शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

पक्षाला नाही, तर व्यक्तीला महत्त्व

By admin | Updated: October 9, 2014 23:03 IST

अलिकडे जातीपातीचे राजकारण सुरू झाले. हा माझा पक्ष, तो तुमचा पक्ष म्हणून राजकारणी भांडू लागले आहेत. पण आम्ही पक्षाला महत्व न देता व्यक्तीला महत्व देऊन जनसामान्यांच्या समस्या जो

लोकमत परिचर्चा : नवमतदार तरुणांनी व्यक्त केले निवडणुकीबद्दल मतप्रदर्शनगोंदिया : अलिकडे जातीपातीचे राजकारण सुरू झाले. हा माझा पक्ष, तो तुमचा पक्ष म्हणून राजकारणी भांडू लागले आहेत. पण आम्ही पक्षाला महत्व न देता व्यक्तीला महत्व देऊन जनसामान्यांच्या समस्या जो कोणी उचलून धरेल, अशाच व्यक्तीची निवड करणार आहोत. मतदारांनी आपल्या मतांचे मूल्य ओळखून आपले मत कोणत्याही आमिषाला बळी न पडता, विकू नये, असे आवाहन गोंदियातील नवतरूणांनी केले.गुरुवारी लोकमत जिल्हा कार्यालयात आयोजित तरूणांच्या परिचर्चेत ते बोलत होते. या चर्चेला नमाद महाविद्यालयातील इरसान पठान, ममिता पाचे, प्रगती मेश्राम, नुतन खोब्रागडे, एमआयबीपी महाविद्यालयाचे स्वीटी उके, प्रिती ठाकरे, संदीप वाढई, आकाश अग्रवाल, पियुष सतदेवे, अजय राणे, अवि बावणकर, राजकुमार बिसेन, अंकुश खापर्डे, मनिषा वाधवानी, हृद्या शेंडे, मेघना पटेल, राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयातील पूजा तिवारी, मनदीप वासनिक, लोकेश शेंडे, सुनिता भेलावे, एम.बी.पटेल महाविद्यालय सालेकसा येथील माधवी चुटेलकर, धोटे बंधु विज्ञान महाविद्यालयातील मनोज पारधी, पेमेश गौतम, मोहनीश बिसेन, आकाश पारधी व जगत महाविद्यालय गोरेगाव येथील प्रशांत वासनिक उपस्थित होते. या चर्चासत्रात भाग घेतलेले अनेक तरूण विद्यार्थी पहिल्यांदाच मतदान करीत असल्याने मतदान प्रक्रियेसंदर्भात त्यांच्यात कुतूहल जाणवले. आपण भारताचे नागरिक आहोत, आपण निवडून दिलेला उमेदवार आपले प्रतिनिधीत्व करतो. त्यामुळे जबाबदार व्यक्तीला निवडून देताना आपण जाणकार झालो अशी भावना आपल्यामध्ये येत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या मताधिकाराचा उपयोग चांगल्या व्यक्तीच्या निवडीसाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसीची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यांची शिष्यवृत्ती अनेक वर्षापासून मिळाली नाही, या समस्येला कुणीही उचलून धरले नाही. त्यामुळे मतदान करताना या बाबीचा विद्यार्थी वर्ग निश्चितच विचार करतील. आम्ही कुण्या पक्षाला पाहून मतदान करणार नाही तर व्यक्तीला पाहून मतदान करू, जेणेकरून ती व्यक्ती आमच्या समस्या सोडविल. गोंदिया जिल्ह्यातील तरूण बेरोजगार आहेत. त्यांच्यासाठी उद्योग नाही, एखादे काम करायचे असल्यास त्याला ८ ते १० वर्षे उशीर लागतो. यामुळे सामान्य माणूस भरडला जातो. आपल्या विधानसभा क्षेत्राला आपले घर समजून कार्य केल्यास निश्चितच विकास होईल. विदर्भाच्या मुद्यावर चर्चा करताना तरूण म्हणाले, विदर्भात वीज तयार होते, मात्र विदर्भवासीयांना अंधारात रहावे लागते. मग आपले नेते जातात कुठे? आपल्याकडील नेत्यांपेक्षा पश्चिम महाराष्ट्रातील नेते जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तत्परता दाखवितात. येथील नेते त्याबाबत तत्परता का दाखवित नाही? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत समस्या सहन कराव्या लागतात. रस्ते, पाणी, वीज या समस्यांना दुर करण्याचे आश्वासन उमेदवार निवडणुकीमध्ये देतात. मात्र निवडणूक होताच या समस्येवर विरजण टाकले जाते. त्यासाठी मतदारांनी जागृत होणे आवश्यक आहे. मतदारांनी कुठल्याही उमेदवाराच्या खोट्या आश्वासनाना बळी न पडता निष्पक्षपणे आपल्याला वाटेल त्या उमेदवाराला मतदान करावे. मतदान हा आपला अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन ही तरूणांनी यावेळी केले. (तालुका प्रतिनिधी)