शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने मिराज, जेएफ-१७ सह ५ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली; ऑपरेशन सिंदूरबाबत खुलासा
2
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
3
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
4
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
5
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
6
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
7
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
8
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
9
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
10
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
11
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
12
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
13
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
14
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
15
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
16
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
17
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
18
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
19
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
20
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा

एनसीची माहिती तंमुसला देत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2016 02:06 IST

क्षुल्लक वादाचे पर्यावसान मोठ्या वादात रुपांतरित होऊ नये म्हणून शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला अदखलपात्र स्वरुपाचे गुन्हे ...

अध्यक्षांची ओरड : तंटामुक्त मोहिमेकडे पोलिसांचे दुर्लक्षगोंदिया : क्षुल्लक वादाचे पर्यावसान मोठ्या वादात रुपांतरित होऊ नये म्हणून शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला अदखलपात्र स्वरुपाचे गुन्हे तडजोड करुन सोडविण्याची संमती देण्यात आली. यासाठी पोलिस ठाण्यात दाखल अदखलपात्र गुन्हे ही तंटामुक्त मोहिमेला सोडविण्यासाठी पोलिस ठाणे यांनी पाठविणे आवश्यक आहे. परंतु पोलिस विभाग छोट्या गुन्ह्यांनाही (अदखलपात्र) गुन्ह्यांना तंटामुक्तीकडे सोपवित नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम अंमलात आणून छोटे-छोटे तंटे गाव गाड्यातूनच सोडवावे, पोलिसांच्या डोक्यावरील कामाचा ताण व न्यायालयावरील कामाचा भार पाहून अदखलपात्र, महसूली, फौजदारी, दिवाणी व इतर तंटे सोडविण्याचे अधिकार तंटामुक्त समित्यांना देण्यात आले. सीआरपीसी वर्गीकृत गुन्ह्यांना वगळता सर्व तंटे तंटामुक्त समित्यांना सोडविता येतात. परंतु पुरस्कार प्राप्त केल्यानंतर तंटामुक्त मोहिमेकडे समित्यांनी दुर्लक्ष केले तर तक्रारकर्त्याकडून आणि गैरअर्जदाराकडून पैसे खाण्याच्या नादात पोलिसांनी एनसी (अदखलपात्र) गुन्हे तंटामुक्त समित्यांकडे तडजोडीसाठी पाठविले नाही. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हे तडजोडीसाठी तंटामुक्त समित्याकडे पाठविले तर त्यांच्याही कामाचा ताण कमी होईल. परंतु कामाचा ताण सोडा पैसे कमविण्याच्या नादात पोलिस ठाण्यांनी अदखलपात्र गुन्ह्यांना तडजोडीसाठी तंटामुक्त समित्याकडे पाठविले नाही. महाराष्ट्रात तंटामुक्त होणारा पहिला जिल्हा गोंदिया असून देखील जेवढ्या जलद गतीने जिल्हा तंटामुक्त झाला. तेवढ्याच गतीत तंटे सोडविण्याची गती आजच्या स्थितीत मंदावलेली आहे. पोलिस अधिक्षकांनी या प्रकाराकडे लक्ष घालून तडजोडीसाठी अदखलपात्र गुन्हे तंटामुक्त समित्याकडे पाठविण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)कार्यक्रम वेळेत राबवाशासन प्रत्येक योजनेसाठी निश्चित कालावधी ठरवितो. महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेसाठी तारीख निहाय कार्यक्रम ठरवून दिलेला आहे. परंतु सुरुवातीचे दोन वर्ष वगळता तंटामुक्त मोहिमे संदर्भात दिलेल्या तारखेवर त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना दिसत नाही. सन २०१४-१५ या वर्षातील तंटामुक्त पुरस्कार शासनाने जाहीर केले नाही. शासनाने या कार्यक्रमाकडे लक्ष देऊन तंटामुक्त मोहिमेला गती आणण्याची गरज आहे.