शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यात पाडा जुना उड्डाणपूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 23:22 IST

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण झालेला उड्डाणपूल नऊ महिन्याच्या आत पाडण्यात यावा. उड्डाणपूल पाडण्याचे काम रेल्वे विभाग करणार असून त्यासाठी येणार सर्व खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावा, .....

ठळक मुद्देरेल्वेने दिले पत्र : प्रस्तावित पुलाचा आराखडा तयार करा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण झालेला उड्डाणपूल नऊ महिन्याच्या आत पाडण्यात यावा. उड्डाणपूल पाडण्याचे काम रेल्वे विभाग करणार असून त्यासाठी येणार सर्व खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावा, या आशयाचे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्याची विश्वसनीय माहिती.शहरातील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून रेल्वे ट्रॅक परिसरातील उड्डाणपुलाचा भाग केव्हाही कोसळू शकतो. त्यामुळे वाहतुकीसाठी हा पूल पूर्णपणे बंद करण्यात यावा. पुलावरुन वाहतूक सुरू ठेवल्यास एखादी घटना घडल्यास याला रेल्वे विभाग जबाबदार राहणार नाही, असे पत्र यापूर्वीच रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आठवडाभरापूर्वी जुन्या उड्डाणपुलावरुन जडवाहतूक पूर्णपणे बंद करण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजुला हाईट बॅरियर लावले. त्यामुळे जुन्या उड्डाणपुलावरुन सध्या कार, दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू आहे. मात्र रेल्वे विभाग अद्यापही यासाठी तयार नाही. आठ दिवसांपूर्वीच रेल्वे विभागाने जुना उड्डाणपूल नऊ महिन्याच्या आत पाडून नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी आरखडा तयार करण्याचे निर्देश दिले. उड्डाणपूल पाडण्याचे काम रेल्वे विभाग करणार असून त्यासाठी येणार खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावा. ही सर्व कारवाही त्वरीत सुरू करण्यात यावी. याला विलंब केल्यास रेल्वे विभाग यासाठी जबाबदार राहणार नसल्याचे पत्रात म्हटल्याची माहिती आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र मिळताच त्यांनी उड्डाणपूल पाडण्यासाठी एजन्सींचा शोध घेतला. मात्र त्यांना यात यश आले नाही, त्यामुळे आता रेल्वेच जुना उड्डाणपूल पाडणार आहे. पूल पाडण्याचे काम अंत्यत कठीण असून यामुळे रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम होवू शकतो. त्यामुळे यासाठी मेगाब्लॉक घ्यावा लागणार आहे. त्याचेच नियोजन रेल्वे विभागाकडून सध्या सुरु आहे. रेल्वे उड्डाणपूल पाडण्यासाठी नऊ महिन्यांची डेडलाईन दिली आहे.तसेच नवीन प्रस्तावित उड्डाणपुलाचा आरखडा तयार करण्यास सांगितले. त्यामुळेच पूल पाडण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होण्याची शक्यता रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.वाहतूक सुरू ठेवण्यास विरोधरेल्वे विभागाच्या तांत्रिक अधिकाºयांनी शहरातील जुन्या उड्डाणपुलाची पाहणी केल्यानंतर रेल्वे ट्रॅक भागातील पुलाची स्थिती फारच गंभीर आहे. त्यामुळे पुलाचा काही भाग कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पुलावरुन हलकी व जड वाहनाची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याची मागणी रेल्वे विभागाने केल्याची माहिती आहे.नवीन उड्डाणपुलावरुन जडवाहतूक सुरूशहरातील नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम सदोष करण्यात आल्याने या पुुुलावरुन जडवाहतुक सुरू ठेवण्यात येवू नये. असा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. मात्र यानंतरही नवीन उड्डाणपुलावरुन जडवाहतूक सुरू आहे. त्यामुळे एखादा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण राहणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान या प्रकाराकडे संबंधित विभागाचे सुध्दा दुर्लक्ष झाले आहे.

टॅग्स :railwayरेल्वे