शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

एनसीची माहिती तंमुसला देत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2016 02:06 IST

क्षुल्लक वादाचे पर्यावसान मोठ्या वादात रुपांतरित होऊ नये म्हणून शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला अदखलपात्र स्वरुपाचे गुन्हे ...

अध्यक्षांची ओरड : तंटामुक्त मोहिमेकडे पोलिसांचे दुर्लक्षगोंदिया : क्षुल्लक वादाचे पर्यावसान मोठ्या वादात रुपांतरित होऊ नये म्हणून शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला अदखलपात्र स्वरुपाचे गुन्हे तडजोड करुन सोडविण्याची संमती देण्यात आली. यासाठी पोलिस ठाण्यात दाखल अदखलपात्र गुन्हे ही तंटामुक्त मोहिमेला सोडविण्यासाठी पोलिस ठाणे यांनी पाठविणे आवश्यक आहे. परंतु पोलिस विभाग छोट्या गुन्ह्यांनाही (अदखलपात्र) गुन्ह्यांना तंटामुक्तीकडे सोपवित नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम अंमलात आणून छोटे-छोटे तंटे गाव गाड्यातूनच सोडवावे, पोलिसांच्या डोक्यावरील कामाचा ताण व न्यायालयावरील कामाचा भार पाहून अदखलपात्र, महसूली, फौजदारी, दिवाणी व इतर तंटे सोडविण्याचे अधिकार तंटामुक्त समित्यांना देण्यात आले. सीआरपीसी वर्गीकृत गुन्ह्यांना वगळता सर्व तंटे तंटामुक्त समित्यांना सोडविता येतात. परंतु पुरस्कार प्राप्त केल्यानंतर तंटामुक्त मोहिमेकडे समित्यांनी दुर्लक्ष केले तर तक्रारकर्त्याकडून आणि गैरअर्जदाराकडून पैसे खाण्याच्या नादात पोलिसांनी एनसी (अदखलपात्र) गुन्हे तंटामुक्त समित्यांकडे तडजोडीसाठी पाठविले नाही. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हे तडजोडीसाठी तंटामुक्त समित्याकडे पाठविले तर त्यांच्याही कामाचा ताण कमी होईल. परंतु कामाचा ताण सोडा पैसे कमविण्याच्या नादात पोलिस ठाण्यांनी अदखलपात्र गुन्ह्यांना तडजोडीसाठी तंटामुक्त समित्याकडे पाठविले नाही. महाराष्ट्रात तंटामुक्त होणारा पहिला जिल्हा गोंदिया असून देखील जेवढ्या जलद गतीने जिल्हा तंटामुक्त झाला. तेवढ्याच गतीत तंटे सोडविण्याची गती आजच्या स्थितीत मंदावलेली आहे. पोलिस अधिक्षकांनी या प्रकाराकडे लक्ष घालून तडजोडीसाठी अदखलपात्र गुन्हे तंटामुक्त समित्याकडे पाठविण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)कार्यक्रम वेळेत राबवाशासन प्रत्येक योजनेसाठी निश्चित कालावधी ठरवितो. महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेसाठी तारीख निहाय कार्यक्रम ठरवून दिलेला आहे. परंतु सुरुवातीचे दोन वर्ष वगळता तंटामुक्त मोहिमे संदर्भात दिलेल्या तारखेवर त्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना दिसत नाही. सन २०१४-१५ या वर्षातील तंटामुक्त पुरस्कार शासनाने जाहीर केले नाही. शासनाने या कार्यक्रमाकडे लक्ष देऊन तंटामुक्त मोहिमेला गती आणण्याची गरज आहे.