शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

ग्राहकांना ‘घरपोच सेवा’ देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 05:00 IST

देशात कोरोना आपले हातपाय झपाट्याने पसरत आहे. कोरोनाचा हा प्रादुर्भाव बघता याला वेळीच आवर घालता यावी, यासाठी अवघ्या देशात २५ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आला असून प्रसंगी बघता त्यात आता वाढही करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लोकांना घरात राहण्यास सांगीतले असून महत्त्वाचे काम असल्यास बाहेर निघण्याची मुभा आहे.

ठळक मुद्देबँकांमध्ये वाढली ग्राहकांची गर्दी : कळत नकळत ‘सोशल डिस्टंन्सिंग’चा फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी शासनाकडून विविध प्रयोग व नियम लागू केले जात आहेत. जीवनावश्यक वस्तूंची पुर्तता करता यावी यासाठी ‘होम डिलिव्हरी’ची सुविधा दिली जात आहे. मात्र बँकांमध्ये नागरिकांची गर्दी होत असून कळत नकळत ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा होताना दिसत आहे. हा प्रकार धोक्याची घंटा असून यावर वेळीच आवर घालण्यासाठी बँकांनी ग्राहकांना ‘घरपोच’ सेवा देण्याची गरज दिसून येत असून तशी मागणी काही सूज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.देशात कोरोना आपले हातपाय झपाट्याने पसरत आहे. कोरोनाचा हा प्रादुर्भाव बघता याला वेळीच आवर घालता यावी, यासाठी अवघ्या देशात २५ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात आला असून प्रसंगी बघता त्यात आता वाढही करण्यात आली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने लोकांना घरात राहण्यास सांगीतले असून महत्त्वाचे काम असल्यास बाहेर निघण्याची मुभा आहे. नागरिकांची गरज लक्षात घेता औषध, भाज्या व जीवनावश्यक वस्तूंची पुर्तता करण्यासाठी ‘होम डिलिव्हरी’ची सुविधा व्यापाऱ्यांनी सुरू केली आहे. जेणेकरून नागरिकांनी घराबाहेर पडू नये हा यामागील उद्देश आहे.याचा लाभही नागरिक घेत असून घराबाहेर न पडता शासन नियमांचे पालन करीत आहे. असे असताना मात्र बँकांना ‘लॉकडाऊन’पासून वगळण्यात आले असून बँकांचे कामकाज सुरूच आहे. आता बँका सुरू असल्याने नागरिकही आपली कामे घेऊन जात आहेत. परिणामी बँकांमध्ये नागरिकांची चांगलीच गर्दी बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, बँकांकडून ग्राहकांसाठी बाहेर मंडप घालून तसेच काही अंतर ठेवून खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र कळत नकळत बँकांमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा होत असताना दिसून येतच आहे. हा प्रकार धोक्याची घंटा असून यावर आळा घालण्याची गरज आहे. यासाठी बँकांनी ग्राहकांना ‘घरपोच सेवा’ देण्याची गरज असून तशी मागणीही केली जात आहे.ग्राहक व कर्मचारीही सुरक्षितबँकांनी आपला एक हेल्पलाईन नंबर दिला पाहिजे.जेणेकरून ग्राहकाला काही काम असल्यास त्यावर कॉल करून सांगावे. त्यानंतर बँक ेने कार्यालयातूनच त्यांचे काम आटोपून द्यावे. गरज असल्यास ग्राहकाला बँकेत बोलावून घ्यावे. याशिवाय ग्राहकाशी संपर्क साधता येत असल्यास त्याला घरी जाऊन सेवा देता येईल. असे केल्यास बँकेतील गर्दीपासून निर्माण होणाºया धोक्यापासून ग्राहक व बँक कर्मचारी सुद्धा सुरक्षित राहतील. सध्या स्थितीत बहुतांश नागरिकांकडे एटीएम असल्यामुळे त्यांना पैसे काढण्यासाठी बँकेत जावे लागत नाही. मात्र अन्य कामांसाठी बँक ग्राहकांना एवढी सुविधा नक्कीच देऊ शकतात.जिल्हावासी झाले बिनधास्तजिल्ह्यात कोरोनाचा एकच रूग्ण आढळला होता व तोही आता कोरोनामुक्त झाल्याने जिल्हा कोरोनामुक्त आहे. परिणामी शासनाकडून जिल्ह्याला काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. मात्र जिल्हावासी याचा गैरफायदा घेताना दिसत आहेत. आपल्या जिल्ह्याला व आपल्याला आता काहीच होणार असा आव आणून ते बिनधास्त फिरत आहेत. मात्र काळजी घेणे गरजेचे असल्याने आता पोलिसांनीही कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

टॅग्स :bankबँक