शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

शेतकºयांचा गांभीर्याने विचार करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 22:51 IST

आपल्या देशात कष्टकºयाला कमी पगार आणि बिनकष्टकºयाला अधिक पगार दिला जातो.

ठळक मुद्देमकरंद अनासपुरे : माझी हक्काची भाऊबीज कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपल्या देशात कष्टकºयाला कमी पगार आणि बिनकष्टकºयाला अधिक पगार दिला जातो. जो शेतकरी वर्षभर आपल्या रक्ताचे पाणी करुन एका दाण्याचे हजार दाणे करतो, तो आज उपेक्षेचे जीणे जगत आहे. हे फार बिकट चित्र आहे. अद्यापही शेतकºयांचा गांभीर्याने विचार केला जात नाही. मात्र आता त्यांचा गाभीर्याने विचार न केल्यास एक दिवस त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल, असे मत सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केले.शहरातील विविध सामाजिक संस्थांतर्फे रविवारी रेलटोली येथील भवभूती रंगमंदिरात आयोजित ‘माझी हक्काची भाऊबीज’ या कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाला नगराध्यक्ष अशोक इंगळे, आमदार परिणय फुके, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, माजी कुुलगुरू शरद निंबाळकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, राजेश चतूर उपस्थित होते.पुढे बोलताना अनासपूरे म्हणाले, जोपर्यंत शेतकºयांच्या शेतमालाला योग्य दर मिळणार नाही, तोपर्यंत शेतकरी दिवाळी साजरी करु शकणार नाही. सरकारची चुकीची धोरणे आणि धारणाच शेतकºयांच्या सद्यस्थितीला कारणीभूत आहेत. दिवसेंदिवस शेतकºयांमध्ये एकटेपणाची भावना निर्माण होत आहे. आपल्या पाठीशी कुणीही नाही, या धारणेतून हताश होवून ते आत्महत्या करित असल्याचे चित्र आहे.मात्र शासन आणि प्रशासनाला अद्यापही शेतकºयांची प्रश्न समजून ती सोडविता आली नाही. शेतकºयांचे पोट दोन वेळी जर समाधानाने भरत असते तर त्यांनी आत्महत्या केली असती का? असा सवालही अनासपूरे यांनी केला.देशात ५५ टक्के शेतकरी आहेत. मात्र हा कापूस उत्पादक, तो धान उत्पादक अशी त्यांची विभागणी करुन त्यांना एकत्र येऊ दिले जात नाही. जोपर्यंत ही सर्व विभागणी बाजुला सारुन शेतकरी एकत्र येणार नाहीत. तोपर्यंत त्यांचे प्रश्न सुध्दा मार्गी लागणार नाहीत. शेतकºयांनी पांरपारिक शेतपिकांसह आता त्याला पूरक धंद्याची जोड देण्याचे आवाहन अनासपुरे यांनी केले.निंबाळकर यांनी, सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकºयांच्या कुटुंबियांवर हे संकट ओढवले आहे. हे संकट ओढवू नये, यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. भुजबळ पाटील आणि ठाकरे यांनी प्रशासनातर्फे आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.आमदार फुके यांनी, सरकार शेतकºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. तसेच दोन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची सर्व जबाबदारी घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.यावेळी शेतकºयांच्या विधवांनी उपस्थित मान्यवरांची भाऊबीज निमित्त ओवाळणी केली. संचालन सविता बेदरकर आणि दुुलीचंद बुध्दे यांनी केले.५५ आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना मदतविविध सामाजिक संस्थातर्फे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील एकूण ५५ आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना यावेळी आर्थिक मदत देण्यात आलीे. तसेच त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आणि व्यवसाय उभारण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन यावेळी दिले.आयुष्यभर बांधव होण्याची भूमिका पार पाडा‘माझी हक्काची भाऊबीज’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी विधवांना आम्ही तुमचे भाऊ तुमच्या सर्व संकटात सक्षमपणे उभे राहु असे वचन दिले. मात्र या वचनाचे पालन करुन आयुष्यभर बांधव होण्याची भूमिका पार पाडावी, असे आवाहन अनासपूरे यांनी केले.