शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

पीक पद्धतीत बदल ही काळाची गरज

By admin | Updated: January 4, 2016 04:11 IST

पारंपरिक पद्धतीने शेती करणे आजघडीला परवडण्यासारखे नाही. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे.

तालुका कृषी अधिकारी तुमडाम : शेतकरी प्रशिक्षण, सेंद्रिय खताचा वापरबोंडगावदेवी : पारंपरिक पद्धतीने शेती करणे आजघडीला परवडण्यासारखे नाही. दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. कीड रोगाच्या संक्रमणाने पीक उत्पादनात घट होत आहे. धान उत्पादनाला लागत जास्त लागते व उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धानाचे उत्पादन घेण्यासाठी नियोजन करून तंत्रशुद्ध पद्धतीचा अंगिकार करणे अतिआवश्यक आहे. महागड्या रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय खताचा मारा करण्याबरोबरच पीक पद्धतीत बदल करणे आज काळाची गरज आहे, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी केले.राष्ट्रीय सुरक्षा अभियानांतर्गत अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तिडका येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. याप्रसंगी गावातील शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी पं.स. सदस्या जयश्री पंधरे होत्या. अतिथी म्हणून ग्रामपंचायत सदस्य अशोक लंजे, आसाराम मेश्राम तसेच मार्गदर्शक म्हणून तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, मंडळ कृषी अधिकारी ऋषी चांदेवार, कृषी पर्यवेक्षक ठाकूर उपस्थित होते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत खरीप व रबी हंगाम प्रकल्पांतर्गत तिडका या गावाची निवड करण्यात आली होती. प्रकल्पांतर्गत गावातील ७५ शेतकऱ्यांची निवड करण्यात येवून खरीप हंगामासाठी एमटीयू १०७५ या जातीच्या धानाचे बियाणे मोफत शेतकऱ्यांना देण्यात आले होते. शेतकऱ्यांनी तंत्रशुद्ध पद्धतीने तसेच कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने धानाची लागवड करुन योग्य जोपासना केल्याने हेक्टरी ५० ते ५५ क्विंटल धानाचे उत्पादन झाल्याचे शेतकऱ्यांनी स्वत:हून सांगितले. पुढील हंगामातसुद्धा एमटीयू १०७५ या जातीच्या धानाची लागवड करुन जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा मनोदय शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. दुबार पीक पद्धतीवर आधारित ७५ प्रात्यक्षिक हरभरा वान जँकी ९२१८, विराट तसेच हरभऱ्याला लागणाऱ्या जैविक कीटकनाशकाचा वापर शक्यतो कमीकमी करुन सेंद्रीय खताचा जास्तीत जास्त करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम यांनी शेतकऱ्यांना केले. वारंवार धानाचे उत्पादन घेण्याचा हट्ट शेतकऱ्यांनी झिडकावून वेगवेगळे पीक घेण्याची मानसिकता तयार करावी. केळी व भाजीपाला यासारख्या पिकांचे उत्पादन घेतल्यास दुष्काळावर सहज मात करता येईल. शेडनेट, ड्रिपइरिनेशनच्या माध्यमातून भरघोस उत्पादन घेता येत असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी पर्यवेक्षक ठाकूर यांनी शेतकऱ्यांसाठी असलेल्या कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती सांगितली. संचालन कृषी सहायक अविनाश हुकरे यांनी केले. आभार भारती येरणे यांनी मानले. कार्यक्रमात गावातील बहुसंख्य शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. (वार्ताहर)