शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
4
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
5
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
6
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
7
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
8
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
9
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
10
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
11
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
13
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
14
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
15
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
16
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
17
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
18
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
19
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
20
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'

नवनिर्माण नळ योजनेला जलशुद्धीकरण यंत्राची गरज

By admin | Updated: May 9, 2016 01:53 IST

येथील नवनिर्माण होत असलेल्या पाणी पुरवठा योजनेला जल शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले नसल्यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध क्षारयुक्त पाणी मिळत आहे.

आरोग्य धोक्यात : क्षारयुक्त पाण्याने बळावतोय आजार रावणवाडी : येथील नवनिर्माण होत असलेल्या पाणी पुरवठा योजनेला जल शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले नसल्यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध क्षारयुक्त पाणी मिळत आहे. बदलत्या जल वायू प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला एका मागून एक आजार उद्भवत आहेत. ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याकरिता पाणी पुरवठा योजनेत जल शुद्धीकरण यंत्र बसविणे गरजेचे आहे.शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामीण भागात नाही. पिण्याच्या पाण्याचे नमूने तपासणी होत नसल्यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध क्षारयुक्त पाणी प्यावे लागते. रावणवाडी गावालगत नदी नाले नसून बोर किंवा विहिरीचेच पाणी प्यावे लागते. हे क्षारयुक्त पाणी पेल्याने गावकऱ्यांचे आयुष्यच काळवंडले आहे. क्षारयुक्त पाण्याने दातांच्या तक्रारी देखील वाढल्या असून कमरेचे व गुडघ्याचे आजारही जडले आहेत. मात्र याकडे प्रशसनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची खंत गावातील नागरिकांनी केली आहे.रावणवाडी येथील ग्रामस्थ शेती, मोलमजूरी काही लघू व्यवसाय करुन आपली उपजिवीका करतात. अंदाजे ३ हजार लोक या गावातील ग्रामस्थांना जल शुद्धीकरणाची प्रक्रिया न करताच पाणी पुरवठा केला जाणार आहे. अनेक वर्षापासून क्षारयुक्त पाणी प्यावे लागत असल्याने संपूर्ण गावातील अनेक नागरिकांना विविध आजाराचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने लक्ष देऊन नवनिर्माण होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेला जल शुद्धीकरण यंत्र बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.पूर्वीपासूनच क्षारयुक्त पिण्याचे पाणी वापराने अनेक ग्रामस्थांना दाताचे आजार जडले आहेत. अनेकांना या क्षारयुक्त पाण्यामुळे सांदेदुखी, हाडे ढिसूळ होणे, अ‍ॅसिडीटी इन्कामअ‍ेशन पोलचे विविध आजार ही पूर्वीच उग्र रुप धारण केले आहे. राज्यामध्ये निवडणूक आलीच की राजकीय मंडळी गावागावात भेटी सभा घेऊन विविध प्रकारचे आश्वासने देऊन सर्वत्र गावावाजा करतात. परंतु फ्लोराईडयुक्त पाण्याच्या समस्येबाबत गावकऱ्यांची अनास्था दिसून येते. रस्ते, नाल्या, सभामंडप, चावड्याचे जाळे पसविण्यात लोकप्रतिनिधी धन्यता माणून आम्ही ग्रामीण भागाचे विकास करीत आहोत. आमच्याकडून जो विकास झाला तो मुळीच कोणी करु शकत नाही असे जनतेला दर्शवून क्षेत्र लुटण्यातच धन्यता मानत असतात. क्षारयुक्त पाणी आणि गावकऱ्यांचे आरोग्य याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समस्त गावकऱ्यांचे बोलणे आहे. (वार्ताहर)