शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

स्वच्छ ग्राम योजनेचे चिंतन करणे आवश्यक

By admin | Updated: December 7, 2014 22:54 IST

जिल्हा परिषदने या देशाचे पंतप्रधान यांच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याकरिता जि.प. स्वच्छ ग्राम योजनेची तावातावात घोषणा करून याची सुरूवात देवरीसारख्या आदिवासी दुर्गम भागातून केली.

देवरी : जिल्हा परिषदने या देशाचे पंतप्रधान यांच्या सूचनांची अंमलबजावणी करण्याकरिता जि.प. स्वच्छ ग्राम योजनेची तावातावात घोषणा करून याची सुरूवात देवरीसारख्या आदिवासी दुर्गम भागातून केली. यासाठी देवरीच्या छत्रपती शिवाजी लॉनमध्ये मेळावाही पार पडला. या मेळाव्यानंतर देवरी गावातील सहा वॉर्डात सहा पथकांच्या माध्यमातून सुमारे ६०० अधिकारी-पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावात स्वच्छता केल्याचा देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. यावर खर्चही करण्यात आले. परंतू या मेळाव्याच्या आयोजनातून साध्य काय झाले? याचे चिंतन करणे आवश्यक आहे. सविस्तर असे की, या स्वच्छ ग्राम योजनेच्या माध्यमातून देवरी गावात फिरून फोटो काढण्यापलीकडे या अभियानातून काहीही साध्य झाले नाही. यात स्थानिक ग्रा.पं. चे पदाधिकारी तर आपसी कलहामुळे फारसे उत्साहित नसल्याचे दिसले. शिवाय देवरी येथे राजीव गांधी गतीमानता अभियानांतर्गत ५२ जि.प. सदस्यांचे यशदामार्फत प्रशिक्षण सुरू होते. मात्र बोटावर मोजण्याइतक्या पाच-दहा सदस्यांनी या मेळाव्यात लावलेली हजेरी, या अभियानाच्या यशस्वितेबद्दल बरेच काही सांगून गेली. देवरी शहरात जेथे घाणीचे साम्राज्य आहे, तेथे तर ग्रामपंचायत कधी ढुंकून पाहत नाही. जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही लक्ष दिले नाही. केवळ स्वच्छ असलेल्या रस्त्यांवरच फिरून फोटोसेशन करण्यापुरते सदर कार्यक्रम झाले. दुसऱ्या दिवशी लोकांनी शासकीय कार्यालयांंना भेट दिल्यावर कार्यक्रमात आघाडीवर असणाऱ्या अधिकाऱ्यांचेच शासकीय कार्यालय व परिसर घाणीने माखलेले दिसले. यावरून जनतेत जो संदेश जायचा तो गेलाच. निर्मल ग्राम योजनेत या जिल्ह्यातील ५५६ ग्रामपंचायतींपैकी सुमारे ३२७ ग्रामपंचायत निर्मल झाल्याचा रेकार्ड जि.प. कडे आहे. आता स्वच्छ ग्राम योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेंतर्गत प्रत्येक जि.प. सदस्याला एक गाव दत्तक घ्यायचे आहे. ही योजना जाहीर होताच काही चलाख जि.प. सदस्यांनी मनोमन गावांची निवडसुध्दा करून टाकली. यात राज्यस्तरापासून तर तालुकास्तरावर पुरस्कार प्राप्त गावांचादेखील समावेश आहे. यामुळे या सुंदर योजनेचे वाटोळे करण्याचे आधीच शिजले, अशी शंका नागरिकांना येऊ लागली आहे. असे झाले तर मागील सरकारवर दोषारोप करीत आम्हीच या गावांचा कायापालट केला, अशी फुशारकी मारली जाण्याची शंका आहे. त्यामुळे जि.प. अध्यक्षांनी या बाबींकडे लक्ष देऊन अतिमागास व जी गावे अद्यापही स्वच्छतेच्या बाबतीत समोर आलीच नाही, अशा गावांना सदस्यांनी प्राधान्य द्यावे, असे सूचविणे आवश्यक आहे. देवरी येथील स्वच्छता मेळाव्याचे आयोजन करताना जनतेचा किंवा ज्या अधिकारी-पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांचा प्रत्यक्ष सहभाग घेणे आवश्यक होते. कारण त्यांचा थेट संबंध स्वच्छतेशी येतो. एका ठिकाणी मेळावा आयोजित करून आणि त्या मेळाव्यात केवळ अधिकारी आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन करण्याचे धोरण राहिले तर स्वच्छता वियषक चळवळींना यश येणे शक्य नाही. फक्त आदेश म्हणून हजर रहायचे आणि शासकीय पैशांची केवळ उधळपट्टी याशिवाय फारसे काही साध्य होऊ शकत नाही. यासाठी जनतेचे मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. शिवाय ज्या अधिकाऱ्यांचा या मेळाव्यात सहभाग होता किमान त्यांचे कार्यालय किंवा परिसर तरी स्वच्छ आहेत की नाही, हे तपासण्याची तसदी कोणी घेतल्याचे ऐकिवात नाही. यासाठी प्रामाणिक प्रयत्न गरजेचे आहे.