शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

प्रचार-प्रसिद्धीसाठी निधीची मागणीच नाही !

By admin | Updated: October 2, 2015 06:33 IST

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प शुक्रवारपासून पर्यटकांना वनभ्रमंतीसाठी खुला होणार आहे. वन्यजीवांची माहिती

गोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प शुक्रवारपासून पर्यटकांना वनभ्रमंतीसाठी खुला होणार आहे. वन्यजीवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठीच ७ आॅक्टोबरपर्यंत वन्यजीव सप्ताहसुद्धा साजरा केला जात आहे. मात्र या व्याघ्र प्रकल्पाच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी शासनाकडे निधीची मागणीच केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे मार्केटिंगच नाही तर पर्यटक या व्याघ्र राखीव क्षेत्राकडे आकर्षित होणार कसे, आणि जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार कशी? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. सन २०१३ मध्ये राज्यातील पाचवे व्याघ्र राखीव क्षेत्र म्हणून गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आला. यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव अभयारण्य, नागझिरा अभयारण्य, नवीन नागझिरा अभयारण्य, कोका अभयारण्य असे एकूण चार अभयारण्य व एक राष्ट्रीय उद्यानाचा समावेश आहे. हे क्षेत्र विविध वनस्पती, विविध प्राणी-पक्षी व अनेक सरपटणारे प्राणी नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध असल्याने पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. मात्र वन्यजीव विभाग प्रचार-प्रसिद्धीवर पुरेसा खर्च करीत नसल्याने पर्यटकांची संख्या जेवढ्या मोठ्या प्रमाणात असायला हवी, तेवढी दिसून येत नाही. योग्य प्रकारे नियोजन करून प्रचार-प्रसिद्धी करण्यात आली तर निश्चितच येथे पर्यटकांची संख्या लाखोंच्या घरात जावू शकते. पण अद्यापही वन्यजीव विभागाला व्याघ्र प्रकल्पाच्या मार्केटिंगची गरज वाटत नाही काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.आश्चर्याची बाब म्हणजे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची प्रचार-प्रसिद्धी केवळ केवळ वार्षिक २० ते २५ हजार रूपयांत गुंडाळली जाते, अशी माहिती खुद्द वनाधिकाऱ्यांनीच दिली. एवढ्याशा अल्प निधीत केवळ काही पोस्टर व लिफलेट प्रकाशित केल्या जातात. याव्यतिरिक्त इतर प्रसार माध्यमांद्वारे कोणतीच प्रसिद्धी केली जात नाही. विशेष म्हणजे पाावसाळ्यात वनभ्रमंती कोणत्या तारखेपासून बंद होणार याची माहिती देण्यास पुढाकार घेणारा वन्यजीव विभाग वनभ्रमंती आता सुरू होणार हे सांगण्यासाठी मात्र पुढाकार घेत नाही. एवढेच नाही तर वन्यजीव सप्ताहाचीही माहिती या विभागाला बातमीरूपाने प्रसिद्ध करावीशी वाटली नाही. कोणत्या प्रकारच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी वरिष्ठ स्तरावर स्थानिक वन्यजीव विभागाकडून निधीची मागणी केली जात नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केल्यावर त्यांनी या बाबीला दुजोरा दिला. विविध प्रसार माध्यमांद्वारे प्रचार-प्रसार करण्यात आला तर निश्चितच विदेशी पर्यटकसुद्धा मोठ्या प्रमाणात आकर्षित होवू शकतात, यात शंका नाही. (प्रतिनिधी)जनवन योजनेत प्रकल्पातील १० गावेयंदापासून शासनाने नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या दोन किमी अंतरावरील गावांचा विकास करण्यासाठी श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना सुरू केली आहे. या योजनेत राज्यातील १५० गावांचा समावेश असून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाजवळील व बफर झोनमधे मोडणाऱ्या गावांचा समावेश आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील केवळ तीनच गावांचा समावेश असून भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्यालगतच्या सात गावांचा समावेश आहे. डोंगरगाव (कोहमारा) क्षेत्रातील बोवाटोला व नवेगाव राष्ट्रीय उद्यान क्षेत्रातील रामपुरी व येलोडी या दोन गावांचा समावेश आहे. ४कोका अभयारण्याजवळील सर्वेवाडा, टेकेपार, इंजेवाडा, डोंगरदेव, किटाळी, बोंडे व सितेपारचा समावेश आहे. या योजनेचा मायक्रो प्लॅन पाच वर्षांसाठी असून गावांचा विकास, सुधारणा, सिंचन, कृषी आदी सर्व विभागांची विकास कामे करण्यात येणार आहेत. त्यानुसार अनुदानही ठरवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.नागझिरा-नवेगाव क्षेत्राबद्दल पर्यटकांना माहिती मिळावी यासाठी पोस्टर्स, लिफलेट प्रकाशित केले जातात. त्यासाठी वर्षाला २०-२५ हजार रुपयांचा आमचा बजेट असतो. पण प्रसार माध्यमांमधून जाहीरातीच्या स्वरूपात प्रचार-प्रसिद्धी करण्यासाठी आम्ही विभागाकडे कधी निधीची मागणी केली नाही. आता खऱ्या अर्थाने व्याघ्र प्रकल्पाचे काम सुरळीत झाल्यामुळे पुढील वर्षाकरिता निधीची मागणी करू.- एस.एस.कातोरेविभागीय वनाधिकारी, वन्यजीव विभाग, गोंदिया