शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

स्वच्छ ग्राम योजनेचे चिंतन करणे आवश्यक

By admin | Updated: December 7, 2014 22:54 IST

जिल्हा परिषदने या देशाचे पंतप्रधान यांच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याकरिता जि.प. स्वच्छ ग्राम योजनेची तावातावात घोषणा करून याची सुरूवात देवरीसारख्या आदिवासी दुर्गम भागातून केली.

देवरी : जिल्हा परिषदने या देशाचे पंतप्रधान यांच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याकरिता जि.प. स्वच्छ ग्राम योजनेची तावातावात घोषणा करून याची सुरूवात देवरीसारख्या आदिवासी दुर्गम भागातून केली. यासाठी देवरीच्या छत्रपती शिवाजी लॉनमध्ये मेळावाही पार पडला. या मेळाव्यानंतर देवरी गावातील सहा वॉर्डात सहा पथकांच्या माध्यमातून सुमारे ६०० अधिकारी-पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावात स्वच्छता केल्याचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. यावर खर्चही करण्यात आले. परंतू या मेळाव्याच्या आयोजनातून साध्य काय झाले? याचे चिंतन करणे आवश्यक आहे. सविस्तर असे की, या स्वच्छ ग्राम योजनेच्या माध्यमातून देवरी गावात फिरून फोटो काढण्यापलीकडे या अभियानातून काहीही साध्य झाले नाही. यात स्थानिक ग्रा.पं. चे पदाधिकारी तर आपसी कलहामुळे फारसे उत्साहित नसल्याचे दिसले. शिवाय देवरी येथे राजीव गांधी गतीमानता अभियानांतर्गत ५२ जि.प. सदस्यांचे यशदामार्फत प्रशिक्षण सुरू होते. मात्र बोटावर मोजण्याइतक्या पाच-दहा सदस्यांनी या मेळाव्यात लावलेली हजेरी, या अभियानाच्या यशस्वितेबद्दल बरेच काही सांगून गेली. देवरी शहरात जेथे घाणीचे साम्राज्य आहे, तेथे तर ग्रामपंचायत कधी ढुंकून पाहत नाही. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही लक्ष दिले नाही. केवळ स्वच्छ असलेल्या रस्त्यांवरच फिरून फोटोसेशन करण्यापुरते सदर कार्यक्रम झाले. दुसऱ्या दिवशी लोकांनी शासकीय कार्यालयांंना भेट दिल्यावर कार्यक्रमात आघाडीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांचेच शासकीय कार्यालय व परिसर घाणीने माखलेले दिसले. यावरून जनतेत जो संदेश जायचा तो गेलाच. निर्मल ग्राम योजनेत या जिल्ह्यातील ५५६ ग्रामपंचायतींपैकी सुमारे ३२७ ग्रामपंचायत निर्मल झाल्याचा रेकार्ड जि.प. कडे आहे. आता स्वच्छ ग्राम योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत प्रत्येक जि.प. सदस्याला एक गाव दत्तक घ्यायचे आहे. ही योजना जाहीर होताच काही चलाख जि.प. सदस्यांनी मनोमन गावांची निवडसुध्दा करून टाकली. यात राज्यस्तरापासून तर तालुकास्तरावर पुरस्कार प्राप्त गावांचादेखील समावेश आहे. यामुळे या सुंदर योजनेचे वाटोळे करण्याचे आधीच शिजले, अशी शंका नागरिकांना येऊ लागली आहे. असे झाले तर मागील सरकारवर दोषारोप करीत आम्हीच या गावांचा कायापालट केला, अशी फुशारकी मारली जाण्याची शंका आहे. त्यामुळे जि.प. अध्यक्षांनी या बाबींकडे लक्ष देऊन अतिमागास व जी गावे अद्यापही स्वच्छतेच्या बाबतीत समोर आलीच नाही, अशा गावांना सदस्यांनी प्राधान्य द्यावे, असे सूचविणे आवश्यक आहे. देवरी येथील स्वच्छता मेळाव्याचे आयोजन करताना जनतेचा किंवा ज्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांचा प्रत्यक्ष सहभाग घेणे आवश्यक होते. कारण त्यांचा थेट संबंध स्वच्छतेशी येतो. एका ठिकाणी मेळावा आयोजित करून आणि त्या मेळाव्यात केवळ अधिकारी आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्याचे धोरण राहिले तर स्वच्छता वियषक चळवळींना यश येणे शक्य नाही. फक्त आदेश म्हणून हजर रहायचे आणि शासकीय पैशांची केवळ उधळपट्टी याशिवाय फारसे काही साध्य होऊ शकत नाही. यासाठी जनतेचे मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. शिवाय ज्या अधिकाऱ्यांचा या मेळाव्यात सहभाग होता किमान त्यांचे कार्यालय किंवा परिसर तरी स्वच्छ आहेत की नाही, हे तपासण्याची तसदी कोणी घेतल्याचे ऐकिवात नाही. यासाठी प्रामाणिक प्रयत्न गरजेचे आहे.