शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
3
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
4
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
5
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
6
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
7
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
8
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
9
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
10
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
11
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
12
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
13
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
14
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
15
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
16
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
17
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
18
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
19
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
20
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

नवनिर्माण नळ योजनेला जलशुद्धीकरण यंत्राची गरज

By admin | Updated: May 9, 2016 01:53 IST

येथील नवनिर्माण होत असलेल्या पाणी पुरवठा योजनेला जल शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले नसल्यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध क्षारयुक्त पाणी मिळत आहे.

आरोग्य धोक्यात : क्षारयुक्त पाण्याने बळावतोय आजार रावणवाडी : येथील नवनिर्माण होत असलेल्या पाणी पुरवठा योजनेला जल शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले नसल्यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध क्षारयुक्त पाणी मिळत आहे. बदलत्या जल वायू प्रदुषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला एका मागून एक आजार उद्भवत आहेत. ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याकरिता पाणी पुरवठा योजनेत जल शुद्धीकरण यंत्र बसविणे गरजेचे आहे.शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामीण भागात नाही. पिण्याच्या पाण्याचे नमूने तपासणी होत नसल्यामुळे ग्रामस्थांना अशुद्ध क्षारयुक्त पाणी प्यावे लागते. रावणवाडी गावालगत नदी नाले नसून बोर किंवा विहिरीचेच पाणी प्यावे लागते. हे क्षारयुक्त पाणी पेल्याने गावकऱ्यांचे आयुष्यच काळवंडले आहे. क्षारयुक्त पाण्याने दातांच्या तक्रारी देखील वाढल्या असून कमरेचे व गुडघ्याचे आजारही जडले आहेत. मात्र याकडे प्रशसनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची खंत गावातील नागरिकांनी केली आहे.रावणवाडी येथील ग्रामस्थ शेती, मोलमजूरी काही लघू व्यवसाय करुन आपली उपजिवीका करतात. अंदाजे ३ हजार लोक या गावातील ग्रामस्थांना जल शुद्धीकरणाची प्रक्रिया न करताच पाणी पुरवठा केला जाणार आहे. अनेक वर्षापासून क्षारयुक्त पाणी प्यावे लागत असल्याने संपूर्ण गावातील अनेक नागरिकांना विविध आजाराचा सामना करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने लक्ष देऊन नवनिर्माण होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेला जल शुद्धीकरण यंत्र बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.पूर्वीपासूनच क्षारयुक्त पिण्याचे पाणी वापराने अनेक ग्रामस्थांना दाताचे आजार जडले आहेत. अनेकांना या क्षारयुक्त पाण्यामुळे सांदेदुखी, हाडे ढिसूळ होणे, अ‍ॅसिडीटी इन्कामअ‍ेशन पोलचे विविध आजार ही पूर्वीच उग्र रुप धारण केले आहे. राज्यामध्ये निवडणूक आलीच की राजकीय मंडळी गावागावात भेटी सभा घेऊन विविध प्रकारचे आश्वासने देऊन सर्वत्र गावावाजा करतात. परंतु फ्लोराईडयुक्त पाण्याच्या समस्येबाबत गावकऱ्यांची अनास्था दिसून येते. रस्ते, नाल्या, सभामंडप, चावड्याचे जाळे पसविण्यात लोकप्रतिनिधी धन्यता माणून आम्ही ग्रामीण भागाचे विकास करीत आहोत. आमच्याकडून जो विकास झाला तो मुळीच कोणी करु शकत नाही असे जनतेला दर्शवून क्षेत्र लुटण्यातच धन्यता मानत असतात. क्षारयुक्त पाणी आणि गावकऱ्यांचे आरोग्य याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समस्त गावकऱ्यांचे बोलणे आहे. (वार्ताहर)