शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

आनंदासाठी वाचन आवश्यक

By admin | Updated: February 2, 2016 01:39 IST

ग्रंथ स्वयंपूर्ण असतात. ग्रंथ वाचनाने प्राप्त झालेल्या ज्ञानामुळे माणूस भीतीमुक्त होतो व अज्ञानी माणूस मात्र सतत भीतीच्या छायेत वावरतो.

उपविभागीय अधिकारी राव : तीन दिवसीय ग्रंथोत्सवाची सांगता गोंदिया : ग्रंथ स्वयंपूर्ण असतात. ग्रंथ वाचनाने प्राप्त झालेल्या ज्ञानामुळे माणूस भीतीमुक्त होतो व अज्ञानी माणूस मात्र सतत भीतीच्या छायेत वावरतो. जीवनात आत्मशांती, विरंगुळा व भयमुक्ततेसाठी वाचन अवश्य करावे, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव यांनी केले. शारदा वाचनालय येथे तीन दिवसीय ग्रंथोत्सव कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी समारोपीय भाषणात ते अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. ग्रंथोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून तहसीलदार संजय पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी ज.सू. पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे खुमेंद्र बोपचे, जि.प. चे शिक्षण विस्तार अधिकारी महेंद्र मोटघरे, शरद काथोडे व शारदा वाचनालयाच्या ढोमणे उपस्थित होते.पुढे बोलताना राव म्हणाले, माणूस जे बोलतो ते त्याचे विचार असतात. पंरतु प्रगल्भ वाचनामुळे मनुष्य आपले मत बनवू शकतो. आपली भूमिका ठामपणे मांडू शकतो. स्वामी विवेकानंद यांच्या प्रभावी लेखनाविषयी सांगताना, आत्मविश्वासासाठी वाचन करावे, असे ते म्हणाले. निरंतर वाचनातून काय वाचावे हेही मनुष्याला उमगत जाते. ग्रंथ हे आत्मसन्मानासाठी पात्र ठरवणारे मनुष्याचे खरे मित्र आहे. म्हणून ग्रंथांशी जवळीकता वाढवावी, असा सल्ला उपस्थित युवक-युवतींना त्यांनी दिला. यानंतर संजय पवार म्हणाले, ग्रंथवाचन म्हणजे बुध्दीजीवांची मक्तेदारी राहू नये. वाचनाने संस्कृतीची जोपासना व संवर्धन होते. म्हणून पालकांनी आपल्या पाल्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करावी. अवांतर वाचनातून जागृत झालेली ज्ञानाची भूक वैचारीक, मार्मिक व चिंतनशील वाचनाने शमते. या अवस्थेपर्यंत जो पोहोचला तो पूर्णत्वाकडे वळला, असे म्हणावयास पाहिजे. मोटघरे म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ज्या प्रमाणात वाढला आहे, त्याच प्रमाणात युवकांनी ग्रंथवाचनाकडे वळणे गरजेचे आहे. शरद काथोडे यांनी, समाजामध्ये ग्रंथालयाची भूमिका ज्ञानमंदिराची असल्याची सांगून ज्ञानाचा प्रकाश दूरपर्यंत पोहोचिवण्याचे ते उत्कृष्ट साधन आहे, असे ते म्हणाले.प्रास्ताविक खुमेंद्र बोपचे यांनी केले. ग्रंथोत्सवाच्या आयोजनामुळे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बौध्दिक मेजवानीचा आस्वाद घेता आला, असे सांगितले. संचालन विद्या ठाकूरने केले. आभार पूजा सोनजल यांनी मानले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)