शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
5
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
6
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
7
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
8
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
9
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
10
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
11
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
12
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
13
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
14
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
15
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
16
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
17
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
18
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
19
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
20
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा

मतदारयादीत नाव नाही, नोंदणीसाठी तातडीने अर्ज करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 05:00 IST

एका मताव्दारेच एखादी योग्य व्यक्ती निवडून आल्यास चांगली कामे होतात. तेथेच चुकीची व्यक्ती निवडून आल्यास विकास कामांपासून क्षेत्र माघारते. यामुळेच प्रत्येकाने आपले बहुमूल्य मत योग्यरीत्या वापरावे असे सांगितले जात असून या बहुमूल्य मतांसाठीच ५ वर्षे राज्य करणारी व्यक्ती तुमच्यापर्यंत मताची मागणी करण्यासाठी येते. यामुळेच प्रत्येकाने मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य समजून नक्की मतदान करावे, असे निवडणूक आयोगाकडूनही सांगितले जाते.

कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकशाही राज्यात एका-एका मतालाही मोठे महत्त्व असून एक मत एखाद्याचे भाग्य बनवू शकते तर हेच एक मत एखाद्याला नेस्तनाबूदही करू शकते. या एका मताव्दारेच एखादी योग्य व्यक्ती निवडून आल्यास चांगली कामे होतात. तेथेच चुकीची व्यक्ती निवडून आल्यास विकास कामांपासून क्षेत्र माघारते. यामुळेच प्रत्येकाने आपले बहुमूल्य मत योग्यरीत्या वापरावे असे सांगितले जात असून या बहुमूल्य मतांसाठीच ५ वर्षे राज्य करणारी व्यक्ती तुमच्यापर्यंत मताची मागणी करण्यासाठी येते. यामुळेच प्रत्येकाने मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य समजून नक्की मतदान करावे, असे निवडणूक आयोगाकडूनही सांगितले जाते. आता येणारा काळ निवडणुकांचा काळ राहणार असून यातूनच नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी काम सुरू झाले आहे. १ ते ३० नोव्हेंबरपर्यंत यासाठी विशेष मोहीम राबविली जात असून त्यात वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्यांना नाव नोंदविण्यासाठी संधी मिळाली आहे. यामुळे या संधीचा लाभ घेत नवमतदारांना आपले नाव नोंदवून येणाऱ्या निवडणुकांत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. 

अशी करा नोंदणी - आपल्या देशात वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीला मतदानाचा हक्क देण्यात आला आहे. यामुळे वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्यांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी फॉर्म क्रमांक-६ भरावयाचा आहे. या फॉर्मवर बीएलओंची सही लागते व तेच तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात हे फॉर्म जमा करतात. त्यानंतर मतदार यादीत नाव नोंदणी केली जाते. यासाठी सध्या मोहीम सुरू असून बीएलओ ही सर्व कामे करीत आहेत.

पहिल्यांदाच बजावणार मी माझा हक्क ! निवडणुकीत आतापर्यंत बॅलेटवर शिक्का मारला जात होता. मात्र आता मशीनचे बटण दाबले जात असल्याचे माहिती आहे. प्रत्यक्षात बघितले नसून आतापर्यंत मतदानाचा हक्का बजावलेला नाही. मात्र आता १८ वर्षे पूर्ण झाली असून मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अर्ज केलेला आहे. त्यामुळे येत्या निवडणुकांत मतदानाचा हक्क बजावता येणार असून त्याची उत्सुकता आहे. -विलास गुरव

निवडणुकीत मतदान कसे करतात याबाबत उत्सुकता आहे. आतापर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत होत्या. तर आता मशीनव्दारे निवडणुका घेतल्या जात आहेत. यामुळेच मतदान कसे करायचे याबाबत उत्सुकता वाढली आहे. आता यादीत नाव आले असून येत्या निवडणुकांत मतदानाचा हक्का बजावणार. -राहुल बागडे 

 

टॅग्स :VotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग