शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांना ‘घरपोच सेवा’ देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST

देशात कोरोना आपले हातपाय झपाट्याने पसरत आहे. कोरोनाचा हा प्रादुर्भाव बघता याला वेळीच आवर घालता यावी, यासाठी अवघ्या देशात २५ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आला असून प्रसंगी बघता त्यात आता वाढही करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लोकांना घरात राहण्यास सांगीतले असून महत्त्वाचे काम असल्यास बाहेर निघण्याची मुभा आहे.

ठळक मुद्देबँकांमध्ये वाढली ग्राहकांची गर्दी : कळत नकळत ‘सोशल डिस्टंन्सिंग’चा फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी शासनाकडून विविध प्रयोग व नियम लागू केले जात आहेत. जीवनावश्यक वस्तूंची पुर्तता करता यावी यासाठी ‘होम डिलिव्हरी’ची सुविधा दिली जात आहे. मात्र बँकांमध्ये नागरिकांची गर्दी होत असून कळत नकळत ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा होताना दिसत आहे. हा प्रकार धोक्याची घंटा असून यावर वेळीच आवर घालण्यासाठी बँकांनी ग्राहकांना ‘घरपोच’ सेवा देण्याची गरज दिसून येत असून तशी मागणी काही सूज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.देशात कोरोना आपले हातपाय झपाट्याने पसरत आहे. कोरोनाचा हा प्रादुर्भाव बघता याला वेळीच आवर घालता यावी, यासाठी अवघ्या देशात २५ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आला असून प्रसंगी बघता त्यात आता वाढही करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लोकांना घरात राहण्यास सांगीतले असून महत्त्वाचे काम असल्यास बाहेर निघण्याची मुभा आहे. नागरिकांची गरज लक्षात घेता औषध, भाज्या व जीवनावश्यक वस्तूंची पुर्तता करण्यासाठी ‘होम डिलिव्हरी’ची सुविधा व्यापाऱ्यांनी सुरू केली आहे. जेणेकरून नागरिकांनी घराबाहेर पडू नये हा यामागील उद्देश आहे.याचा लाभही नागरिक घेत असून घराबाहेर न पडता शासन नियमांचे पालन करीत आहे. असे असताना मात्र बँकांना ‘लॉकडाऊन’पासून वगळण्यात आले असून बँकांचे कामकाज सुरूच आहे. आता बँका सुरू असल्याने नागरिकही आपली कामे घेऊन जात आहेत. परिणामी बँकांमध्ये नागरिकांची चांगलीच गर्दी बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, बँकांकडून ग्राहकांसाठी बाहेर मंडप घालून तसेच काही अंतर ठेवून खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र कळत नकळत बँकांमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा होत असताना दिसून येतच आहे. हा प्रकार धोक्याची घंटा असून यावर आळा घालण्याची गरज आहे. यासाठी बँकांनी ग्राहकांना ‘घरपोच सेवा’ देण्याची गरज असून तशी मागणीही केली जात आहे.ग्राहक व कर्मचारीही सुरक्षितबँकांनी आपला एक हेल्पलाईन नंबर दिला पाहिजे.जेणेकरून ग्राहकाला काही काम असल्यास त्यावर कॉल करून सांगावे. त्यानंतर बँक ेने कार्यालयातूनच त्यांचे काम आटोपून द्यावे. गरज असल्यास ग्राहकाला बँकेत बोलावून घ्यावे. याशिवाय ग्राहकाशी संपर्क साधता येत असल्यास त्याला घरी जाऊन सेवा देता येईल. असे केल्यास बँकेतील गर्दीपासून निर्माण होणाºया धोक्यापासून ग्राहक व बँक कर्मचारी सुद्धा सुरक्षित राहतील. सध्या स्थितीत बहुतांश नागरिकांकडे एटीएम असल्यामुळे त्यांना पैसे काढण्यासाठी बँकेत जावे लागत नाही. मात्र अन्य कामांसाठी बँक ग्राहकांना एवढी सुविधा नक्कीच देऊ शकतात.जिल्हावासी झाले बिनधास्तजिल्ह्यात कोरोनाचा एकच रूग्ण आढळला होता व तोही आता कोरोनामुक्त झाल्याने जिल्हा कोरोनामुक्त आहे. परिणामी शासनाकडून जिल्ह्याला काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र जिल्हावासी याचा गैरफायदा घेताना दिसत आहेत. आपल्या जिल्ह्याला व आपल्याला आता काहीच होणार असा आव आणून ते बिनधास्त फिरत आहेत. मात्र काळजी घेणे गरजेचे असल्याने आता पोलिसांनीही कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

टॅग्स :bankबँक