शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
3
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
4
दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
5
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
6
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
7
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
8
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
9
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
10
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
11
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
12
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
13
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
14
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
15
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
16
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
18
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

जंतनाशक गोळ््यांपासून एकही बालक वंचित राहू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 21:09 IST

बालकांच्या आरोग्यासाठी जंतनाशकाच्या गोळ्या देणे गरजेचे असून सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे. जेणेकरून शाळा व अंगणवाडी स्तरावरील एकही बालक जंतनाशक गोळ््यांच्या लाभापासून वंचित राहू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : १० आॅगस्ट रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बालकांच्या आरोग्यासाठी जंतनाशकाच्या गोळ्या देणे गरजेचे असून सर्व विभागांनी समन्वय ठेवून काम करावे. जेणेकरून शाळा व अंगणवाडी स्तरावरील एकही बालक जंतनाशक गोळ््यांच्या लाभापासून वंचित राहू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात १० आॅगस्ट राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेच्या अनुषंगाने आयोजित जिल्हा समन्वय समितीच्या सभेत अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.टी.बी.खंडाते, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी टी.व्ही.पौनीकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड, आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक अधिकारी व्ही.व्ही.तितीरमारे प्रामुख्याने उपस्थित होते.१० आॅगस्ट रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १ ते १९ वर्ष वयोगटातील तीन लाख ४३ हजार २७१ बालकांना जंतनाशकाच्या गोळ््या देण्यात येणार आहे. त्याकरीता १ ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे यासाठी ही मोहिम राबविण्यात येत आहे.ही मोहीम यशस्वीपणे राबविण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य, महिला व बालकल्याण, आदिवासी विकास, पाणी पुरवठा व पंचायत विभाग दक्षतापूर्वक काम करीत आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेच्या जिल्हा समन्वय समितीच्या सभेला सर्व तालुका आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. सभेचे सादरीकरण जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी अधिकारी डॉ.अनंत चांदेकर यांनी केले. आभार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांनी मानले.असा दिला जाणार डोजजंताचे राऊंड वर्म, व्हीप वर्म व हुक वर्म असे तीन प्रकार असून त्यांचा मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जसे- जंतसंसर्गाचा बालकांच्या रक्तक्षय (अनिमिया), अतिसार, मळमळणे, भुक मंदावणे, थकवा व अस्वस्थपणा, कुपोषण, शौचाच्या वेळेस रक्त पडणे, पोटाला सुज येणे इत्यादी परिणाम होतात. वयोगटानुसार १ ते २ वर्ष वयोगटात अर्धी गोळी (२०० मि.ग्रॅम) व ३ ते १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना पूर्ण गोळी (४०० मि.ग्रॅम) विनामूल्य देण्यात येणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्यcollectorजिल्हाधिकारी