शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाला नाही, तर व्यक्तीला महत्त्व

By admin | Updated: October 9, 2014 23:03 IST

अलिकडे जातीपातीचे राजकारण सुरू झाले. हा माझा पक्ष, तो तुमचा पक्ष म्हणून राजकारणी भांडू लागले आहेत. पण आम्ही पक्षाला महत्व न देता व्यक्तीला महत्व देऊन जनसामान्यांच्या समस्या जो

लोकमत परिचर्चा : नवमतदार तरुणांनी व्यक्त केले निवडणुकीबद्दल मतप्रदर्शनगोंदिया : अलिकडे जातीपातीचे राजकारण सुरू झाले. हा माझा पक्ष, तो तुमचा पक्ष म्हणून राजकारणी भांडू लागले आहेत. पण आम्ही पक्षाला महत्व न देता व्यक्तीला महत्व देऊन जनसामान्यांच्या समस्या जो कोणी उचलून धरेल, अशाच व्यक्तीची निवड करणार आहोत. मतदारांनी आपल्या मतांचे मूल्य ओळखून आपले मत कोणत्याही आमिषाला बळी न पडता, विकू नये, असे आवाहन गोंदियातील नवतरूणांनी केले.गुरुवारी लोकमत जिल्हा कार्यालयात आयोजित तरूणांच्या परिचर्चेत ते बोलत होते. या चर्चेला नमाद महाविद्यालयातील इरसान पठान, ममिता पाचे, प्रगती मेश्राम, नुतन खोब्रागडे, एमआयबीपी महाविद्यालयाचे स्वीटी उके, प्रिती ठाकरे, संदीप वाढई, आकाश अग्रवाल, पियुष सतदेवे, अजय राणे, अवि बावणकर, राजकुमार बिसेन, अंकुश खापर्डे, मनिषा वाधवानी, हृद्या शेंडे, मेघना पटेल, राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयातील पूजा तिवारी, मनदीप वासनिक, लोकेश शेंडे, सुनिता भेलावे, एम.बी.पटेल महाविद्यालय सालेकसा येथील माधवी चुटेलकर, धोटे बंधु विज्ञान महाविद्यालयातील मनोज पारधी, पेमेश गौतम, मोहनीश बिसेन, आकाश पारधी व जगत महाविद्यालय गोरेगाव येथील प्रशांत वासनिक उपस्थित होते. या चर्चासत्रात भाग घेतलेले अनेक तरूण विद्यार्थी पहिल्यांदाच मतदान करीत असल्याने मतदान प्रक्रियेसंदर्भात त्यांच्यात कुतूहल जाणवले. आपण भारताचे नागरिक आहोत, आपण निवडून दिलेला उमेदवार आपले प्रतिनिधीत्व करतो. त्यामुळे जबाबदार व्यक्तीला निवडून देताना आपण जाणकार झालो अशी भावना आपल्यामध्ये येत असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या मताधिकाराचा उपयोग चांगल्या व्यक्तीच्या निवडीसाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसीची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यांची शिष्यवृत्ती अनेक वर्षापासून मिळाली नाही, या समस्येला कुणीही उचलून धरले नाही. त्यामुळे मतदान करताना या बाबीचा विद्यार्थी वर्ग निश्चितच विचार करतील. आम्ही कुण्या पक्षाला पाहून मतदान करणार नाही तर व्यक्तीला पाहून मतदान करू, जेणेकरून ती व्यक्ती आमच्या समस्या सोडविल. गोंदिया जिल्ह्यातील तरूण बेरोजगार आहेत. त्यांच्यासाठी उद्योग नाही, एखादे काम करायचे असल्यास त्याला ८ ते १० वर्षे उशीर लागतो. यामुळे सामान्य माणूस भरडला जातो. आपल्या विधानसभा क्षेत्राला आपले घर समजून कार्य केल्यास निश्चितच विकास होईल. विदर्भाच्या मुद्यावर चर्चा करताना तरूण म्हणाले, विदर्भात वीज तयार होते, मात्र विदर्भवासीयांना अंधारात रहावे लागते. मग आपले नेते जातात कुठे? आपल्याकडील नेत्यांपेक्षा पश्चिम महाराष्ट्रातील नेते जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तत्परता दाखवितात. येथील नेते त्याबाबत तत्परता का दाखवित नाही? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत समस्या सहन कराव्या लागतात. रस्ते, पाणी, वीज या समस्यांना दुर करण्याचे आश्वासन उमेदवार निवडणुकीमध्ये देतात. मात्र निवडणूक होताच या समस्येवर विरजण टाकले जाते. त्यासाठी मतदारांनी जागृत होणे आवश्यक आहे. मतदारांनी कुठल्याही उमेदवाराच्या खोट्या आश्वासनाना बळी न पडता निष्पक्षपणे आपल्याला वाटेल त्या उमेदवाराला मतदान करावे. मतदान हा आपला अधिकार आहे. त्यासाठी प्रत्येकाने मतदान करावे असे आवाहन ही तरूणांनी यावेळी केले. (तालुका प्रतिनिधी)