शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात १०० ग्राहक झालेत ‘निर्भय’

By admin | Updated: February 18, 2015 01:31 IST

पाणी विक्री रक्कम व त्यावरील व्याज अशी एकूण १० कोटी ६४ लाख ८५ हजार ३०१ रूपयांची थकबाकी वसुलीच्या टेंशनमध्ये असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या मदतीला शासनाने निर्भय योजना दिली.

गोंदिया : पाणी विक्री रक्कम व त्यावरील व्याज अशी एकूण १० कोटी ६४ लाख ८५ हजार ३०१ रूपयांची थकबाकी वसुलीच्या टेंशनमध्ये असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या मदतीला शासनाने निर्भय योजना दिली. नळ कनेक्शनधारकांवर असलेल्या पाणीपट्टी करावरील व्याजाची माफी करणाऱ्या लाभदायक असलेल्या निर्भय योजनेचा गेल्या एक महिन्यात केवळ १०० ग्राहकांनी लाभ घेत व्याजाची रक्कम माफ करवून घेतली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला शहरातील घरगुती, औद्योगीक, बिगर घरगुती ग्राहक व नगर परिषदेवर पाणी विक्री रक्कम व त्यावरील व्याज अशी एकूण १० कोटी ६४ लाख ८५ हजार ३०१ रूपयांची थकबाकी वसुल करायची आहे. यासाठी मजीप्राने कंबर कसली असून तीन पथकांकडून कर वसुली मोहीम राबविली जात आहे. मात्र ग्राहकांकडून पैसे काढून घेणे तेवढे सहज नाही. मात्र कोटींच्या असलेली थकबाकीची रक्कम सोडणे शक्य नाही. अशात थकबाकीदारांना थकबाकीची रक्कम भरण्यासाठी प्रोत्साहीत करण्याच्या दृष्टीने शासनाने १६ जानेवारी पासून निर्भय योजना सुरू केली आहे. या योजनेत भाग घेणाऱ्या ग्राहकांच्या पाणीपट्टी करावर आकारण्यात आलेल्या व्याजाची रक्कम पूर्णपणे माफ केली जाणार आहे. यासाठी योजनेला मुदतवाढ दिली असून आता ग्राहकांना येत्या ३१ जुलैपर्यंत त्यांच्याकडील संपूर्ण थकबाकी भरावयाची आहे. मजीप्राचे एकूण ११ हजार ३०० ग्राहक आहेत, तर नगर परिषदेचे आजघडीला ५० सार्वजनिक नळ कनेक्शन्स आहेत. विशेष म्हणजे नगर परिषदेचे २९० सार्वजनिक नळ होते. मात्र सन २००९ मध्ये मजीप्राने त्यात कपात करून ९० वर आणले. सन २०१३ मध्ये ७० कनेक्शन केले. २०१४ मध्ये आणखी कमी करून आज ५० सार्वजनिक नळ आहेत. (शहर प्रतिनिधी)तीन पथकांमार्फत वसुलीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणने सुरू केलेल्या निर्भय योजनेचा आतापर्यंत १०० ग्राहकांनी लाभ घेतला आहे. लाभ घेणाऱ्या या त्या ग्राहकांकडून मजीप्राला सुमारे २.५० लाख रूपये प्राप्त झाले असून ग्राहकांची सुमारे पाच लाख रूपयांची व्याज माफी झाली आहे. थकबाकीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी मजीप्राने तीन पथक तयार केले असून ते कर वसुली मोहीम राबवित आहेत. व्याज माफीच्या या मोहिमेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही केले जात आहे. निर्भय योजनेचे स्वरूप या योजनेंतर्गत थकबाकीदाराकडे (नळकनेक्शधारक) थकित असलेल्या पाणीपट्टी करावर आकारण्यात आलेल्या व्याजाच्या रकमेची माफी केली जाणार आहे. यासाठी थकबाकीदारांनी आपले नाव मजीप्राकडे नोंदवायचे आहे. थकबाकीदारांना ही योजना लागू झाल्यापासून पूर्ण कालावधीत एकरकमी रक्कम भरण्याची मुभा असेल, मात्र यासाठी कार्यालयात उपलब्ध विहीत प्रपत्रात निर्भय योजनेत सहभागी होणे आवश्यक राहील. ज्या थकबाकीदारांकडील पाणीपट्टी विलंब आकारासह थकीत आहे व असे ग्राहक जे मूळ पाणीपट्टी रक्कम पूर्णत: म्हणजेच १०० टक्के भरतील, त्यांनाच निर्भय योजनेत १०० टक्के माफीचा लाभ मिळेल. ज्या ग्राहकांनी याआधी मुळ रक्कम भरली आहे व त्यांच्याकडे व्याजाची रक्कम असल्यास त्या ग्राहकांनाही १०० टक्के व्याजमाफीचा लाभ घेण्यासाठी या योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे. अन्यथा अशा ग्राहकांची नळ जोडणी कापण्याची मोहीम सुरू होणार आहे.