शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2017 00:25 IST

कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ पडतो आहे. वातावरणातील ओझोन वायुचे प्रमाण कमी होत आहे.

बडोले : धम्मकुटी येथे ४ कोटी रोपटी लावणार लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ पडतो आहे. वातावरणातील ओझोन वायुचे प्रमाण कमी होत आहे. अनेक विषारी किरणे पृथ्वीवर येत आहेत. उत्तर धृवावरचा बर्फ वितळताना दिसतो आहे. यासर्व घडामोडी पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे घडून येत आहे. बिघडलेल्या पर्यावरणाच्या संतुलनासाठी वृक्ष लागवड आज काळाची गरज झाली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. शनिवारी (दि.१) सडक-अर्जुनी तालुक्यातील डव्वा-पळसगाव जवळील सम्यक संकल्प धम्मकुटी येथे ४ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत जिल्हास्तरीय वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, उपवनसंरक्षक एस.युवराज, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी प्रदिपकुमार बडगे, भंते संघधातू, तहसीलदार विठ्ठल परळीकर, जैवविविधता समिती अध्यक्ष विलास चव्हाण, माजी जि.प.सदस्य किरण गावराणे, पं.स.सदस्य जोशीला जोशी, बाजार समतिीचे संचालक डॉ.भुमेश्वर पटले, पुष्पमाला बडोले, विठ्ठल साखरे, चेतन वडगाये उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी काळे यांनी, जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी १५ लाख खड्डे करण्यात आले आहे. टिश्यू कल्चरच्या माध्यमातून २ लाख पिवळ््या पळसाची रोपटी तयार करण्यात येतील. परदेशी वृक्षांची लागवड न करता केवळ देशी वृक्षांची लागवड राज्यात केवळ गोंदिया जिल्ह्यातच होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकातून माहिती देतांना युवराज यांनी, जिल्ह्याला १२ लाख ३० हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मात्र जिल्ह्यात १५ लाख ९७ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत ४०० रोपांची लागवड करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्यासह अन्य मान्यवरांनी सम्यक संकल्प धम्मकुटीच्या परिसरात वृक्ष लागवड केली.