शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

महामार्ग नव्हे, हा तर मृत्यूमार्गच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 22:24 IST

लाखनी, मुरमाडी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने अपघाताच्या घटना वेळोवेळी घडत असतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग हा लाखनी परिसरातील जनतेसाठी मृत्यूमार्ग बनला आहे.

ठळक मुद्देलाखनी शहरात ६३ अपघात : महामार्गावर गतिरोधकांची गरज

ऑनलाईन लोकमतलाखनी : लाखनी, मुरमाडी शहरातून जाणाऱ्यां राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने अपघाताच्या घटना वेळोवेळी घडत असतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग हा लाखनी परिसरातील जनतेसाठी मृत्यूमार्ग बनला आहे. वाढत्या अपघाताच्या प्रमाणामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे उड्डाण पुलाला मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात काम सुरु व्हायला उशीर आहे. तसेच उड्डाणपुलाचे काम तीन वर्षे चालणार असल्याने वाहतुकीचे नियंत्रण करणे अशोका बिल्डकॉम कंपनी व पोलीस स्टेशन समोर मोठे आव्हान असणार आहे.मागील वर्षी सन २०१७ ला लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत मुंडीपार ते केसलवाडा (फाटा) दरम्यान एकुण ६३ अपघात झाले आहेत. एकूण अपघातापैकी २० अपघातामध्ये २० लोक जागीच मरण पावले आहेत. तसेच ४३ अपघातामध्ये गंभीर जखमी व कायमचे अपंगत्व आलेले आहेत. याबाबत जनतेच्या मनात राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस ठाणे अधिकारी व कर्मचारी यांचे बद्दल प्रचंड दोन्ही बाजूला दाट लोकवस्ती, शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, न्यायालय असल्याने जनतेचे महामार्ग ओलांडून जाण्याचे प्रमाण जास्त आहे.अशोका बिल्डकॉम कंपनीकडे ठाणेदार यशवंत सोलसे यांनी पत्रव्यवहार करून पेट्रोलपंप चौक, तहसील चौक, सिंधी लाईन, लाखोरी फाटा, बसस्टॉप, मानेगाव फाटा, पिंपळगाव फाटा, मुंडीपार फाटा येथे गतीरोधक तात्काळ बसविण्यात येणे आवश्यक आहे.लाखनी शहराचा आठवडी बाजार मंगळवारला भरतो. आठवडी बाजारासाठी स्वतंत्र जागा आहे. परंतु गेल्या तीन वर्षापासून अर्धेधिक आठवडी बाजार राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर भरतो व राष्ट्रीय महामार्गावर लोक वाहने उभी करत असतात.तहसील चौकापासून ते सिंधी लाईन चौक पर्यंतच्या सर्व्हीस रोडवर भाजीपाल्यांची दुकाने लागलेली असतात. राष्ट्रीय महामार्गावर मार्चनंतर उड्डाणपुलाचे काम सुरु होणार आहे. त्यामुळे आठवडी बाजार हलविणे किंवा मुळ जागेवर नेणे आवश्यक असणार आहे.यापूर्वी महामार्गावरील सर्व्हीस रोडचे आठवडी बाजाराची दुकाने हटविण्यासाठी अशोका बिल्डकॉन व पोलीस विभागाने प्रयत्न केले. परंतु त्यांना यश मिळाले नाही. भाजीविक्रेते प्रशासनाला जुमानत नसल्याने अपघाताची घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अवैध पार्किंगची समस्याराष्ट्रीय महामार्गावर मुख्य रस्त्यावर ट्रक व इतर वाहने उभी असात तर सर्व्हीस रोडवर, ट्रक, मिनीडोअर, कार, आॅटो आदींची पार्कींग केली जाते. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. लाखनीच्या मुख्य बसस्थानकाजवळ, लाखोरी रोड फाटा, जयस्तंभ चौक, बाजार चौक, तहसील कार्यालयासमोरील चौका काळीपिवळी आॅटो उभे असतात. बाजार चौक व तहसील चौकातील आॅटोचालकाच्या प्रवासी वाहतुकीला जनता कंटाळली आहे. बस थांबण्याच्या जागेवर आॅटो उभे असतात. त्यामुळे अनेकदा बसला थांबण्यासाठी जागा नसते व बसवाहक गाडी पुढे नेतात. यामुळे आॅटोवाहकासाठी नियमावली असणे आवश्यक आहे.