आहे.गोंदिया विधानसभा क्षेत्रातील चार उमेदवारांना नोटीस बजावण्यात आली. त्यात शिवसेनेचे राजकुमार कुथे, काँग्रेसचे गोपालदास अग्रवाल, राष्ट्रवादीचे अशोक उर्फ गप्पू गुप्ता, भाजपचे विनोद अग्रवाल यांनी खर्च कमी दाखविल्याबद्दल त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आमगाव विधानसभा क्षेत्रातील केशव भोयर या अपक्ष उमेदवाराने आपल्या खर्चाचा हिशेबच सादर न केल्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्रातील सहा उमेदवारांना नोटीस मिळाली. त्यात अपक्ष महेश शेंडे व दिलीप वालदे या उमेदवारांनी खर्च सादरच केला नाही, तर अजय लांजेवार, काँग्रेसचे राजेश नंदागवळी, दिलवर्त रामटेके, राष्ट्रवादीचे मनोहर चंद्रिकापुरे यांच्या खर्चात तफावत असल्यामुळे त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तिरोडा विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादीच्या राजलक्ष्मी तुरकर, शिवसेनेचे पंचम बिसेन, भाजपचे विजय रहांगडाले, बसपाचे दीपक हिरापुरे व अपक्ष दिलीप बंसोड यांनी खर्च कमी दाखविल्यामुळे निवडणूक विभागाने त्यांना नोटीस बजावली आहे. जिल्ह्यातील चार विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांच्या खर्चाचे निरीक्षण करण्यासाठी सुरत येथून खर्च निरीक्षक ललित बिष्नोई आले आहेत. उमेदवारांच्या खर्चाची तपासणी तीन वेळा केली जाते. उमेदवारांच्या खर्चाचे वेळापत्रक निवडणूक विभागाने ठरवून दिले आहे. उमेदवारांसाठी अ‍ॅनेक्झर १४ भरून द्यायचा असतो. यात दररोज काय खर्च केला याचा लेखाजोखा उमेदवाराला निवडणूक विभागाला सादर करायचा असतो. अ‍ॅनेक्झर १४ अ मध्ये दैनंदिन खर्च उमेदवारांना देणे बंधनकारक असतो. लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम ७७ नुसार खर्च निरीक्षक जेव्हा मागेल तेव्हा उमेदवाराला तो हिशेब देणे बंधनकारक आहे. त्यात उमेदवारांची रोख नोंदवही असते. त्यात आवक-जावक व कॅश रजिस्टर नोंदणी केल्या जाते. तसेच उमेदवारांच्या बँकेच्या पासबुकच्या नोंदी देणे आवश्यक असते. उमेदवारांनी केलेला खर्च निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या खर्चाच्या आतच होणे गरजेचे असते. पण नोटीस बजावण्यात आलेल्या उमेदवारांनी या नोंदी व्यवस्थित घेतलेल्या नाहीत. (तालुका प्रतिनिधी)