शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचाविरूद्धचा अविश्वास प्रस्ताव बारगळला

By admin | Updated: August 1, 2015 02:14 IST

स्थानिक सरपंचाविरूद्ध अविश्वास प्रस्ताव आणल्यासाठी दिलेल्या नोटिसवर १४ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असताना प्रत्यक्ष ठराव घेण्याच्या वेळी

नवेगावबांध: स्थानिक सरपंचाविरूद्ध अविश्वास प्रस्ताव आणल्यासाठी दिलेल्या नोटिसवर १४ सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असताना प्रत्यक्ष ठराव घेण्याच्या वेळी फक्त नऊ सदस्यच उपस्थित असल्यामुळे नवेगावबांध सरपंचाविरूद्धचा अविश्वास प्रस्ताव बारगळला. सविस्तर वृत्त असे की, नवेगावबांध येथील एकूण १७ सदस्यीय ग्राम पंचायतच्या सरपंच म्हणून लीनाताई डोंगरवार यांनी सुमारे अडीच वर्षापूर्वी पद स्विकारले. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत राजकीय वातावरण तापले. त्यामुळे काही ग्राम पंचायत सदस्य नाराज झाले. गावातील राजकीय समीकरण बदलविण्यासाठी सरपंच विरोधात अविश्वास प्रस्तावाच्या नोटिसामध्ये एकुण १४ सदस्यांनी स्वाक्षऱ्या करून सदर नोटिस तहसीलदार अर्जुनी मोरगाव यांचेकडे सादर केली. त्यावर तहसीलदारांनी बुधवारी (दि.२९) विशेष सभा ग्राम पंचायत कार्यालयात बोलविली. सदर सभेला सुरूवात करून दुपारी दोन वाजेपर्यंत वाट पाहण्यात आली. निर्धारित वेळेत एकुण १७ सदस्यांपैकी फक्त ९ सदस्यच उपस्थित झाले. त्यामुळे मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ अन्वय अर्जुनी मोरगावचे तहसीलदार रहांगडाले सदर अविश्वास प्रस्ताव रद्द ठरविला. त्यामुळे सरपंच लीनाबाई डोंगरवार यांना जीवदान मिळाले. असे असले तरी सदर प्रस्तावाच्या तारखेच्या तीन दिवस अगोदर विरोधकांना तहसीलदारांनी एक निवेदन दिले होते. निवडणूक दिनांकापासून सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र राखीव जागेतून निवडून आलेल्या प्रत्येक उमेदवाराने दिले. नवेगावबांध ग्राम पंचायतमध्ये असे ११ सदस्य आहेत की जे विविध राखीव प्रवर्गातून निवडून आलेत. परंतु अजुनही त्या सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाहीत. त्यामुळे ज्यांचेकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही अशा सदस्यांचे सदस्यत्व रद्द करून नंतर अविश्वास प्रस्तावासंदर्भात विशेष सभा बोलविण्यात यावी अशी लेखी मागणी काही सदस्यांनी तहसीलदारांकडे केली होती. परंतु तहसीलदारांनी या बाबीकडे दुर्लक्ष केले, असा विरोधी सदस्यांचा आरोप आहे. (वार्ताहर)