शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

नऊ महिन्यात पाडा जुना उड्डाणपूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 23:22 IST

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण झालेला उड्डाणपूल नऊ महिन्याच्या आत पाडण्यात यावा. उड्डाणपूल पाडण्याचे काम रेल्वे विभाग करणार असून त्यासाठी येणार सर्व खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावा, .....

ठळक मुद्देरेल्वेने दिले पत्र : प्रस्तावित पुलाचा आराखडा तयार करा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण झालेला उड्डाणपूल नऊ महिन्याच्या आत पाडण्यात यावा. उड्डाणपूल पाडण्याचे काम रेल्वे विभाग करणार असून त्यासाठी येणार सर्व खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावा, या आशयाचे पत्र रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्याची विश्वसनीय माहिती.शहरातील जुना उड्डाणपूल जीर्ण झाला असून रेल्वे ट्रॅक परिसरातील उड्डाणपुलाचा भाग केव्हाही कोसळू शकतो. त्यामुळे वाहतुकीसाठी हा पूल पूर्णपणे बंद करण्यात यावा. पुलावरुन वाहतूक सुरू ठेवल्यास एखादी घटना घडल्यास याला रेल्वे विभाग जबाबदार राहणार नाही, असे पत्र यापूर्वीच रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आठवडाभरापूर्वी जुन्या उड्डाणपुलावरुन जडवाहतूक पूर्णपणे बंद करण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजुला हाईट बॅरियर लावले. त्यामुळे जुन्या उड्डाणपुलावरुन सध्या कार, दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू आहे. मात्र रेल्वे विभाग अद्यापही यासाठी तयार नाही. आठ दिवसांपूर्वीच रेल्वे विभागाने जुना उड्डाणपूल नऊ महिन्याच्या आत पाडून नवीन उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी आरखडा तयार करण्याचे निर्देश दिले. उड्डाणपूल पाडण्याचे काम रेल्वे विभाग करणार असून त्यासाठी येणार खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावा. ही सर्व कारवाही त्वरीत सुरू करण्यात यावी. याला विलंब केल्यास रेल्वे विभाग यासाठी जबाबदार राहणार नसल्याचे पत्रात म्हटल्याची माहिती आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र मिळताच त्यांनी उड्डाणपूल पाडण्यासाठी एजन्सींचा शोध घेतला. मात्र त्यांना यात यश आले नाही, त्यामुळे आता रेल्वेच जुना उड्डाणपूल पाडणार आहे. पूल पाडण्याचे काम अंत्यत कठीण असून यामुळे रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम होवू शकतो. त्यामुळे यासाठी मेगाब्लॉक घ्यावा लागणार आहे. त्याचेच नियोजन रेल्वे विभागाकडून सध्या सुरु आहे. रेल्वे उड्डाणपूल पाडण्यासाठी नऊ महिन्यांची डेडलाईन दिली आहे.तसेच नवीन प्रस्तावित उड्डाणपुलाचा आरखडा तयार करण्यास सांगितले. त्यामुळेच पूल पाडण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होण्याची शक्यता रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.वाहतूक सुरू ठेवण्यास विरोधरेल्वे विभागाच्या तांत्रिक अधिकाºयांनी शहरातील जुन्या उड्डाणपुलाची पाहणी केल्यानंतर रेल्वे ट्रॅक भागातील पुलाची स्थिती फारच गंभीर आहे. त्यामुळे पुलाचा काही भाग कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या पुलावरुन हलकी व जड वाहनाची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याची मागणी रेल्वे विभागाने केल्याची माहिती आहे.नवीन उड्डाणपुलावरुन जडवाहतूक सुरूशहरातील नवीन उड्डाणपुलाचे बांधकाम सदोष करण्यात आल्याने या पुुुलावरुन जडवाहतुक सुरू ठेवण्यात येवू नये. असा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. मात्र यानंतरही नवीन उड्डाणपुलावरुन जडवाहतूक सुरू आहे. त्यामुळे एखादा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण राहणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान या प्रकाराकडे संबंधित विभागाचे सुध्दा दुर्लक्ष झाले आहे.

टॅग्स :railwayरेल्वे