शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राष्ट्रसंतांच्या विचारांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2017 02:09 IST

विज्ञान व तंत्रज्ञान युक्त प्रेरक जगातील समाजाला राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या प्रेरक विचार व त्यांनी लिहिलेल्या ग्रामगीता

सुखदेव वेठे : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव देवरी : विज्ञान व तंत्रज्ञान युक्त प्रेरक जगातील समाजाला राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या प्रेरक विचार व त्यांनी लिहिलेल्या ग्रामगीता या ग्रंथाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन गडचीरोली येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा प्रचारक सुखदेव वेठे यांनी केले. येथील श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखेच्यावतीने आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ४८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजीत सामुदायीक ध्यानप्रसंगी ते बोलत होते. दोन दिवसीय पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष सुमन बिसेन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन तर आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी, नगरसेवक यादोराव पंचमवार यांच्या हस्ते माल्यार्पण करुन पारबता चांदेवार, नगरसेविका कोकीळा दखने, माया निर्वाण, मुख्याध्यापक विनोद गिऱ्हेपुंजे, बाबूराव क्षिरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. पुढे बोलताना वेठे यांनी, आजच्या तरुणांनी येणाऱ्या भविष्यातील पिढीचा विचार करुन ग्रामगीतेचा अभ्यास करुन आपल्या जीवनात अवलोकन करुन समाजात चांगले विचार देण्याचे कार्य केले पाहिजे. तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व थोर महापुरुषांच्या जयंती व स्मृती स्मरण दिवस साजरे करण्यात सार्थक ठरु असे मत वय्क्त केले. यावेळी या महोत्सवाप्रसंगी राष्ट्रीय किर्तनकार लक्ष्मणदास काळे महाराज यांचे जाहीर किर्तन झाले. यावेळी काळे महाराज यांनी उपस्थित नगरवासीयांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेल्या सामुदायीक ध्यान व प्रार्थनेचे महत्व सांगत आजच्या नागरिक व युवकांना आवश्यक असलेल्या विचारांवर मार्गदर्शन करुन देशातील दोन संताची ओळख करुन दिली. त्यामधील पहिला संत देशाच्या सिमेवर अहोरात्र आमची सेवा करणारे वीर जवान व दुसरा संत शेतात राबणारा शेतकरी अशी संतांची ओळख करुन देत वैयक्तीक व गावाच्या विकासासाठी प्रेरक उत्कृष्ट विश्लेषण जाहिर किर्तनाच्या माध्यमातून करुन दिले. तर दुसऱ्या दिवशी सामुदायीक प्रार्थना व बक्षीस वितरण करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय पुराम, माजी आ.रामरतन राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुराम, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, सहेषराम कोरोटे, मनोज भुरे उपस्थित होते. प्रास्ताविक मंडळाचे सल्लागार डॉ. गुरु कापगते यांनी मांडले. संचालन ओमप्रकाश रामटेके व कुलदीप लांजेवार यांनी केले. आभार सहसचिव नरहरी लांजेवार यांनी मानले. महोत्सवाच्या आयोजनाप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष तु.को.राणे, उपाध्यक्ष रामचंद्र राऊत, चंद्रकांत आंबीलकर, युवराज धुर्वे, चंद्रशेखर अगळे, दयाराम बन्सोड, मोरेश्वर मेश्राम, दयाराम लांजेवार, रामदास मांदाडे, मनोज खुरपुडे, रतिराम डोये, निलकंठ आरसोडे, गजानन दिघोरे, दिलीप साखरे, अरुण मानकर, गोपाल चताप, विनोद भिमटे, हर्षवर्धन मेश्राम, शिवम राऊत आदिंनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)