शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

महिनाभरात १०० ग्राहक झालेत ‘निर्भय’

By admin | Updated: February 18, 2015 01:31 IST

पाणी विक्री रक्कम व त्यावरील व्याज अशी एकूण १० कोटी ६४ लाख ८५ हजार ३०१ रूपयांची थकबाकी वसुलीच्या टेंशनमध्ये असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या मदतीला शासनाने निर्भय योजना दिली.

गोंदिया : पाणी विक्री रक्कम व त्यावरील व्याज अशी एकूण १० कोटी ६४ लाख ८५ हजार ३०१ रूपयांची थकबाकी वसुलीच्या टेंशनमध्ये असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या मदतीला शासनाने निर्भय योजना दिली. नळ कनेक्शनधारकांवर असलेल्या पाणीपट्टी करावरील व्याजाची माफी करणाऱ्या लाभदायक असलेल्या निर्भय योजनेचा गेल्या एक महिन्यात केवळ १०० ग्राहकांनी लाभ घेत व्याजाची रक्कम माफ करवून घेतली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाला शहरातील घरगुती, औद्योगीक, बिगर घरगुती ग्राहक व नगर परिषदेवर पाणी विक्री रक्कम व त्यावरील व्याज अशी एकूण १० कोटी ६४ लाख ८५ हजार ३०१ रूपयांची थकबाकी वसुल करायची आहे. यासाठी मजीप्राने कंबर कसली असून तीन पथकांकडून कर वसुली मोहीम राबविली जात आहे. मात्र ग्राहकांकडून पैसे काढून घेणे तेवढे सहज नाही. मात्र कोटींच्या असलेली थकबाकीची रक्कम सोडणे शक्य नाही. अशात थकबाकीदारांना थकबाकीची रक्कम भरण्यासाठी प्रोत्साहीत करण्याच्या दृष्टीने शासनाने १६ जानेवारी पासून निर्भय योजना सुरू केली आहे. या योजनेत भाग घेणाऱ्या ग्राहकांच्या पाणीपट्टी करावर आकारण्यात आलेल्या व्याजाची रक्कम पूर्णपणे माफ केली जाणार आहे. यासाठी योजनेला मुदतवाढ दिली असून आता ग्राहकांना येत्या ३१ जुलैपर्यंत त्यांच्याकडील संपूर्ण थकबाकी भरावयाची आहे. मजीप्राचे एकूण ११ हजार ३०० ग्राहक आहेत, तर नगर परिषदेचे आजघडीला ५० सार्वजनिक नळ कनेक्शन्स आहेत. विशेष म्हणजे नगर परिषदेचे २९० सार्वजनिक नळ होते. मात्र सन २००९ मध्ये मजीप्राने त्यात कपात करून ९० वर आणले. सन २०१३ मध्ये ७० कनेक्शन केले. २०१४ मध्ये आणखी कमी करून आज ५० सार्वजनिक नळ आहेत. (शहर प्रतिनिधी)तीन पथकांमार्फत वसुलीमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणने सुरू केलेल्या निर्भय योजनेचा आतापर्यंत १०० ग्राहकांनी लाभ घेतला आहे. लाभ घेणाऱ्या या त्या ग्राहकांकडून मजीप्राला सुमारे २.५० लाख रूपये प्राप्त झाले असून ग्राहकांची सुमारे पाच लाख रूपयांची व्याज माफी झाली आहे. थकबाकीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी मजीप्राने तीन पथक तयार केले असून ते कर वसुली मोहीम राबवित आहेत. व्याज माफीच्या या मोहिमेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही केले जात आहे. निर्भय योजनेचे स्वरूप या योजनेंतर्गत थकबाकीदाराकडे (नळकनेक्शधारक) थकित असलेल्या पाणीपट्टी करावर आकारण्यात आलेल्या व्याजाच्या रकमेची माफी केली जाणार आहे. यासाठी थकबाकीदारांनी आपले नाव मजीप्राकडे नोंदवायचे आहे. थकबाकीदारांना ही योजना लागू झाल्यापासून पूर्ण कालावधीत एकरकमी रक्कम भरण्याची मुभा असेल, मात्र यासाठी कार्यालयात उपलब्ध विहीत प्रपत्रात निर्भय योजनेत सहभागी होणे आवश्यक राहील. ज्या थकबाकीदारांकडील पाणीपट्टी विलंब आकारासह थकीत आहे व असे ग्राहक जे मूळ पाणीपट्टी रक्कम पूर्णत: म्हणजेच १०० टक्के भरतील, त्यांनाच निर्भय योजनेत १०० टक्के माफीचा लाभ मिळेल. ज्या ग्राहकांनी याआधी मुळ रक्कम भरली आहे व त्यांच्याकडे व्याजाची रक्कम असल्यास त्या ग्राहकांनाही १०० टक्के व्याजमाफीचा लाभ घेण्यासाठी या योजनेत सहभागी होणे आवश्यक आहे. अन्यथा अशा ग्राहकांची नळ जोडणी कापण्याची मोहीम सुरू होणार आहे.